शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

औरंगाबाद जिल्ह्यातील तीस शाळांमध्ये आरटीईचे शून्य प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:43 IST

गोरगरीब विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी बंधनकारक असलेल्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राबविण्यात आलेल्या प्रवेश फेऱ्या आॅगस्टअखेरपर्यंत लांबल्यामुळे शेकडो जागा रिक्त राहिल्या आहेत. यातच ३० शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेशासाठी अर्ज केला नसल्यामुळे त्या शाळांमध्ये आरटीईचा प्रवेश शून्य झाला आहे.

ठळक मुद्देअनास्था : गोरगरीब विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

औरंगाबाद : गोरगरीब विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी बंधनकारक असलेल्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राबविण्यात आलेल्या प्रवेश फेऱ्या आॅगस्टअखेरपर्यंत लांबल्यामुळे शेकडो जागा रिक्त राहिल्या आहेत. यातच ३० शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेशासाठी अर्ज केला नसल्यामुळे त्या शाळांमध्ये आरटीईचा प्रवेश शून्य झाला आहे.मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो. यंदा ही प्रवेश प्रक्रिया १० जानेवारीपासून सुरू करण्यात आली, तर आॅगस्टअखेरीस ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. काही शाळांचा मनमानी कारभार आणि प्रवेश देण्यास नकार दिल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. अर्ज प्रक्रियेत सर्व काही ठीक असतानादेखील अनेकांचा नंबर कोणत्याच फेरीत लागला नाही. त्यामुळे काहींच्या पदरी निराशा पडल्याने किती दिवस वाट पाहायची म्हणून इतरत्र प्रवेश घेतल्याचे प्रकारही समोर आले. यंदा विभागात ५६५ शाळा या आरटीई प्रवेशासाठी पात्र होत्या. त्यांची प्रवेश क्षमता ही साडेपाच हजार होती, तर जवळपास अकरा हजार अर्ज यावेळी आले होते. जवळपास ८८ जण असेही आढळून आले की, ज्यांनी नाव बदलून अर्ज भरला होता, असे अर्ज बाद ठरले; परंतु मोठ्या शाळांमध्ये प्रवेशाचा अट्टहास या प्रवेश प्रक्रियेत यंदा दिसून आल्याने शहरातील नामांकित शाळांसाठी हजार ते बाराशे अर्जही करण्यात आले. दुसरीकडे मात्र तीस शाळा अशा आढळून आल्या की, जिथे एकही अर्ज आरटीई प्रवेशासाठी आला नाही. त्यामुळे आरटीईसाठी असलेल्या जागा या शाळांमध्ये रिक्त राहिल्या आहेत. यावर शिक्षण विभागातील अधिकाºयांनी सांगितले की, पालकांमध्ये मोठ्या आणि सर्वाधिक इंग्रजी शाळांना पसंती असल्यानेच काही शाळांमध्ये प्रवेश झाला नाही. त्यातील काही शाळा तर माहीत नसल्याचेही समोर आले आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता