शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

सरपंच हत्येप्रकरणी राजकीय भूमिकेपेक्षा संवेदनशीलता महत्वाची; पंकजा मुंडेंचा धसांवर निशाणा

By बापू सोळुंके | Updated: January 11, 2025 19:11 IST

कोणत्याही घटनेचे राजकारण करणाऱ्यांसाठी अशा घटना एक मंचच असतो: पंकजा मुंडे

छत्रपती संभाजीनगर: संतोष देशमुख खून प्रकरण राजकीय भूमिका घेण्यापेक्षा संवेदनशील पध्दतीने हाताळले असते तर बरं झाले असते. या घटनेची ज्या पद्धतीने मांडणी केली, त्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला. बीडचे लोक स्वाभिमानी आहेत, उसतोड करुन पोट भरतात, कोणत्याही घटनेचे राजकारण करणाऱ्यांसाठी अशा घटना एक मंचच असतो, अशा शब्दात राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली.

मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंंत्री मुंडे म्हणाल्या की, पशुसवंर्धन आणि पर्यावरण विभागात खूप आव्हानात्मक काम आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली, यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असता, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत. त्यांनी कारवाई केली असेल तर माझी काय प्रतिक्रिया असेल, असा प्रतिसवाल त्यांनी केला. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी आपण सर्वप्रथम केली होती. 

संतोष देशमुख खून प्रकरणावरून बीड जिल्ह्याला बदनाम केले जात आहे का, असे  विचारले असता ते म्हणाले की, कोणतीही घटना होऊ दे, अशा घटनांमध्ये ज्यांना राजकारण करायचे त्यांच्यासाठी हा एक मंचच आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबतीत अजित दादा यांनी प्रतिक्रिया दिली असेल तर या विषयावर मी प्रतिक्रीया नोंदवणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रदूषण विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणारप्रदूषण हा ग्लोबल विषय आहे. प्रदूषणाचा विषयावर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे मंत्री पंकजा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, काही ठिकाणी हवेचे तर काही ठिकाणी पाणी प्रदूषणाचा जास्त आहे. प्रदूषण करणाऱ्या लोकांना नोटीसा देण्यात येइल. ज्यांनी कामात कचुराई केली, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नदी पुनरूज्जीवनाचे काम करण्यात येणार आहे.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSuresh Dhasसुरेश धसPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड