शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

मराठवाड्यातील रस्त्यांची लागली वाट; बांधकाम विभागाचे ‘प्रस्ताव पे प्रस्ताव’ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 13:14 IST

दुरुस्तीसाठी २५ कोटींचा प्रस्ताव 

ठळक मुद्देकोट्यवधींची फक्त उड्डाणेपण अजून हाती छदामही नाही

औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांंना पावसाने झोडपून काढले. त्यानंतर अलीकडे परतीच्या पावसानेही सर्वत्र हाहाकार माजविला आहे. परिणामी, रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. तथापि, बांधकाम विभागाने दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी ११४ कोटी रुपयांचा, तर तात्काळ दुरुस्तीसाठी २३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. मात्र, यापैकी आजपर्यंत एक छदामही प्राप्त झालेला नाही. असे असताना आता परतीच्या पावसाने खराब झालेले रस्ते व पुलांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी दीड कोटी, तर कायमस्वरूपी रस्ते दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.

दीड-दोन महिन्यांपूर्वी बांधकाम विभागाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्यासाठी ११४ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. दरम्यान, पावसामुळे नादुरुस्त झालेले रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी २३ कोटींचा दुसरा प्रस्तावही सादर केलेला आहे. zशासनाकडे ‘कोविड’च्या उपाययोजनांमुळे निधीची कमरता असेल व त्यामुळे ११४ कोटींच्या निधीसाठी विलंब होणार असेल, तर रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी २३ कोटींचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी बांधकाम विभागाने शासनाला विनंती केली होती. मात्र, अजूनही मागणी केलेल्या या प्रस्तावातील एक छदामही प्राप्त झालेला नाही. असे असताना सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील रस्ते व पुलांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. अशा रस्त्यांचे सर्वेक्षण करून दुरुस्तीकरिता किती निधी अपेक्षित आहे, याची विचारणा शासनाने केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाच्या परिमंडळ कार्यालयाने या दोन जिल्ह्यांतील रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी १ कोटी ६४ लाख रुपये, तर कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी २५ कोटी ५० लाख रुपयांची शासनाकडे मागणी केली आहे. 

अधिकाऱ्यांनी टेकले हातऔरंगाबादसह जवळपास सर्वच जिल्ह्यांना निधी देण्यासाठी मागील काही वर्षांपासून शासनाने आखडता हात घेतला आहे. तथापि, आज नाही तर उद्या, अशी अपेक्षा ठेवत अनेक कंत्राटदारांनी बांधकाम विभागाची कामे केली आहेत. वर्षानुवर्षे बिलेच मिळत नसल्यामुळे अनेक कंत्राटदार कंगाल झाले आहेत. पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना विनंती केली. अगोदरचाच निधी मिळाला नाही, तर पदरमोड करून शासनाची कामे कशाला करायची, असा पवित्रा कंत्राटदारांनी घेतला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादfundsनिधी