शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी मंडळ वाचविण्यासाठी औरंगाबादमध्ये हमाल एकवटले; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 18:17 IST

‘जिल्हास्तरीय माथाडी मंडळाची कार्यालय राहिलच पाहिजे’, ‘ कायद्या आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा’, ‘माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे’ असा आवाज बुलंद करीत जिल्ह्यातील सर्व हमाल,कष्टकरी एकवटले होते. या मोर्चात महिलांची संख्याही वाखाणण्याजोगी ठरली. 

औरंगाबाद : ‘जिल्हास्तरीय माथाडी मंडळाची कार्यालय राहिलच पाहिजे’, ‘ कायद्या आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा’, ‘माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे’ असा आवाज बुलंद करीत जिल्ह्यातील सर्व हमाल,कष्टकरी एकवटले होते. या मोर्चात महिलांची संख्याही वाखाणण्याजोगी ठरली. 

महाराष्ट्र हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने मंगळवारी राज्यभर एकाच दिवशीचा संप पुकारण्यात आला होता. यास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजता मोर्चासाठी हमाल,कष्टकरी क्रांतीचौक येथे जपले होते. अनेकांच्या हातात लाल झेंडे होते तसेच दुसर्‍या हातात फलकही होते. जिल्ह्यातील माथाडी मंडळाचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याने सर्व हमाल संतापलेले होते. माथाडी कायद्याची प्रशासन काटेकोरपणे अंमलबजावणी करीत नाही आणि दुसरीकडे सरकार प्रत्येक जिल्ह्यात असलेले माथाडी मंडळाचे विलनीकरण करण्याचा घाट घालत असून यास आमचा विरोध आहे. जोपर्यंत निर्णय रद्द करीत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवणार असा निर्धार यावेळी मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस देविदास किर्तीशाही यांनी करताचा सर्वांनी सरकार विरोधी घोषणा देत त्यांना जोरदार पाठींबा दिला. मोर्चा  पैठणगेट, गुलमंडी,  सिटीचौक, सराफा रोड, चेलीपुरामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी महामंडळाच्या पाच पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मागण्याचे निवेदन दिले.  मोर्चाचे रुपांतर सभेत झाले, ‘हमसब एक है’ अशा घोषणा देत हमालांनी सुरुवातीपासून ते मोर्चा समाप्तीपर्यंतची आपली एकजूट कायम ठेवली. 

तर राज्यव्यापी बेमुदत बंदचा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी राज्यशासनाला इशारा दिला की, ३६ माथाडी मंडळाच्या विलीनीकरण करुन एकच राज्यव्यापी मंडळ ठेवण्याचा निर्णय रद्द केला नाही तर येत्या काळात आम्ही बेमुदत बंद करू. कोणत्याही परिस्थिती आम्ही जिल्ह्यातील माथाडी मंडळे बंद करु देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

हमाल मापाडी महामंडळाचे म्हणणे१) माथाडी कायदा हमालांना सामाजिक सुरक्षा प्रदान करतो. २)राज्यातील ३६ माथाडी मंडळ रद्द करु नका.३) माथाडी कायद्याच्या अंमलबजावणी समितीमध्ये कामगार व मालक संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करावा. ४) माथाडी कामगारांनी दिलेल्या तक्रारीचा निपटारा एका महिन्यात करावा.५) नोंदीत पण बेकायदेशीरपणे काढून टाकलेल्या माथाडींना पुन्हा कामावर घ्यावे. ६) मजुरीवरील किमान लेव्ही ४० टक्के करावी.