शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

भाजप सरकार संविधान बदलणार ही अफवाच; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 16:53 IST

बाबासाहेबांच्या विचारांना न्याय देण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनला संविधान हे नाव दिले आहे. तरीही विरोधक हे मोदी संविधान बदलतील, अशी अफवा पसरवून समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त सभेत केंद्रीय राज्यमंत्री आठवले बोलत होते. सुरुवातीला रिपाइंच्या शहर व जिल्हा शाखेच्या वतीने गुलाबाच्या भल्या मोठ्या हाराने आठवले व व्यासपीठावर उपस्थित प्रदेश कार्यकारिणीचे स्वागत संजय ठोकळ, नागराज गायकवाड, विजय मगरे यांनी केले.

नेहमीच्या शैलीत आठवले यांनी ‘मी नाही कोणाचा गुलाम’ या कवितेने भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, बाबासाहेबांच्या विचारांना न्याय देण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. मुंबईत इंदू मिलच्या जागेवर ते 'स्टॅचू ऑफ लिबर्टी'पेक्षाही उंच साडेचारशे फुटांचा पुतळा उभारणार आहेत. बाबासाहेबांच्या विचारांची उंची आकाशाला गवसणी घालणारा आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माला जोडले आहे. जात, धर्मापेक्षाही आपला देश महत्त्वाचा आहे, हा विचार बाबासाहेबांचा आहे. तरुणांनी आता लष्करात जावे. मी तुमच्या सोबत आहे. लष्करात माणसे मरतात, असे नाही. इकडेही अपघातात रोज माणसे मरतातच की, असेही आठवले म्हणाले.कार्यक्रमाचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, दौलत खरात, पप्पू कागदे यांनी मनोगत व्यक्त केले.

महायुतीच्या नेत्यांची सभेकडे पाठडॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सभेकडे महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, स्थानिक नेते, आमदारांपैकी कोणीही फिरकले नाही. व्यासपीठावरील फलकावर त्यांचे फोटो पाहून नागरिकांमध्ये यासंबंधीची कुजबुज ऐकायला मिळाली.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीAurangabadऔरंगाबाद