शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुख्य सचिवांकडून टंचाईचा आढावा

By admin | Updated: August 20, 2014 00:22 IST

चारा व पाणीटंचाईवरील उपाययोजनांबाबत आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी दिल्या.

हिंगोली : जिल्हा दुष्काळसदृशच्या यादीत असला तरी त्याबाबतचा शासन निर्णय येत्या एक-दोन दिवसांत निघण्याची शक्यता आहे. तसे संकेत देत चारा व पाणीटंचाईवरील उपाययोजनांबाबत आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी दिल्या.राज्यातील विविध भागात असलेल्या टंचाईबाबत मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेण्यात आला. त्यात हिंगोली जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर आदींनी दिली. हिंगोली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता कोणत्या उपाययोजना केल्या म्हणजे हा प्रश्न सोडविता येईल, याचा वास्तवदर्शी अहवाल अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही विविध सूचना दिल्या. चाराटंचाईचा प्रश्न सप्टेंबरअखेरपर्यंत निर्माण होणार नाही, असे कृषी विभागाने सांगितले. मात्र त्यानंतरच्या उपायांबाबत जि.प. सर्कलनिहाय आढावा घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार चारा छावणी वा डेपो याबाबतचे नियोजन करून संस्था, कारखाने आदींनी ते चालविले पाहिजे, यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांतही परिस्थिती वेगळी नसल्याने चारा उपलब्धतेचा पर्याय शोधण्यासही सांगण्यात आले. २१ आॅगस्ट रोजी उपायुक्तांकडे बैठकही होणार आहे. (वार्ताहर)