शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

माथाडी मंडळ वाचविण्यासाठी औरंगाबादमध्ये हमाल एकवटले; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 18:17 IST

‘जिल्हास्तरीय माथाडी मंडळाची कार्यालय राहिलच पाहिजे’, ‘ कायद्या आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा’, ‘माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे’ असा आवाज बुलंद करीत जिल्ह्यातील सर्व हमाल,कष्टकरी एकवटले होते. या मोर्चात महिलांची संख्याही वाखाणण्याजोगी ठरली. 

औरंगाबाद : ‘जिल्हास्तरीय माथाडी मंडळाची कार्यालय राहिलच पाहिजे’, ‘ कायद्या आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा’, ‘माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे’ असा आवाज बुलंद करीत जिल्ह्यातील सर्व हमाल,कष्टकरी एकवटले होते. या मोर्चात महिलांची संख्याही वाखाणण्याजोगी ठरली. 

महाराष्ट्र हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने मंगळवारी राज्यभर एकाच दिवशीचा संप पुकारण्यात आला होता. यास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजता मोर्चासाठी हमाल,कष्टकरी क्रांतीचौक येथे जपले होते. अनेकांच्या हातात लाल झेंडे होते तसेच दुसर्‍या हातात फलकही होते. जिल्ह्यातील माथाडी मंडळाचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याने सर्व हमाल संतापलेले होते. माथाडी कायद्याची प्रशासन काटेकोरपणे अंमलबजावणी करीत नाही आणि दुसरीकडे सरकार प्रत्येक जिल्ह्यात असलेले माथाडी मंडळाचे विलनीकरण करण्याचा घाट घालत असून यास आमचा विरोध आहे. जोपर्यंत निर्णय रद्द करीत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवणार असा निर्धार यावेळी मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस देविदास किर्तीशाही यांनी करताचा सर्वांनी सरकार विरोधी घोषणा देत त्यांना जोरदार पाठींबा दिला. मोर्चा  पैठणगेट, गुलमंडी,  सिटीचौक, सराफा रोड, चेलीपुरामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी महामंडळाच्या पाच पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मागण्याचे निवेदन दिले.  मोर्चाचे रुपांतर सभेत झाले, ‘हमसब एक है’ अशा घोषणा देत हमालांनी सुरुवातीपासून ते मोर्चा समाप्तीपर्यंतची आपली एकजूट कायम ठेवली. 

तर राज्यव्यापी बेमुदत बंदचा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी राज्यशासनाला इशारा दिला की, ३६ माथाडी मंडळाच्या विलीनीकरण करुन एकच राज्यव्यापी मंडळ ठेवण्याचा निर्णय रद्द केला नाही तर येत्या काळात आम्ही बेमुदत बंद करू. कोणत्याही परिस्थिती आम्ही जिल्ह्यातील माथाडी मंडळे बंद करु देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

हमाल मापाडी महामंडळाचे म्हणणे१) माथाडी कायदा हमालांना सामाजिक सुरक्षा प्रदान करतो. २)राज्यातील ३६ माथाडी मंडळ रद्द करु नका.३) माथाडी कायद्याच्या अंमलबजावणी समितीमध्ये कामगार व मालक संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करावा. ४) माथाडी कामगारांनी दिलेल्या तक्रारीचा निपटारा एका महिन्यात करावा.५) नोंदीत पण बेकायदेशीरपणे काढून टाकलेल्या माथाडींना पुन्हा कामावर घ्यावे. ६) मजुरीवरील किमान लेव्ही ४० टक्के करावी.