शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
5
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
6
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
8
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
9
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
10
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
11
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
12
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..
14
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
15
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
16
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
17
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
18
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
19
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
20
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

RTI ACT अर्जदारांना माहिती देण्यास टाळाटाळ; जनमाहिती अधिकाऱ्यांना २ कोटी रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 18:35 IST

RTI ACT : साधारणत: दरमहा हजार ते बाराशे द्वितीय अपील आणि तक्रारी दाखल होतात

ठळक मुद्देराज्य माहिती आयोगाचे औरंगाबाद खंडपीठाची पाच हजार जनमाहिती अधिकाऱ्यांवर कारवाई

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्जदारांना विहित मुदतीत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यासोबतच माहिती का देत नाही, याविषयी खुलासा न करणाऱ्या ५ हजार अपिलीय अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाने वर्षभरात २ कोटी रुपये दंड ठोठावल्याची बाब समोर आली.

माहिती अधिकाराच्या कायद्याने शासकीय कार्यालयातील (गोपनीय नसलेली) उपलब्ध माहिती अर्जदाराला विहित मुदतीत देणे जनमाहिती अधिकाऱ्यांना बंधनकारक असते. जनमाहिती अधिकाऱ्याने ही माहिती न दिल्यास त्याच कार्यालयातील अपिलीय अधिकाऱ्यांकडे याविषयी दाद मागता येते. तेथेही जर माहिती उपलब्ध झाली नाही, तर राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करता येते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाचे कार्यालय आहे. दिलीप धारूरकर हे राज्य माहिती आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र या खंडपीठांतर्गत येते. यामुळे आयोगाकडे दाखल होणाऱ्या अपिलांची संख्याही खूप जास्त आहे. साधारणत: दरमहा हजार ते बाराशे द्वितीय अपील आणि तक्रारी दाखल होतात, अशी माहिती आयोगाचे उपसचिव आर.सी. सरवदे यांनी दिली. ते म्हणाले की, आयोगाकडे दाखल होणाऱ्या अपिलावर ज्येष्ठतेनुसार सुनावणी होते. कोविड महामारीमुळे आयोग झूम मिटिंग ॲपद्वारे सुनावणी घेते. दरमहा ७०० ते ८०० अपिलांवर सुनावणी होत असते. असे असले तरी गतवर्षी लॉकडाऊन कालावधीत सुनावणी होत नव्हत्या; मात्र अपिल आणि तक्रार अर्ज येत होते. परिणामी, प्रलंबित अपिलांची संख्या ११ हजार ५८ पर्यंत गेली आहे.

दीड वर्षांनंतर होईल सुनावणीराज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठांकडे सप्टेंबरअखेरपर्यंत ११ हजाराहून अधिक अपिल आणि तक्रारी प्रलंबित आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या अपिलांवर ज्येष्ठतेनुसार सुनावणी होत असते. यामुळे आज अपिल दाखल केल्यास ते सुनावणीसाठी येण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

ऑनलाइन सुनावणी घेत आहोतकोरोना काळात अपिल दाखल होत होते; मात्र प्रत्यक्ष सुनावणी बंद होती. परिणामी, अपिलांची संख्या ११ हजार ५८ पर्यंत वाढली. आता आम्ही ऑनलाइन सुनावणी घेत आहोत. सर्वाधिक अपिलांचा निपटारा करणारे औरंगाबाद माहिती आयोग हे राज्यात अव्वल आहे.- दिलीप धारूरकर, राज्य माहिती आयुक्त, औरंगाबाद खंडपीठ.

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा