शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

सामाजिक समरसतेसाठी स्वयंसेवकांनी प्रयत्नरत राहावे: मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 12:32 PM

Mohan Bhagwat: भेदभाव मनातून काढून समरस समाज तयार करावा, यासाठी स्वयंसेवकांनी समाजातील सर्व जातीवर्गात कौटुंबिक मित्रता निर्माण करावी.

औरंगाबाद : समाजातील बंधुभाव वाढून एक समरस समाज तयार व्हावा, यासाठी कुटुंबातूनच प्रयत्न होण्यासाठी स्वयंसेवक व त्यांच्या कुटुंबाने प्रयत्नरत राहावे, असे आवाहन मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) यांनी केले. अग्रसेन भवन येथे स्नेहमेळाव्यात (RSS ) त्यांनी मार्गदर्शन केले. 

त्यांनी सांगितले की, हिंदूंचा मूळ स्वभावधर्म हा सर्व मानव एक आहे, असाच आहे. भेदभाव मनातून काढून समरस समाज तयार करावा, यासाठी स्वयंसेवकांनी समाजातील सर्व जातीवर्गात कौटुंबिक मित्रता निर्माण करावी. व्यासपीठावर देवगिरी प्रांतचे संघचालक अनिल भालेराव, शहर संघचालक कन्हैयालाल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

तत्पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता सिडकोतील अग्रसेन भवन येथे आगमन झाले. येथे आयोजित स्नेहमेळाव्यात देवगिरी प्रांतात संघाचे कार्य करणाऱ्या स्वयंसेवक व त्यांच्या कुटुंबीयांशी त्यांनी मुक्त संवाद साधला. मात्र, हा संवाद चारभिंतीतच रंगला. त्याचा आवाजही भिंतीबाहेर येऊ नये, याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती.

आज प्रांत प्रचारकांचा मेळावाडॉ. भागवत पाच दिवस शहरात मुक्कामासाठी आहेत. एका नामांकित सीएच्या निवासस्थानी त्यांची राहण्याची व्यवस्था आहे. शुक्रवारी सरसंघचालकांच्या मार्गदर्शनाखाली देवगिरी प्रांतातील प्रचारकांचा मेळावा होणार आहे. शनिवारी प्रांत कार्यवाहकांचा मेळावा, रविवारी संघाच्या विविध संस्था-संघटनांची समन्वयक बैठक होईल. सोमवारी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम होईल.

भाजपचे कोण मंत्री व पदाधिकारी येणार ?सरसंघचालकांना भेटण्यासाठी भाजपचे कोण मंत्री व पदाधिकारी येणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निमंत्रण देण्यात आले आहे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे सुद्धा येणार असल्याची चर्चा होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ