शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

निराधार योजनेचा बट्ट्याबोळ; पैसे असूनही लाभार्थी वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:33 IST

संजय गांधी निराधार योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून, खात्यात पैसे असूनही शेकडो लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत.

- स.सो. खंडाळकर  

औरंगाबाद : युती शासनाच्या काळात संजय गांधी निराधार योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून, खात्यात पैसे असूनही शेकडो लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत. यात वयोवृद्ध लाभार्थ्यांचे कंबरडे रोज रोज बँकेत जाऊन व बँकेने टोलवाटोलवी केली की, पुन्हा संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात चकरा मारून मारून मोडत आहे. 

‘अकाऊंट ब्लॉकड्’ असे शेरे मारलेले कागद हातात घेऊन हे लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार भवनात रोजच येत आहेत. याच आधार भवनात संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय आहे. तेथे कर्मचाऱ्यांची प्रचंड वानवा आहे. पूर्णवेळ  तहसीलदार नाही.  सतत बैठका होण्याचा सिलसिला नाही.  

पासबुकही देत नाहीत... सुमारे चार हजार लाभार्थ्यांना बँक पासबुकच द्यायला तयार नसल्याची धक्कादायक माहिती ऐकावयास मिळाली. ३० लाभार्थ्यांच्या खात्यात त्यांच्या मानधनाचे पैसे जमा आहेत; परंतु येनकेनप्रकारेण बँक द्यायला तयार नसल्याने अनेक लाभार्थी या लाभापासून गेले नऊ महिन्यांपासून वंचित आहेत. ‘अब मरने को आ गये. तोभी पैसे नहीं मिल रहे है,’ अशा शब्दात आपला संताप एका लाभार्थ्याने व्यक्त केला. 

जिथे काम जास्त तेथेच कर्मचारी कमीस्वत: जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची गरज आहे. बँकेतून काही अडवणूक होत असेल तर बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावली पाहिजे, संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयानेच असा कोणता गुन्हा केला आहे की, येथे पुरेसे कर्मचारी नाहीत. जिथे काम जास्त आहे, जे काम आशीर्वाद घेण्याचे आहे, माणुसकीचे आहे, निराधारांना आधार देण्याचे आहे, तेथे कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या! हेच का ते पारदर्शक व सक्षम प्रशासन? असा सवाल उपस्थित होत आहे. 

पेट्रोलचे भाव रोज वाढत आहेत. आॅटोने येणे-जाणे परवडत नाही. घरून पायीच निघतो आणि कधी बँकेत तर कधी आधार भवनात चकरा मारून जाण्यातच आमचा दिवस जातो; पण काम काही होत नाही, असे एकाआजीबाईने सांगितले. या निराधारांना न्याय मिळाला नाही तर त्यांना सोबत घेऊन आपण आता बेमुदत उपोषणास बसणार आहोत, अशी घोषणा समितीचे माजी अध्यक्ष तकी हसन खान यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादgovernment schemeसरकारी योजना