शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

विद्यापीठाच्या पुढील सत्राच्या पदवी परीक्षा १५ मे पर्यंत संपवून ३० दिवसांत निकालाचे नियोजन

By योगेश पायघन | Updated: January 11, 2023 12:18 IST

पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यासाठी उपाययोजना

औरंगाबादपुढील वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक सुरळीत व वेळेत सुरू करण्यासाठी डाॅ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आत्तापासून तयारी सुरू केली आहे. मार्चमध्ये बारावीच्या परीक्षा झाल्यावर पदवी परीक्षा सुरू करून १५ मे पर्यंत सर्व पदवी परीक्षा घेवू. सर्व निकाल ३० दिवसांच्या आत लावून जुन महिन्यात सर्व निकाल जाहीर होतील. तर जुलैपासून द्वितीय व तृतीय वर्षाचे शिकवणी वर्ग सुरू होतील. तर प्रथम वर्षाच्या प्रवेशानंतर महिनाभरात तेही वर्ग सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे. अशी माहीती कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी दिली.

मुंबईत नुकतीच राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कुलगुरूंची (जेबीव्हीसी) बैठक पार पडली. या बैठकीत आगामी शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे. परीक्षा व निकालांचे सामायिक वेळापत्रक तयार करणे यांसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले. आता पदवी परिक्षांचे नियोजन विद्यापीठ करत असून आहे. जेबीव्हीसीत दिलेल्या सुचनेच्या अनुशंगाने विद्यापीठात सोमवारी कुलगुरूंनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत नियोजनासंबंधी सुचना दिल्या.

१२ जानेवारी निकालाचा दुसरा टप्पापदवी परीक्षांचे पहिल्या टप्प्यात ४ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले. दुसऱ्या टप्प्यातील निकाल १२ जानेवारी रोजी जाहीर होतील. गेल्यावर्षी ९१ टक्के निकाल ३० दिवसांच्या आत लागले होते. यावर्षी १०० टक्के निकाल वेळेत लावण्याच प्रयत्न आहेत. असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

आणखी ३९ महाविद्यालयांची होणार तपासणीपुढील शैक्षणिक वर्षांच्या सलग्नीकरणासाठी नॅक ३१ मार्चपुर्वी आवश्यक आहे. विस्तारिकरण, तुकडीवाढीसाठी ३५ प्रस्ताव आले आहेत. मात्र, नॅक, प्राचार्य, ५० टक्के पेक्षा अधिक मान्यताप्राप्त मनुष्यबळ असेल तरच त्यांचे प्रस्ताव शासनाला पाठवणार आहोत. अकॅडमिक ऑडिटमध्ये दुसरा टप्पा सुरू करत आहोत. पहिल्या टप्प्यात २५ महाविद्यालयांतील भाैतिक सुविधांच्या पडताळणीसाठी समिती पाठवल्या. त्यांचे अहवाल येतील. आता पुढील टप्प्यात ३९ महाविद्यालयांची तपासणीला सुरूवात होईल. असे कुलगुरूंनी सांगितले.

३५ टक्के जागा जागा रिक्तपदवी महाविद्यालयात ३५ टक्के जागा गेल्या तीन वर्षांपासुन रिक्त राहत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने एकही नवे महाविद्यालय नको. असा प्रस्ताव पाठवला होता. तरीही ८ नवे स्थळबिंदू निश्चित झाले. राज्यात सर्वात कमी बिंदू विद्यापीठ कार्यक्षेत्रात दिल्याने या निर्णयाचे स्वागत केले आहे. असे कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद