शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

पाणथळी आणि जैव विविधता असलेला सलीम अली तलाव राज्यात एकमेव; परिसरात आहेत १३२ प्रकारचे पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 13:06 IST

जागतिक पाणथळ दिनानिमित्त: औरंगाबाद परिसरात सुखना तलाव, गिरिजा प्रकल्प, ढेकू तलाव, जायकवाडी व औरंगाबाद शहरातील सलीम अली तलाव हे पाणथळीचे उत्तम नमुने आहेत.

- स .सो. खंडाळकरऔरंगाबाद : सलीम अली तलाव परिसरात १३२ प्रकारचे पक्षी, तीस प्रकारची फुलपाखरे, शेकडो प्रकारचे कीटक, दहा प्रकारचे साप, विविध पाणवनस्पती, सरपटणारे प्राणी आढळतात. भर शहरात असणारा पाणथळीचा आणि जैव विविधता असणारा सलीम अली सरोवर हा एकमेव तलाव महाराष्ट्रात आहे.

पाणथळ म्हणजे जमीन आणि खोल पाण्याच्या मधली उथळ पाण्याची जागा किंवा दलदल. पाणथळ ही एक मोठी परिसंस्था असून, उथळ पाण्याचे ठिकाण असल्याने सूर्यप्रकाश थेट आतमध्ये जाऊन पाण्याच्या तळाशी शेवाळ, विविध पाणवनस्पती उगवतात. त्यांना खाण्यासाठी झिंगे, मासे, किडे व इतर जलचर येतात व त्यातून परिपूर्ण अन्नसाखळी तयार होते. पाणथळीतील झुडुपे, पाणवनस्पती, विविध जलचर हे पाणी शुध्द करण्याचे काम करतात. तसेच वातावरणात ऑक्सिजन सोडतात. जो सजीवांसाठी उपयुक्त असतो. 

पाणथळ हे पाणी साठवतात, जैवविविधता जपतात, शुद्ध पाणी देतात, आसपासच्या विहिरी, बोअर यांची पाणीपातळी वाढवतात. धान्य, फळे देतात. पशुपक्ष्यांना, मनुष्याला अन्न देतात. म्हणून पाणथळीचे रक्षण करणे गरजेचे आहे. औरंगाबाद परिसरात सुखना तलाव, गिरिजा प्रकल्प, ढेकू तलाव, जायकवाडी व औरंगाबाद शहरातील सलीम अली तलाव हे पाणथळीचे उत्तम नमुने आहेत. दुर्दैवाने इथे मानवी अतिक्रमणांमुळे जैवविविधता धोक्यात आलेली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण