शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

औरंगाबादच्या पंधराशेवर शालेय विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:00 IST

वारंवार मुदत देऊनही तपासणीकडे दुर्लक्ष करणाºया स्कूल बसवर अखेर आरटीओ कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. याचा किमान पंधराशेवर विद्यार्थ्यांना फटका बसणार असून, शाळेत ये-जा करण्यासाठी पर्यायी वाहतूक सुविधांची व्यवस्था करण्याची वेळ येणार आहे.

ठळक मुद्देकारवाई : १०६ स्कूल बसचे परवाने केले निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वारंवार मुदत देऊनही तपासणीकडे दुर्लक्ष करणाºया स्कूल बसवर अखेर आरटीओ कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. याचा किमान पंधराशेवर विद्यार्थ्यांना फटका बसणार असून, शाळेत ये-जा करण्यासाठी पर्यायी वाहतूक सुविधांची व्यवस्था करण्याची वेळ येणार आहे.आरटीओ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १,५०८ स्कूल बस धावतात. नव्या बसला दोन वर्षांनंतर, तर जुन्या बसला प्रत्येक वर्षी आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक क रणाºया स्कूल बसला ४ ते ३१ मे २०१७ दरम्यान तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी स्कूल बसची तपासणी करून घेतली. यामध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार अनेकांनी त्रुटींची पूर्तता केली; परंतु जवळपास ३०० स्कूल बस मालकांनी तपासणीकडे दुर्लक्ष केले. तपासणीपासून दूर राहिलेल्या स्कूलबसचालकांसाठी १७ डिसेंबर रोजी स्कूल बसची तपासणी मोहीम राबविण्यात आली; परंतु त्याकडेही स्कूलबसचालकांनी पाठ फिरविली. या दिवशी केवळ तीन स्कूल बसची तपासणी झाली होती. नियमांकडे दुर्लक्ष करून बस रस्त्यावर धावत राहिल्याने अखेर कारवाई झाली.स्कूल बस सापडेनातपरवाने निलंबित केलेल्या स्कूल बसकडे योग्यता प्रमाणपत्र नाही. तपासणीकडे दुर्लक्ष केल्याने बसमालकांना प्रारंभी परवाने निलंबनाचा इशारा देणारे पत्र पाठविण्यात आले होते. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने परवाने निलंबित केल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून नियमांकडे दुर्लक्ष करणाºया वाहनांवर कारवाई केली जाते; परंतु रस्त्यावर धावणाºया या स्कूल बस सापडत नसल्याचा अजब कारभार पाहायला मिळतो. या बस आढळल्यास जप्त केल्या जातील; परंतु यातील अनेक बस कालबाह्य झाल्याने रस्त्यावर धावत नसल्याची शक्यता व्यक्त करून आरटीओ अधिकारी मोकळे होत आहेत.पालकांनी सजग राहावेशालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महाराष्ट्र स्कूल बस अधिनियमनानुसार नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे; परंतु अनेक स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होत नसल्याचा प्रकार निलंबित केलेल्या परवान्यांवरून स्पष्ट होत आहे. शहरातील रस्त्यांवर जुन्या रंगरंगोटी करून केलेल्या स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होताना दिसते. चारचाकी वाहनांतून अवैधरीत्या विद्यार्थ्यांना कोंबून बसविले जाते. त्याकडे आरटीओ कार्यालयाचे लक्ष जाताना दिसत नाही. यातून एखाद्याला अपघाताच्या घटनेला सामोरे जाण्यापेक्षा पालकांनी सजग राहून आपल्या पाल्यांसाठी सर्व बाजूंची पडताळणी करून सुरक्षित वाहनांची निवड करण्याची गरज आहे.शालेय परिवहन समितीकागदावरचविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूलबस नियमावली तयार करण्यात आली आहे़, शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून सर्वच शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे आदेश आहे़; परंतु या आदेशाला अनेक शाळांनी केराची टोपली दाखवून परिवहन समितीला ठेंगा दाखविला आहे. दर तीन महिन्याला या समितीची बैठक होणे आवश्यक आहे; परंतु बैठकीची माहिती आरटीओ कार्यालयास कळविलीच जात नाही. त्यामुळे प्रत्येक शाळेसाठी नियुक्त केलेले मोटार वाहन निरीक्षकांना कामकाज पाहता येत नसल्याची माहिती आरटीओ कार्यालयाकडून मिळाली....तर परवाना रद्दतपासणीकडे दुर्लक्ष केल्याने चारचाकी ते बस अशा १०६ स्कूल बसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांची वाहतूक करता येणार नाही. शिवाय यादरम्यान तपासणी करून त्रुटींची पूर्तता करावी लागेल. अन्यथा परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाईल.-रमेशचंद्र खराडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारीविद्यार्थ्यांचा जीव धोक्यातस्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन उपकरणे, आसन व्यवस्था, खिडक्यांची, पायºयांची विशिष्ट रचना, वेग नियंत्रक आदी गोष्टी आवश्यक ठरतात; परंतु अनेक स्कूलबस नियम पायदळी तुडवून धावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येतो. तपासणीकडे दुर्लक्ष करणाºया स्कूलबसमध्ये अनेक त्रुटी राहण्याची शक्यता असते.