शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सचिन तेंडुलकर ४५ मिनिटे औरंगाबाद विमानतळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:36 IST

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर शनिवारी (दि.२६) मुंबईहून चार्टर प्लेनने एका कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाला होता; परंतु नागपूर येथील खराब हवामानामुळे हे विमान रात्री ८ वा. औरंगाबादेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. इंधन भरल्यानंतर रात्री ८.४५ वाजता विमानाने सचिन पुन्हा मुंबईला परतला. यानिमित्ताने सचिन औरंगाबादेत दाखल झाला; परंतु केवळ ४५ मिनिटांसाठीच.

ठळक मुद्देनागपुरात खराब वातावरण : चार्टर प्लेन उतरले चिकलठाणा विमानतळावर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर शनिवारी (दि.२६) मुंबईहून चार्टर प्लेनने एका कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाला होता; परंतु नागपूर येथील खराब हवामानामुळे हे विमान रात्री ८ वा. औरंगाबादेत चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. इंधन भरल्यानंतर रात्री ८.४५ वाजता विमानाने सचिन पुन्हा मुंबईला परतला. यानिमित्ताने सचिन औरंगाबादेत दाखल झाला; परंतु केवळ ४५ मिनिटांसाठीच.नागपूर येथे खासदार क्रीडा महोत्सवाचा शनिवारी सायंकाळी समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सचिन तेंडुलकरची उपस्थिती हा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. त्यासाठी सचिनने मुंबई येथून सायंकाळी चार्टर प्लेनने नागपूरसाठी उड्डाण घेतले; परंतु नागपूर येथील वातावरण खराब झाले होते. त्यामुळे नागपूरजवळ पोहोचलेले सचिनचे विमान औरंगाबादला वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रात्री ८ वाजेच्या सुमारास विमान चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर विमानतळावर आल्याची माहिती विमानतळावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबर प्रवाशांपर्यंत पोहोचली. सर्वांनी सचिनची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला.विमानतळावर दाखल झाल्यानंतर काही वेळेनंतर सचिन विमानाच्या बाहेर पडला आणि क्रिकेट विश्वातील देव मानल्या जाणाºया मास्टरब्लास्टरचे सर्वांना दर्शन घडले. अंगात ग्रे रंगाचा शर्ट घातलेल्या सचिनने लक्ष वेधून घेतले.विमानतळावरील अधिकारी-कर्मचाºयांबरोबर सचिनने संवाद साधला. त्यांच्यासोबत फोटोशेसनही केले. यादरम्यान अधूनमधून सचिन मोबाईलवरही संवाद साधत होता. जवळपास १५ ते २० मिनिटे तो विमानाच्या बाहेर होता. सचिन विमानतळावर असल्याची माहिती मिळाल्याने काहींनी लहान मुलांसह विमानतळावर धाव घेतली होती; परंतु सचिन विमानतळाच्या आतमध्येच असल्याने त्यांची निराशा झाली.विमान औरंगाबादला वळविण्यात आल्याने विमानातील इंधन कमी झाले होते. त्यामुळे विमानतळावर चार्टर प्लेनमध्ये इंधन भरण्यात आले. जवळपास ४५ मिनिटे थांबल्यानंतर सचिन मुंबईसाठी रवाना झाला. रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेतल्याची माहिती विमानतळाच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरAurangabadऔरंगाबादAirportविमानतळ