शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

औरंगाबादच्या पंधराशेवर शालेय विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:00 IST

वारंवार मुदत देऊनही तपासणीकडे दुर्लक्ष करणाºया स्कूल बसवर अखेर आरटीओ कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. याचा किमान पंधराशेवर विद्यार्थ्यांना फटका बसणार असून, शाळेत ये-जा करण्यासाठी पर्यायी वाहतूक सुविधांची व्यवस्था करण्याची वेळ येणार आहे.

ठळक मुद्देकारवाई : १०६ स्कूल बसचे परवाने केले निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वारंवार मुदत देऊनही तपासणीकडे दुर्लक्ष करणाºया स्कूल बसवर अखेर आरटीओ कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. याचा किमान पंधराशेवर विद्यार्थ्यांना फटका बसणार असून, शाळेत ये-जा करण्यासाठी पर्यायी वाहतूक सुविधांची व्यवस्था करण्याची वेळ येणार आहे.आरटीओ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १,५०८ स्कूल बस धावतात. नव्या बसला दोन वर्षांनंतर, तर जुन्या बसला प्रत्येक वर्षी आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक क रणाºया स्कूल बसला ४ ते ३१ मे २०१७ दरम्यान तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी स्कूल बसची तपासणी करून घेतली. यामध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार अनेकांनी त्रुटींची पूर्तता केली; परंतु जवळपास ३०० स्कूल बस मालकांनी तपासणीकडे दुर्लक्ष केले. तपासणीपासून दूर राहिलेल्या स्कूलबसचालकांसाठी १७ डिसेंबर रोजी स्कूल बसची तपासणी मोहीम राबविण्यात आली; परंतु त्याकडेही स्कूलबसचालकांनी पाठ फिरविली. या दिवशी केवळ तीन स्कूल बसची तपासणी झाली होती. नियमांकडे दुर्लक्ष करून बस रस्त्यावर धावत राहिल्याने अखेर कारवाई झाली.स्कूल बस सापडेनातपरवाने निलंबित केलेल्या स्कूल बसकडे योग्यता प्रमाणपत्र नाही. तपासणीकडे दुर्लक्ष केल्याने बसमालकांना प्रारंभी परवाने निलंबनाचा इशारा देणारे पत्र पाठविण्यात आले होते. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने परवाने निलंबित केल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून नियमांकडे दुर्लक्ष करणाºया वाहनांवर कारवाई केली जाते; परंतु रस्त्यावर धावणाºया या स्कूल बस सापडत नसल्याचा अजब कारभार पाहायला मिळतो. या बस आढळल्यास जप्त केल्या जातील; परंतु यातील अनेक बस कालबाह्य झाल्याने रस्त्यावर धावत नसल्याची शक्यता व्यक्त करून आरटीओ अधिकारी मोकळे होत आहेत.पालकांनी सजग राहावेशालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महाराष्ट्र स्कूल बस अधिनियमनानुसार नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे; परंतु अनेक स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होत नसल्याचा प्रकार निलंबित केलेल्या परवान्यांवरून स्पष्ट होत आहे. शहरातील रस्त्यांवर जुन्या रंगरंगोटी करून केलेल्या स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होताना दिसते. चारचाकी वाहनांतून अवैधरीत्या विद्यार्थ्यांना कोंबून बसविले जाते. त्याकडे आरटीओ कार्यालयाचे लक्ष जाताना दिसत नाही. यातून एखाद्याला अपघाताच्या घटनेला सामोरे जाण्यापेक्षा पालकांनी सजग राहून आपल्या पाल्यांसाठी सर्व बाजूंची पडताळणी करून सुरक्षित वाहनांची निवड करण्याची गरज आहे.शालेय परिवहन समितीकागदावरचविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूलबस नियमावली तयार करण्यात आली आहे़, शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून सर्वच शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे आदेश आहे़; परंतु या आदेशाला अनेक शाळांनी केराची टोपली दाखवून परिवहन समितीला ठेंगा दाखविला आहे. दर तीन महिन्याला या समितीची बैठक होणे आवश्यक आहे; परंतु बैठकीची माहिती आरटीओ कार्यालयास कळविलीच जात नाही. त्यामुळे प्रत्येक शाळेसाठी नियुक्त केलेले मोटार वाहन निरीक्षकांना कामकाज पाहता येत नसल्याची माहिती आरटीओ कार्यालयाकडून मिळाली....तर परवाना रद्दतपासणीकडे दुर्लक्ष केल्याने चारचाकी ते बस अशा १०६ स्कूल बसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांची वाहतूक करता येणार नाही. शिवाय यादरम्यान तपासणी करून त्रुटींची पूर्तता करावी लागेल. अन्यथा परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाईल.-रमेशचंद्र खराडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारीविद्यार्थ्यांचा जीव धोक्यातस्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन उपकरणे, आसन व्यवस्था, खिडक्यांची, पायºयांची विशिष्ट रचना, वेग नियंत्रक आदी गोष्टी आवश्यक ठरतात; परंतु अनेक स्कूलबस नियम पायदळी तुडवून धावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येतो. तपासणीकडे दुर्लक्ष करणाºया स्कूलबसमध्ये अनेक त्रुटी राहण्याची शक्यता असते.