शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

आंबेडकर जयंतीनिमित्त समता महोत्सवास सुरुवात; विद्यार्थी, नागरिकांचा उत्फूर्त सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 16:30 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात सलग १० दिवस साजरी करण्यात येत आहे.

औरंगाबाद : सर्वांना समान न्याय, समता आणि बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात सलग १० दिवस साजरी करण्यात येत आहे. बुधवारी ( दि.६ ) सुरु झालेल्या समता महोत्सव शनिवारी ( दि.१६ ) तारखेपर्यंत विविध उपक्रमाने साजरा होत आहे. आतापर्यंतच्या सर्व उपक्रमांना विद्यार्थी, नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्फूर्त सहभाग मिळत आहे. 

येथील सामाजिक न्यायभवनात बुधवारी ( दि. ०६ ) प्रादेशिक उपायुक्त जलील शेख यांच्या हस्ते या समता सप्ताहाचे उद्घाटन झाले. यावेळी सहाय्यक आयुक्त पी. जी. वावळे यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तर गुरुवारी ( दि. ०७ ) विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धांना शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शुक्रवारी ( दि. ०८ ) स्वाधार शिष्यवृत्ती आणि मिनि ट्रॅक्टर लाभार्थींना प्रातिनिधिक  स्वरूपात वितरण करण्यात आले. तर आज ( दि. ९ ) विविध योजनांच्या जनजागृती संदर्भात ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेण्यात आला. यात अनेक जेष्ठांनी सहभाग नोंदवला. या सप्ताहांतर्गत उद्या रविवारी ( दि. १० ) समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. 

रक्तदान मेळावा, संविधान जागर- तर सोमवारी ( दि. ११) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी रक्तदान मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी ( दि. १२ ) मार्जिन मनी योजनेच्या जनजागृतीबाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी ( दि. १३ ) संविधान जागर हा विशेष कार्यक्रम. 

व्याख्यान,जात पडताळणी प्रमाणपत्र वितरण गुरुवारी ( दि. १४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम. व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करतील. या सोबतच शुक्रवारी दि. १५  रोजी डॉ. बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तर शनिवारी दि. १६ एप्रिल रोजी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल, या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन आयोजक सहाय्यक आयुक्त पी.जी. वावळे यांनी केले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर