शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच हत्येप्रकरणी राजकीय भूमिकेपेक्षा संवेदनशीलता महत्वाची; पंकजा मुंडेंचा धसांवर निशाणा

By बापू सोळुंके | Updated: January 11, 2025 19:11 IST

कोणत्याही घटनेचे राजकारण करणाऱ्यांसाठी अशा घटना एक मंचच असतो: पंकजा मुंडे

छत्रपती संभाजीनगर: संतोष देशमुख खून प्रकरण राजकीय भूमिका घेण्यापेक्षा संवेदनशील पध्दतीने हाताळले असते तर बरं झाले असते. या घटनेची ज्या पद्धतीने मांडणी केली, त्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला. बीडचे लोक स्वाभिमानी आहेत, उसतोड करुन पोट भरतात, कोणत्याही घटनेचे राजकारण करणाऱ्यांसाठी अशा घटना एक मंचच असतो, अशा शब्दात राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली.

मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंंत्री मुंडे म्हणाल्या की, पशुसवंर्धन आणि पर्यावरण विभागात खूप आव्हानात्मक काम आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली, यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असता, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत. त्यांनी कारवाई केली असेल तर माझी काय प्रतिक्रिया असेल, असा प्रतिसवाल त्यांनी केला. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी आपण सर्वप्रथम केली होती. 

संतोष देशमुख खून प्रकरणावरून बीड जिल्ह्याला बदनाम केले जात आहे का, असे  विचारले असता ते म्हणाले की, कोणतीही घटना होऊ दे, अशा घटनांमध्ये ज्यांना राजकारण करायचे त्यांच्यासाठी हा एक मंचच आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबतीत अजित दादा यांनी प्रतिक्रिया दिली असेल तर या विषयावर मी प्रतिक्रीया नोंदवणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रदूषण विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणारप्रदूषण हा ग्लोबल विषय आहे. प्रदूषणाचा विषयावर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे मंत्री पंकजा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, काही ठिकाणी हवेचे तर काही ठिकाणी पाणी प्रदूषणाचा जास्त आहे. प्रदूषण करणाऱ्या लोकांना नोटीसा देण्यात येइल. ज्यांनी कामात कचुराई केली, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नदी पुनरूज्जीवनाचे काम करण्यात येणार आहे.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSuresh Dhasसुरेश धसPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड