शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

गाळ उपशाच्या नावाखाली ‘गिरिजा’तून वाळू तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:58 IST

तालुक्यातील गिरिजा मध्यम प्रकल्पात सध्या गाळ उपसा सुरू असून गाळ उपशाच्या नावाखाली सर्रास वाळूचा उपसा करण्यात येत असून दररोज शेकडो ट्रॅक्टर व टिप्परने वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. याबाबत पाटबंधारे सिंचन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे ‘दुर्लक्ष’ होत असल्याने वाळूचा हा गोरखधंदा बिनदिक्कत सुरू आहे.

सुनील घोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : तालुक्यातील गिरिजा मध्यम प्रकल्पात सध्या गाळ उपसा सुरू असून गाळ उपशाच्या नावाखाली सर्रास वाळूचा उपसा करण्यात येत असून दररोज शेकडो ट्रॅक्टर व टिप्परने वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. याबाबत पाटबंधारे सिंचन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे ‘दुर्लक्ष’ होत असल्याने वाळूचा हा गोरखधंदा बिनदिक्कत सुरू आहे.तालुक्यातील सर्वात मोठा गिरिजा मध्यम प्रकल्प असून हा प्रकल्प कोरडाठाक पडल्याने पाटबंधारे सिंचन विभागाने या प्रकल्पातून शेतकऱ्यांना गाळ पेरा नेण्याचे आवाहन केले. परंतु परिसरातील काही वाळू तस्करांनी महसूल व पोलीस प्रशासनास हाताशी धरून गाळ ऐवजी सर्रास दिवसरात्र वाळू उपसा करण्याचे काम सुरु केले आहे. या प्रकल्पातून गाळ कमी आणि वाळूच जास्त उपसा करीत असल्याचे चित्र दिसत आहे. रात्री तर वाळूचा गोरखधंदा मोठा तेजीत सुरू असतो. तालुका प्रशासनास वाळू तस्करांनी हाताशी धरून गिरिजा प्रकल्पाचे लचके तोडण्याचे काम हाती घेतले आहे. आमच्या प्रतिनिधीने शुक्रवारी दुपारी बारा वाजता गिरिजा मध्यम प्रकल्पात फेरफटका मारला असता प्रकल्पातील पाणीपुरवठा योजनेच्या पंपिंग हाऊसजवळील एका विहिरीवर दोन ट्रॅक्टर वाळूचे भरलेले होते व त्यातील वाळू पाण्याने धुतली जात होती. तसेच प्रकल्पात एका बाजूस सर्रास वाळूचा उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरली जात होती. तर दुसºया बाजूने मशिनरीने गाळ उपसा करून तो ट्रॅक्टरमध्ये भरला जात होता. या गैरकामाचे फोटो काढताच ही प्रक्रिया लागलीच थांबली.४या गोरखधंद्याबद्दल पोलीस पाटलांनी उपविभागीय पोलीस अधिकाºयांना लेखी माहिती दिली. गावातीलच वाळू तस्कर असल्याने ग्रामस्थही काही बोलत नाही. मात्र गिरिजा प्रकल्पातील वाळूचा उपसा करून या प्रकल्पाची चाळणी करण्याचे काम काही लोक करीत आहेत. त्याचबरोबर कुठलीही परवानगी नसताना सर्रास वाळूचा उपसा करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करून वाळूचा हा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. मात्र पाटबंधारे सिंचन विभाग, महसूल व पोलीस प्रशासन कुठलीच कारवाई करीत नसल्याबद्दल तालुक्यात याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नूतन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई