शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

'राज्यात गोंधळ दिल्लीत मुजरा, शिंदे सरकार शेतकरी विरोधी'; अंबादास दानवेंची घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2022 18:34 IST

'राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना सरकारचे मंत्री टीका करण्यात वेळ घालवत आहेत.'

पैठण: राज्यात गोंधळ घालून दिल्लीत मुजरा करणारे शिंदे सरकार शेतकरी विरोधीअसून अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना सरकारचे मंत्री टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवत आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे यांनी केली. महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा पैठण येथील अभिनंदन मंगल कार्यालयात रविवारी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे, माजी आमदार संजय वाघचौरे, सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, तालुकाप्रमुख मनोज पेरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे, रा.का. चे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, शहराध्यक्ष जितु परदेशी, प्रकाश वानोळे, सोमनाथ जाधव, राखी परदेशी, नीता परदेशी, राजू परदेशी, मंगल मगर, स्वाती माने, शुभम पिवळ, अँड किशोर वैद्य, रावसाहेब नाडे, अजय परळकर, अमोल गोर्डे, प्रदिप नरके, योगेश जोशी, मंगल मगर, ठकुबाई कोथंबीरे, यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते दानवे यांनी पैठण तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणल्याच्या घोषणा होतात मात्र हा निधी जातो कोठे ? असा सवाल उपस्थित करुन पंचवीस वर्षात पैठण तालुक्याचा विकास रखडला असल्याचा आरोप केला. मंत्री संदीपान भुमरे यांना शिवसेनेने पाच वेळेस आमदार केले, तेच शिवसेना प्रमुखावर आता टीका करतात. असे सांगून वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी ब्रम्हगव्हाण उपसा जलसिंचन योजनेच्या कामात अडथळे आणले असा आरोपही दानवे यांनी यावेळी केला. संदीपान भुमरे यांचा हिशेब आता शिवसैनिक करतील असा ईशारा दानवे यांनी यावेळी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे, राजेंद्र राठोड, राखी परदेशी, आप्पासाहेब निर्मळ, मनोज पेरे, विनोद तांबे, अशोक धर्मे, यांची समयोचित भाषणे झाली. तालुक्यातील अनेकांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. अतिवृष्टीचे अनुदान तातडीने वितरीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्या अशी मागणी यावेळी आंबादास दानवे यांनी करताच उपस्थित शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. आंबादास दानवे यांच्या सत्कारास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpaithan-acपैठणAmbadas Danweyअंबादास दानवे