शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

भारताला विकसित देश बनविण्यासाठी ‘सीएं’ची भूमिका महत्त्वाची: भागवत कराड

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 7, 2022 14:40 IST

'द्रारिद्र्य निर्मूलन होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. त्यासाठी गरीबांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी ‘सीएं’नी आपले योगदान द्यावे.''

औरंगाबाद: ज्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे तोच देश विकास करू शकतो. आपल्यावर १५९ वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनला मागे टाकून आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर जाऊन पोहोचली आहे. भारताला विकसित देश बनविण्यासाठी चार्टर्ड अकाैंटंटची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ‘सीएं’ना मोठी मागणी असून, त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.

‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाैंटंट्स ऑफ इंडिया’ने गुरुवारी (दि. ६) आयोजित दीक्षांत सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते. सातारा परिसरातील ‘आईसीएआय’ भवनात पश्चिम विभागातील १५० नवीन पात्र चार्टर्ड अकाैंटंट्सला या सोहळ्यात पदवी प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. के. व्ही. एस. सरमा यांची विशेष उपस्थिती होती.

डाॅ. कराड यांनी सांगितले की, द्रारिद्र्य निर्मूलन होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. त्यासाठी गरीबांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी ‘सीएं’नी आपले योगदान द्यावे.भारतातील न्यायिक प्रणालीमध्ये सहभागी होण्यासाठी व अनेक आर्थिक केसेसचा उलगडा करण्यासाठी ‘सीएं’नी कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घ्यावा़, असे आवाहन राष्ट्रीय विधी विद्यापीठ कुलगुरू डॉ. सरमा यांनी केले.

तत्पूर्वी सीए संघटनेचे अध्यक्ष देबशीस मित्रा व उपाध्यक्ष अनिकेत तलाठी यांनी दिल्लीहून ऑनलाईन मार्गदर्शन केले. केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सीए उमेश शर्मा यांनी चार्टर्ड अकौंटंटच्या प्रत्येक स्पेलिंगचा अर्थ समजावून सांगितला व नव्याने पात्र ठरलेल्या ‘सीएं’ना शपथ दिली. प्रारंभी, सीए स्थानिक शाखेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, उपाध्यक्ष गणेश भालेराव, सचिव केदार पांडे, कोषाध्यक्ष अमोल गोधा, विकासा चेअरमन महेश इंदाणी, शाखा समितीच्या सदस्या रूपाली बोथरा यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

पूर्वी कुरिअरद्वारे मिळत असे पदवीसीए उमेश शर्मा यांनी सांगितले की, पूर्वी कुरिअरने पदवी मिळत असे. औरंगाबादेत दीक्षांत सोहळा आयोजित करावा, अशी सर्वांची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBhagwat Karadडॉ. भागवत