शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

भाजप सरकार संविधान बदलणार ही अफवाच; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 16:53 IST

बाबासाहेबांच्या विचारांना न्याय देण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनला संविधान हे नाव दिले आहे. तरीही विरोधक हे मोदी संविधान बदलतील, अशी अफवा पसरवून समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त सभेत केंद्रीय राज्यमंत्री आठवले बोलत होते. सुरुवातीला रिपाइंच्या शहर व जिल्हा शाखेच्या वतीने गुलाबाच्या भल्या मोठ्या हाराने आठवले व व्यासपीठावर उपस्थित प्रदेश कार्यकारिणीचे स्वागत संजय ठोकळ, नागराज गायकवाड, विजय मगरे यांनी केले.

नेहमीच्या शैलीत आठवले यांनी ‘मी नाही कोणाचा गुलाम’ या कवितेने भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, बाबासाहेबांच्या विचारांना न्याय देण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. मुंबईत इंदू मिलच्या जागेवर ते 'स्टॅचू ऑफ लिबर्टी'पेक्षाही उंच साडेचारशे फुटांचा पुतळा उभारणार आहेत. बाबासाहेबांच्या विचारांची उंची आकाशाला गवसणी घालणारा आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माला जोडले आहे. जात, धर्मापेक्षाही आपला देश महत्त्वाचा आहे, हा विचार बाबासाहेबांचा आहे. तरुणांनी आता लष्करात जावे. मी तुमच्या सोबत आहे. लष्करात माणसे मरतात, असे नाही. इकडेही अपघातात रोज माणसे मरतातच की, असेही आठवले म्हणाले.कार्यक्रमाचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, दौलत खरात, पप्पू कागदे यांनी मनोगत व्यक्त केले.

महायुतीच्या नेत्यांची सभेकडे पाठडॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सभेकडे महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, स्थानिक नेते, आमदारांपैकी कोणीही फिरकले नाही. व्यासपीठावरील फलकावर त्यांचे फोटो पाहून नागरिकांमध्ये यासंबंधीची कुजबुज ऐकायला मिळाली.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीAurangabadऔरंगाबाद