शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

'राज्यात गोंधळ दिल्लीत मुजरा, शिंदे सरकार शेतकरी विरोधी'; अंबादास दानवेंची घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2022 18:34 IST

'राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना सरकारचे मंत्री टीका करण्यात वेळ घालवत आहेत.'

पैठण: राज्यात गोंधळ घालून दिल्लीत मुजरा करणारे शिंदे सरकार शेतकरी विरोधीअसून अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना सरकारचे मंत्री टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवत आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे यांनी केली. महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा पैठण येथील अभिनंदन मंगल कार्यालयात रविवारी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे, माजी आमदार संजय वाघचौरे, सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, तालुकाप्रमुख मनोज पेरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे, रा.का. चे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, शहराध्यक्ष जितु परदेशी, प्रकाश वानोळे, सोमनाथ जाधव, राखी परदेशी, नीता परदेशी, राजू परदेशी, मंगल मगर, स्वाती माने, शुभम पिवळ, अँड किशोर वैद्य, रावसाहेब नाडे, अजय परळकर, अमोल गोर्डे, प्रदिप नरके, योगेश जोशी, मंगल मगर, ठकुबाई कोथंबीरे, यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते दानवे यांनी पैठण तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणल्याच्या घोषणा होतात मात्र हा निधी जातो कोठे ? असा सवाल उपस्थित करुन पंचवीस वर्षात पैठण तालुक्याचा विकास रखडला असल्याचा आरोप केला. मंत्री संदीपान भुमरे यांना शिवसेनेने पाच वेळेस आमदार केले, तेच शिवसेना प्रमुखावर आता टीका करतात. असे सांगून वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी ब्रम्हगव्हाण उपसा जलसिंचन योजनेच्या कामात अडथळे आणले असा आरोपही दानवे यांनी यावेळी केला. संदीपान भुमरे यांचा हिशेब आता शिवसैनिक करतील असा ईशारा दानवे यांनी यावेळी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे, राजेंद्र राठोड, राखी परदेशी, आप्पासाहेब निर्मळ, मनोज पेरे, विनोद तांबे, अशोक धर्मे, यांची समयोचित भाषणे झाली. तालुक्यातील अनेकांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. अतिवृष्टीचे अनुदान तातडीने वितरीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्या अशी मागणी यावेळी आंबादास दानवे यांनी करताच उपस्थित शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. आंबादास दानवे यांच्या सत्कारास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpaithan-acपैठणAmbadas Danweyअंबादास दानवे