शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

RTI ACT अर्जदारांना माहिती देण्यास टाळाटाळ; जनमाहिती अधिकाऱ्यांना २ कोटी रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 18:35 IST

RTI ACT : साधारणत: दरमहा हजार ते बाराशे द्वितीय अपील आणि तक्रारी दाखल होतात

ठळक मुद्देराज्य माहिती आयोगाचे औरंगाबाद खंडपीठाची पाच हजार जनमाहिती अधिकाऱ्यांवर कारवाई

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्जदारांना विहित मुदतीत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यासोबतच माहिती का देत नाही, याविषयी खुलासा न करणाऱ्या ५ हजार अपिलीय अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाने वर्षभरात २ कोटी रुपये दंड ठोठावल्याची बाब समोर आली.

माहिती अधिकाराच्या कायद्याने शासकीय कार्यालयातील (गोपनीय नसलेली) उपलब्ध माहिती अर्जदाराला विहित मुदतीत देणे जनमाहिती अधिकाऱ्यांना बंधनकारक असते. जनमाहिती अधिकाऱ्याने ही माहिती न दिल्यास त्याच कार्यालयातील अपिलीय अधिकाऱ्यांकडे याविषयी दाद मागता येते. तेथेही जर माहिती उपलब्ध झाली नाही, तर राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करता येते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाचे कार्यालय आहे. दिलीप धारूरकर हे राज्य माहिती आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र या खंडपीठांतर्गत येते. यामुळे आयोगाकडे दाखल होणाऱ्या अपिलांची संख्याही खूप जास्त आहे. साधारणत: दरमहा हजार ते बाराशे द्वितीय अपील आणि तक्रारी दाखल होतात, अशी माहिती आयोगाचे उपसचिव आर.सी. सरवदे यांनी दिली. ते म्हणाले की, आयोगाकडे दाखल होणाऱ्या अपिलावर ज्येष्ठतेनुसार सुनावणी होते. कोविड महामारीमुळे आयोग झूम मिटिंग ॲपद्वारे सुनावणी घेते. दरमहा ७०० ते ८०० अपिलांवर सुनावणी होत असते. असे असले तरी गतवर्षी लॉकडाऊन कालावधीत सुनावणी होत नव्हत्या; मात्र अपिल आणि तक्रार अर्ज येत होते. परिणामी, प्रलंबित अपिलांची संख्या ११ हजार ५८ पर्यंत गेली आहे.

दीड वर्षांनंतर होईल सुनावणीराज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठांकडे सप्टेंबरअखेरपर्यंत ११ हजाराहून अधिक अपिल आणि तक्रारी प्रलंबित आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या अपिलांवर ज्येष्ठतेनुसार सुनावणी होत असते. यामुळे आज अपिल दाखल केल्यास ते सुनावणीसाठी येण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

ऑनलाइन सुनावणी घेत आहोतकोरोना काळात अपिल दाखल होत होते; मात्र प्रत्यक्ष सुनावणी बंद होती. परिणामी, अपिलांची संख्या ११ हजार ५८ पर्यंत वाढली. आता आम्ही ऑनलाइन सुनावणी घेत आहोत. सर्वाधिक अपिलांचा निपटारा करणारे औरंगाबाद माहिती आयोग हे राज्यात अव्वल आहे.- दिलीप धारूरकर, राज्य माहिती आयुक्त, औरंगाबाद खंडपीठ.

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा