शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

गाळ उपशाच्या नावाखाली ‘गिरिजा’तून वाळू तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:58 IST

तालुक्यातील गिरिजा मध्यम प्रकल्पात सध्या गाळ उपसा सुरू असून गाळ उपशाच्या नावाखाली सर्रास वाळूचा उपसा करण्यात येत असून दररोज शेकडो ट्रॅक्टर व टिप्परने वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. याबाबत पाटबंधारे सिंचन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे ‘दुर्लक्ष’ होत असल्याने वाळूचा हा गोरखधंदा बिनदिक्कत सुरू आहे.

सुनील घोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : तालुक्यातील गिरिजा मध्यम प्रकल्पात सध्या गाळ उपसा सुरू असून गाळ उपशाच्या नावाखाली सर्रास वाळूचा उपसा करण्यात येत असून दररोज शेकडो ट्रॅक्टर व टिप्परने वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. याबाबत पाटबंधारे सिंचन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे ‘दुर्लक्ष’ होत असल्याने वाळूचा हा गोरखधंदा बिनदिक्कत सुरू आहे.तालुक्यातील सर्वात मोठा गिरिजा मध्यम प्रकल्प असून हा प्रकल्प कोरडाठाक पडल्याने पाटबंधारे सिंचन विभागाने या प्रकल्पातून शेतकऱ्यांना गाळ पेरा नेण्याचे आवाहन केले. परंतु परिसरातील काही वाळू तस्करांनी महसूल व पोलीस प्रशासनास हाताशी धरून गाळ ऐवजी सर्रास दिवसरात्र वाळू उपसा करण्याचे काम सुरु केले आहे. या प्रकल्पातून गाळ कमी आणि वाळूच जास्त उपसा करीत असल्याचे चित्र दिसत आहे. रात्री तर वाळूचा गोरखधंदा मोठा तेजीत सुरू असतो. तालुका प्रशासनास वाळू तस्करांनी हाताशी धरून गिरिजा प्रकल्पाचे लचके तोडण्याचे काम हाती घेतले आहे. आमच्या प्रतिनिधीने शुक्रवारी दुपारी बारा वाजता गिरिजा मध्यम प्रकल्पात फेरफटका मारला असता प्रकल्पातील पाणीपुरवठा योजनेच्या पंपिंग हाऊसजवळील एका विहिरीवर दोन ट्रॅक्टर वाळूचे भरलेले होते व त्यातील वाळू पाण्याने धुतली जात होती. तसेच प्रकल्पात एका बाजूस सर्रास वाळूचा उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरली जात होती. तर दुसºया बाजूने मशिनरीने गाळ उपसा करून तो ट्रॅक्टरमध्ये भरला जात होता. या गैरकामाचे फोटो काढताच ही प्रक्रिया लागलीच थांबली.४या गोरखधंद्याबद्दल पोलीस पाटलांनी उपविभागीय पोलीस अधिकाºयांना लेखी माहिती दिली. गावातीलच वाळू तस्कर असल्याने ग्रामस्थही काही बोलत नाही. मात्र गिरिजा प्रकल्पातील वाळूचा उपसा करून या प्रकल्पाची चाळणी करण्याचे काम काही लोक करीत आहेत. त्याचबरोबर कुठलीही परवानगी नसताना सर्रास वाळूचा उपसा करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक करून वाळूचा हा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. मात्र पाटबंधारे सिंचन विभाग, महसूल व पोलीस प्रशासन कुठलीच कारवाई करीत नसल्याबद्दल तालुक्यात याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नूतन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई