शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सॅटेलाइटमार्फत होत आहे दुष्काळाच्या तीव्रतेचे मोजमाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 05:55 IST

केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागातर्फे नॅशनल नेटवर्क प्रोग्राम आॅन इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी अँड अ‍ॅप्लिकेशन (निसा) प्रकल्प हाती घेतला आहे.

- राम शिनगारेऔरंगाबाद : दुष्काळाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यासाठी असलेल्या पैसेवारी पद्धतीचा अवलंब न करता, सॅटेलाइटद्वारे दुष्काळ, जमिनीचा पोत, हवामान बदल, पिकांवर पडणाऱ्या रोगांचे अचूक निदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जिओस्पॉटियल प्रयोगशाळेत करण्यात आले. या प्रयोगाची पीकविमा वाटप व दुष्काळाच्या तीव्रतेवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी मोठी मदत होईल, अशी माहिती प्रयोगशाळेचे संचालक डॉ. के. व्ही. काळे यांनी ‘लोकमत’ला दिली.

केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागातर्फे नॅशनल नेटवर्क प्रोग्राम आॅन इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी अँड अ‍ॅप्लिकेशन (निसा) प्रकल्प हाती घेतला आहे. यात शेतीसाठी महत्त्वाचे असलेले माती परीक्षण, जंगल, पीक, हवामान, दुष्काळ आदींची माहिती रिमोट सेन्सिंग, सॅटेलाइट आणि ड्रोनद्वारे केली जात आहे. या माहितीचे विश्लेषण विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागातील जिओस्पॉटियल प्रयोगशाळेत होेत आहे. या प्रकल्पात मुंबई, खडगपूर व तिरुअनंतपुरम आयआयटीआयच्या ४८ प्राध्यापकांचा सहभाग असून, त्यांचे सात गट करण्यात आले आहेत. डॉ. के. व्ही. काळे हे माहिती विश्लेषण गटाचे राष्ट्रीय पातळीवर सहसमन्वयक आहेत.

या जिओस्पॉटियल प्रयोगशाळेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील घायगाव, मस्की, जरुळ, खंडाळा, कोल्ही या पाच गावांची निवड करून, तेथील दुष्काळ सॅटेलाइटमार्फत मोजला. जून, २०१७ ते मार्च, २०१८ आणि जून, २०१८ व मार्च, २०१९ या कालावधीतील छायाचित्रे युरोपियन स्पेस एजन्सीच्या सॅटेलाइटद्वारे मिळविली. त्याचे विश्लेषण करण्यात आले. मातीच्या परीक्षणात मुख्यत्वे फॉस्फरस, कार्बन, मॅग्नेशियम, नायट्रोजन याचे प्रमाण अचूकपणे नोंदविण्यात आले. यातून तेथील उत्पादनक्षमता कमी होत चाललेली दिसून आल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.

हेच मॉडेल देशात सर्वत्र वापरण्यात येऊ शकते. त्यातून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी असलेल्या पीकविम्याचे योग्यपणे वाटप व कोणत्या टप्प्यावर नुकसान झाले त्याचेही विश्लेषण करता येऊ शकते, असेही ते म्हणाले. संशोधनासाठी महेश सोळणकर, संदीप गायकवाड, रूपाली सुरासे, अमरसिंह करपे, धनंजय नलावडे, हनुमंत गीते या संशोधक विद्यार्थ्यांसह ऐश्वर्या जंगम, श्रुती हिवाळे, दिव्या गाडे या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर काम केले .

---------‘महाराष्ट्रात टास्क फोर्स’द्वारे कार्यमहाराष्ट्रात कृषी आयुक्तांनी सॅटेलाईट आणि ड्रोनच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची नियुक्ती केली आहे. त्यातही डॉ. काळे असून, यात मराठवाड्यातील आठ, विदर्भातील सहा आणि नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यांचा समावेश आहे. १५ जिल्ह्यांतील ४ हजार गावांमध्ये सॅटेलाइट आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात पावले उचलण्यात येत आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळ