शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सरपंच,ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:53 IST

नांदेड: शौचालय बांधकामाच्या थंडावलेल्या मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेने आता सरपंच व ग्रामसेवकांवर जबाबदारी टाकली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शौचालय बांधकामाच्या थंडावलेल्या मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेने आता सरपंच व ग्रामसेवकांवर जबाबदारी टाकली आहे़ शंभर टक्के उद्दिष्टासाठी पुढील काही महिन्यांत सुमारे २ लाख २० हजार शौचालयांचे बांधकाम करावे लागणार असून गाव हागणदारीमुक्त न झाल्यास सरपंच व ग्रामसेवकांना जबाबदार धरण्यात येणार आहे़ प्रत्येक सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उर्वरित शौचालय बांधून जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे़ जिल्ह्याचे उद्दिष्ट ४ लाख ३६ हजार ५१३ असून त्यापैकी २ लाख ११ हजार ४३९ शौचालय पूर्ण झाले आहेत़ २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात येणार असून त्यासाठी तयारी सुरु आहे़ दरम्यान, अर्धापूर व मुदखेडनंतर आता भोकर, उमरी, हदगाव, हिमायतनगर, धर्माबाद ही तालुके शंभर टक्के हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहेत़, परंतु उर्वरित तालुक्यांत अजूनही शौचालयांची कामे रखडली आहेत़ त्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांना प्रशासनाने पत्र देऊन गाव हागणदारीमुक्तीची संपूर्ण जबाबदारी सोपविली आहे़ जिल्हा हागणदारीमुक्त करायचा आहे़ मात्र याकडे काही सरपंच व ग्रामसेवकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे़ यापुढे गाव हागणदारीमुक्त न झाल्यास स्वस्त धान्य दुकानातून कोणत्याही प्रकारचे धान्य मिळणार नाही़ वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभही घेता येणार नाही़ तसेच मतदानही करता येणार नाही़, असे नमूद केले आहे़