शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सातारा-देवळाईकरांना आता होतोय पश्चात्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:08 IST

सातारा देवळाई महापालिकेत समाविष्ट होऊन जनतेला कोणत्याही सेवा-सुविधा पुरविल्या जात नसल्याने नगर परिषदेतून मनपात गेल्याचा पश्चात्ताप परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनगर परिषदच हवी होती : पाणी, रस्ते, दिवे, ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांचा अभाव; मालमत्तांना दर येईना

साहेबराव हिवराळे।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा देवळाई महापालिकेत समाविष्ट होऊन जनतेला कोणत्याही सेवा-सुविधा पुरविल्या जात नसल्याने नगर परिषदेतून मनपात गेल्याचा पश्चात्ताप परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे. सुविधांच्या अभावामुळे मालमत्तांचे दरही खाली आले आहेत.सातारा-देवळाई ग्रामपंचायती नगर परिषदेत विलीन झाल्या. वॉर्ड रचना, आरक्षणदेखील घोषित झाले. विकासकामासाठी १०० कोटींचा निधी येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच नवीन नोटिफिकेशन जाहीर झाले अन् शहरालगतचे क्षेत्र असल्याने ते महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा करण्यात आली.सातारा-देवळाईतील नागरिकांनी शासनदरबारी व न्यायालयातही लढाई लडविली. मात्र, सातारा-देवळाई परिसराचा समावेश महापालिकेत झाला. दोन्ही वॉर्डांतून लोकप्रतिनिधी निवडून दिले. मात्र, परिसरातून मालमत्ता कर वसुलीशिवाय इतर सेवा-सुविधा देण्यावर मनपाचे लक्ष नाही.तीन वर्षांचा कालावधी उलटूनही आमदार निधीशिवाय मनपाने विकासकामावर खर्च केला नाही. त्यामुळे टोलेजंग इमारतीकडे पाहत नागरिकांना चिखलातून वाट काढीत घर गाठावे लागतेय. रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज या मूलभूत सेवेसाठी सतत संघर्षाची भूमिका नागरिकांना पार पाडावी लागते. सेप्टिक टँकचे सांडपाणी रस्त्यावर, मोकळ्या प्लॉटवर तुंबल्याने रोगराईची भीती सतत आहे.वीजपुरवठा सतत खंडितशहरात असूनदेखील दररोज खेड्यातील लोडशेडिंगसारखे सातारा-देवळाईकरांंना वीज गुल होण्याचा अनुभव येतो. संपर्क करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत. उन्हाळ्यात उकाडा व डासांच्या त्रासात रात्र घालवावी लागते, अशी खंत जितेंद्र जैस्वाल यांनी व्यक्त केली.खेड्यांतील रस्ते गुळगुळीत झाले आहेत; परंतु सातारा-देवळाईकरांना देण्यात आलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची प्रतीक्षा आहे. विकासकामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी प्रदीप जाधव यांनी केली.आंदोलनाच्या पवित्र्यातसेवा-सुविधा पुरवाव्यात, अन्यथा सातारा-देवळाई संघर्ष समिती नगर परिषदेच्या मागणीसाठी आंदोलन उभारेल, असा इशारा पद्मसिंह राजपूत, राहुल सिरसाठ, सोमीनाथ शिराणे, इम्रान पटेल, आबासाहेब देशमुख, रामेश्वर पेंढारे, रणजित ढेपे, शिवाजी हिवाळे, रमेश बाहुले, नीलेश चाबूकस्वार यांनी दिला आहे.मनपापेक्षा नगर परिषद बरीयेथे ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषदेकडून दरवर्षी टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जात होता. नगर परिषदेनेदेखील केला; परंतु मनपा मोफत टँकर देत नाही, पैसे भरूनही ते पाठवीत नाही. नाईलाजाने खाजगी टँकरवर तहान भागवावी लागते. मनपापेक्षा नगर परिषद बरी म्हणण्याची वेळ आली आहे, असे एकनाथ काळे म्हणाले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीelectricityवीज