शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

RTI ACT अर्जदारांना माहिती देण्यास टाळाटाळ; जनमाहिती अधिकाऱ्यांना २ कोटी रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 18:35 IST

RTI ACT : साधारणत: दरमहा हजार ते बाराशे द्वितीय अपील आणि तक्रारी दाखल होतात

ठळक मुद्देराज्य माहिती आयोगाचे औरंगाबाद खंडपीठाची पाच हजार जनमाहिती अधिकाऱ्यांवर कारवाई

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्जदारांना विहित मुदतीत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यासोबतच माहिती का देत नाही, याविषयी खुलासा न करणाऱ्या ५ हजार अपिलीय अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाने वर्षभरात २ कोटी रुपये दंड ठोठावल्याची बाब समोर आली.

माहिती अधिकाराच्या कायद्याने शासकीय कार्यालयातील (गोपनीय नसलेली) उपलब्ध माहिती अर्जदाराला विहित मुदतीत देणे जनमाहिती अधिकाऱ्यांना बंधनकारक असते. जनमाहिती अधिकाऱ्याने ही माहिती न दिल्यास त्याच कार्यालयातील अपिलीय अधिकाऱ्यांकडे याविषयी दाद मागता येते. तेथेही जर माहिती उपलब्ध झाली नाही, तर राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करता येते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाचे कार्यालय आहे. दिलीप धारूरकर हे राज्य माहिती आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र या खंडपीठांतर्गत येते. यामुळे आयोगाकडे दाखल होणाऱ्या अपिलांची संख्याही खूप जास्त आहे. साधारणत: दरमहा हजार ते बाराशे द्वितीय अपील आणि तक्रारी दाखल होतात, अशी माहिती आयोगाचे उपसचिव आर.सी. सरवदे यांनी दिली. ते म्हणाले की, आयोगाकडे दाखल होणाऱ्या अपिलावर ज्येष्ठतेनुसार सुनावणी होते. कोविड महामारीमुळे आयोग झूम मिटिंग ॲपद्वारे सुनावणी घेते. दरमहा ७०० ते ८०० अपिलांवर सुनावणी होत असते. असे असले तरी गतवर्षी लॉकडाऊन कालावधीत सुनावणी होत नव्हत्या; मात्र अपिल आणि तक्रार अर्ज येत होते. परिणामी, प्रलंबित अपिलांची संख्या ११ हजार ५८ पर्यंत गेली आहे.

दीड वर्षांनंतर होईल सुनावणीराज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठांकडे सप्टेंबरअखेरपर्यंत ११ हजाराहून अधिक अपिल आणि तक्रारी प्रलंबित आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या अपिलांवर ज्येष्ठतेनुसार सुनावणी होत असते. यामुळे आज अपिल दाखल केल्यास ते सुनावणीसाठी येण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

ऑनलाइन सुनावणी घेत आहोतकोरोना काळात अपिल दाखल होत होते; मात्र प्रत्यक्ष सुनावणी बंद होती. परिणामी, अपिलांची संख्या ११ हजार ५८ पर्यंत वाढली. आता आम्ही ऑनलाइन सुनावणी घेत आहोत. सर्वाधिक अपिलांचा निपटारा करणारे औरंगाबाद माहिती आयोग हे राज्यात अव्वल आहे.- दिलीप धारूरकर, राज्य माहिती आयुक्त, औरंगाबाद खंडपीठ.

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा