शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-देवळाईकरांना आता होतोय पश्चात्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:08 IST

सातारा देवळाई महापालिकेत समाविष्ट होऊन जनतेला कोणत्याही सेवा-सुविधा पुरविल्या जात नसल्याने नगर परिषदेतून मनपात गेल्याचा पश्चात्ताप परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनगर परिषदच हवी होती : पाणी, रस्ते, दिवे, ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांचा अभाव; मालमत्तांना दर येईना

साहेबराव हिवराळे।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा देवळाई महापालिकेत समाविष्ट होऊन जनतेला कोणत्याही सेवा-सुविधा पुरविल्या जात नसल्याने नगर परिषदेतून मनपात गेल्याचा पश्चात्ताप परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे. सुविधांच्या अभावामुळे मालमत्तांचे दरही खाली आले आहेत.सातारा-देवळाई ग्रामपंचायती नगर परिषदेत विलीन झाल्या. वॉर्ड रचना, आरक्षणदेखील घोषित झाले. विकासकामासाठी १०० कोटींचा निधी येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच नवीन नोटिफिकेशन जाहीर झाले अन् शहरालगतचे क्षेत्र असल्याने ते महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा करण्यात आली.सातारा-देवळाईतील नागरिकांनी शासनदरबारी व न्यायालयातही लढाई लडविली. मात्र, सातारा-देवळाई परिसराचा समावेश महापालिकेत झाला. दोन्ही वॉर्डांतून लोकप्रतिनिधी निवडून दिले. मात्र, परिसरातून मालमत्ता कर वसुलीशिवाय इतर सेवा-सुविधा देण्यावर मनपाचे लक्ष नाही.तीन वर्षांचा कालावधी उलटूनही आमदार निधीशिवाय मनपाने विकासकामावर खर्च केला नाही. त्यामुळे टोलेजंग इमारतीकडे पाहत नागरिकांना चिखलातून वाट काढीत घर गाठावे लागतेय. रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज या मूलभूत सेवेसाठी सतत संघर्षाची भूमिका नागरिकांना पार पाडावी लागते. सेप्टिक टँकचे सांडपाणी रस्त्यावर, मोकळ्या प्लॉटवर तुंबल्याने रोगराईची भीती सतत आहे.वीजपुरवठा सतत खंडितशहरात असूनदेखील दररोज खेड्यातील लोडशेडिंगसारखे सातारा-देवळाईकरांंना वीज गुल होण्याचा अनुभव येतो. संपर्क करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत. उन्हाळ्यात उकाडा व डासांच्या त्रासात रात्र घालवावी लागते, अशी खंत जितेंद्र जैस्वाल यांनी व्यक्त केली.खेड्यांतील रस्ते गुळगुळीत झाले आहेत; परंतु सातारा-देवळाईकरांना देण्यात आलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची प्रतीक्षा आहे. विकासकामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी प्रदीप जाधव यांनी केली.आंदोलनाच्या पवित्र्यातसेवा-सुविधा पुरवाव्यात, अन्यथा सातारा-देवळाई संघर्ष समिती नगर परिषदेच्या मागणीसाठी आंदोलन उभारेल, असा इशारा पद्मसिंह राजपूत, राहुल सिरसाठ, सोमीनाथ शिराणे, इम्रान पटेल, आबासाहेब देशमुख, रामेश्वर पेंढारे, रणजित ढेपे, शिवाजी हिवाळे, रमेश बाहुले, नीलेश चाबूकस्वार यांनी दिला आहे.मनपापेक्षा नगर परिषद बरीयेथे ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषदेकडून दरवर्षी टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जात होता. नगर परिषदेनेदेखील केला; परंतु मनपा मोफत टँकर देत नाही, पैसे भरूनही ते पाठवीत नाही. नाईलाजाने खाजगी टँकरवर तहान भागवावी लागते. मनपापेक्षा नगर परिषद बरी म्हणण्याची वेळ आली आहे, असे एकनाथ काळे म्हणाले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीelectricityवीज