शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वंचितमध्ये ‘आरएसएस’ची मंडळी!; खासदार एम्तियाज जलील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 01:58 IST

आमची ताकद आम्ही दाखवून देणार

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) निगडित माणसे शिरली आहेत. त्यांच्याच सांगण्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी ‘एमआयएम’सोबतची युती तोडली, असा खळबळजनक आरोप खा. इम्तियाज जलील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. आम्हाला फक्त ८ जागा देण्यात आल्या. दोन महिने आमच्यासोबत चर्चेचे गुºहाळ सुरू होते. दुसरीकडे काँग्रेससोबतही बोलणी सुरू ठेवली. आम्ही आता स्वबळावर निवडणूक लढविणार आहोत, असेही जलील यांनी जाहीर केले.

पत्रकार परिषदेत जलील यांनी मागील दोन महिन्यांत एमआयएम आणि वंचितमध्ये जागा वाटपासाठी कशी चर्चा झाली याची माहिती दिली. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर दोघेच चर्चा करीत होते. त्यांच्या सूचनांवरून आम्ही अगोदर ९८ व नंतर ७४ जागांची यादी वंचितला दिली. परंतु आम्हाला फक्त ८ जागा देण्यात आल्या. वंचितने आम्हाला किमान ४० ते ५० जागा दिल्या पाहिजेत. आमच्याकडे व्होट बँक नाही, असे वारंवार सांगण्यात येत आहे. राज्यात आमचे १५० नगरसेवक आहेत. आमची व्होट बँक किती हे विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा इशाराही जलील यांनी दिला.

मुळात सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात वेगळी आघाडी तयार करण्यासाठी एमआयएम-वंचित बहुजन एकत्र आले. वंचितच्या पार्लमेंटरी बोर्डातील सदस्य आपली स्वत:ची ओळख मला करून देताना म्हणाले की, माझ्यामागे दोन कोटी लोक आहेत. मग अशा मंडळींनी मुख्यमंत्री व्हावे, असा टोलाही जलील यांनी मारला.ओवेसींना विचारून पत्रक काढलेआघाडी तोडण्यासंदर्भातील पत्र मी पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची परवानगी घेऊनच प्रसिद्धीस दिले. वंचितचे प्रवक्ते, नेते काहीही बोलत आहेत. विनाकारण मला ‘व्हिलन’ठरविण्यात येत आहे. आजही वंचितची मंडळी बोलणी सुरू असल्याचे सांगत आहे. पण नेमकी कोणासोबत, हे सांगावे. अलीकडेच एमआयएमला १७ जागा दिल्याची अफवा पसरविण्यात आली. हा आकडा नेमका आला कोठून हे वंचितने सांगावे.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी