शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

माथाडी मंडळ वाचविण्यासाठी औरंगाबादेत हमाल एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:59 IST

‘जिल्हास्तरीय माथाडी मंडळाचे कार्यालय राहिलेच पाहिजे’, ‘कायदा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा’, ‘माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे,’ असा आवाज बुलंद करीत जिल्ह्यातील सर्व हमाल, कष्टकरी एकवटले होते. या मोर्चात महिलांची संख्याही लक्षणीय ठरली.

ठळक मुद्देमोर्चा : ‘कायदा आमच्या हक्काचा’ म्हणत कष्टकºयांनी केला आवाज बुलंद; मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘जिल्हास्तरीय माथाडी मंडळाचे कार्यालय राहिलेच पाहिजे’, ‘कायदा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा’, ‘माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे,’ असा आवाज बुलंद करीत जिल्ह्यातील सर्व हमाल, कष्टकरी एकवटले होते. या मोर्चात महिलांची संख्याही लक्षणीय ठरली.महाराष्ट्र हमाल मापाडी महामंडळातर्फे मंगळवारी पुकारलेल्या राज्यस्तरीय संपाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजता मोर्चासाठी हमाल, कष्टकरी क्रांतीचौक येथे जमले होते. अनेकांच्या हातात लाल झेंडे व घोषणा फलकही होते.जिल्ह्यातील माथाडी मंडळाचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याने सर्व हमाल संतापलेले होते. माथाडी कायद्याची प्रशासन काटेकोरपणे अंमलबजावणी करीत नाही आणि दुसरीकडे सरकार जिल्हा माथाडी मंडळाचे विलीनीकरण करण्याचा घाट घालत असून, यास आमचा विरोध आहे. जोपर्यंत निर्णय रद्द करीत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवणार, असा निर्धार मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस देवीदास कीर्तिशाही यांनी व्यक्त केला. सर्वांनी सरकारविरोधी घोषणा देत त्यांना जोरदार पाठिंबा दिला. मोर्चा पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, सराफा रोड, चेलीपुरामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.यावेळी महामंडळाच्या पाच पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले, ‘हम सब एक है’ अशा घोषणा देत हमालांनी एकजूट दाखवली....तर राज्यव्यापी बेमुदत बंदराज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी राज्य शासनाला इशारा दिला की, ३६ माथाडी मंडळांचे विलीनीकरण करून एकच राज्यव्यापी मंडळ ठेवण्याचा निर्णय रद्द केला नाही तर येत्या काळात बेमुदत बंद ठेवण्यात येईल.कोणत्याही परिस्थितीत आम्ही जिल्ह्यातील माथाडी मंडळ बंद करू देणार नाही.जाधववाडीत धान्याचे अडत व्यवहार ठप्पहमालांनी पुकारलेल्या संपाचा सर्वाधिक परिणाम जाधववाडीतील धान्याच्या अडत व्यवहारावर झाला. शेतकºयांनी आणलेले तूर, मका, ज्वारी, गव्हाचे पोते उचलण्यासाठी कोणी नव्हते. यामुळे शेतकºयांची अडचण झाली. हर्राशी होऊ शकली नाही. दिवसभरात दीड हजारांपेक्षा अधिक धान्याची पोती अडतमध्ये आली होती. ट्रॅक्टरवर पोती तशीच पडून होती.सेल हॉलमध्ये शुकशुकाट होता. महिनाभरात नवीन गव्हाची व ज्वारीची आवक सुरू होईल त्यावेळी हमालांनी बंद पुकाराला तर काय होईल, अशी चिंता अडत्यांनी व्यक्त केली.हमाल मापाडी महामंडळाचे म्हणणेमाथाडी कायदा हमालांना सामाजिक सुरक्षा प्रदान करतो.राज्यातील ३६ माथाडी मंडळे रद्द करू नका.माथाडी कायद्याच्या अंमलबजावणी समितीमध्ये कामगार व मालक संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करावा.माथाडी कामगारांनी दिलेल्या तक्रारीचा निपटारा एका महिन्यात करावा.नोंदीत पण बेकायदेशीरपणे काढून टाकलेल्या माथाडींना पुन्हा कामावर घ्यावे.मजुरीवरील किमान लेव्ही ४० टक्के करावी.