शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

खरिपासाठी सव्वालाख मेट्रिक टन खताचा प्रस्ताव

By admin | Updated: May 14, 2017 00:34 IST

लातूर : गतवर्षीप्रमाणे यंदाही वेळेवर आणि अपेक्षित पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची लगबग सुरू केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : गतवर्षीप्रमाणे यंदाही वेळेवर आणि अपेक्षित पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची लगबग सुरू केली आहे़ या हंगामासाठी कृषी विभागही सज्ज झाला असून, १ लाख २६ हजार ४९० मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे़ गतवर्षीचा आणि गत महिन्यात पुरवठा झालेला एकूण ३५ हजार ७१० मेट्रिक टन खत सध्या उपलब्ध आहे़गतवर्षी भीषण दुष्काळ असतानाही उन्हाची तीव्रता मात्र अधिक जाणवत नव्हती़ परंतु, यंदा पाणी उपलब्ध असतानाही उन्हाची तीव्रता वाढली आहे़ तापमानाचा पारा ४२ अंशाच्या पुढे गेला आहे़ अशा परिस्थितीतही शेतकरी सध्या खरीप हंगामाची जोरदार तयारी करीत आहेत़ सध्या शेतीतील नांगरणी, मोगडणे, कुळवणे, धसकट वेचणे आदी मशागतीची कामे सुरू आहेत़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा या यंत्राद्वारे नांगरणीचा दरही वाढला आहे़ खरीप हंगाम जवळ येऊ लागल्याने अधिक शेती असलेल्या शेतकऱ्यांकडून हंगामातील साहित्याची जुळवाजुळवही सुरू केली आहे़जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे़ खरीप हंगामासाठी कृषी विभागही सज्ज झाला असून, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या हंगामासाठी १ लाख २६ हजार ४९० मेट्रिक टन खताचा प्रस्ताव सादर केला आहे़ आयुक्तांकडून ६० हजार ३०० मेट्रिक टन रासायनिक खतास मंजुरी मिळाली आहे़ गतवर्षीचा २८ हजार ८९८ मेट्रिक टन खत शिल्लक आहे़ तर गत महिन्यात ६ हजार ८१२ मेट्रिक टन खत उपलब्ध झाला आहे़