शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

विद्यापीठाच्या पुढील सत्राच्या पदवी परीक्षा १५ मे पर्यंत संपवून ३० दिवसांत निकालाचे नियोजन

By योगेश पायघन | Updated: January 11, 2023 12:18 IST

पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यासाठी उपाययोजना

औरंगाबादपुढील वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक सुरळीत व वेळेत सुरू करण्यासाठी डाॅ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आत्तापासून तयारी सुरू केली आहे. मार्चमध्ये बारावीच्या परीक्षा झाल्यावर पदवी परीक्षा सुरू करून १५ मे पर्यंत सर्व पदवी परीक्षा घेवू. सर्व निकाल ३० दिवसांच्या आत लावून जुन महिन्यात सर्व निकाल जाहीर होतील. तर जुलैपासून द्वितीय व तृतीय वर्षाचे शिकवणी वर्ग सुरू होतील. तर प्रथम वर्षाच्या प्रवेशानंतर महिनाभरात तेही वर्ग सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे. अशी माहीती कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी दिली.

मुंबईत नुकतीच राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कुलगुरूंची (जेबीव्हीसी) बैठक पार पडली. या बैठकीत आगामी शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे. परीक्षा व निकालांचे सामायिक वेळापत्रक तयार करणे यांसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले. आता पदवी परिक्षांचे नियोजन विद्यापीठ करत असून आहे. जेबीव्हीसीत दिलेल्या सुचनेच्या अनुशंगाने विद्यापीठात सोमवारी कुलगुरूंनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत नियोजनासंबंधी सुचना दिल्या.

१२ जानेवारी निकालाचा दुसरा टप्पापदवी परीक्षांचे पहिल्या टप्प्यात ४ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले. दुसऱ्या टप्प्यातील निकाल १२ जानेवारी रोजी जाहीर होतील. गेल्यावर्षी ९१ टक्के निकाल ३० दिवसांच्या आत लागले होते. यावर्षी १०० टक्के निकाल वेळेत लावण्याच प्रयत्न आहेत. असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

आणखी ३९ महाविद्यालयांची होणार तपासणीपुढील शैक्षणिक वर्षांच्या सलग्नीकरणासाठी नॅक ३१ मार्चपुर्वी आवश्यक आहे. विस्तारिकरण, तुकडीवाढीसाठी ३५ प्रस्ताव आले आहेत. मात्र, नॅक, प्राचार्य, ५० टक्के पेक्षा अधिक मान्यताप्राप्त मनुष्यबळ असेल तरच त्यांचे प्रस्ताव शासनाला पाठवणार आहोत. अकॅडमिक ऑडिटमध्ये दुसरा टप्पा सुरू करत आहोत. पहिल्या टप्प्यात २५ महाविद्यालयांतील भाैतिक सुविधांच्या पडताळणीसाठी समिती पाठवल्या. त्यांचे अहवाल येतील. आता पुढील टप्प्यात ३९ महाविद्यालयांची तपासणीला सुरूवात होईल. असे कुलगुरूंनी सांगितले.

३५ टक्के जागा जागा रिक्तपदवी महाविद्यालयात ३५ टक्के जागा गेल्या तीन वर्षांपासुन रिक्त राहत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने एकही नवे महाविद्यालय नको. असा प्रस्ताव पाठवला होता. तरीही ८ नवे स्थळबिंदू निश्चित झाले. राज्यात सर्वात कमी बिंदू विद्यापीठ कार्यक्षेत्रात दिल्याने या निर्णयाचे स्वागत केले आहे. असे कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद