शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील रस्त्यांची लागली वाट; बांधकाम विभागाचे ‘प्रस्ताव पे प्रस्ताव’ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 13:14 IST

दुरुस्तीसाठी २५ कोटींचा प्रस्ताव 

ठळक मुद्देकोट्यवधींची फक्त उड्डाणेपण अजून हाती छदामही नाही

औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांंना पावसाने झोडपून काढले. त्यानंतर अलीकडे परतीच्या पावसानेही सर्वत्र हाहाकार माजविला आहे. परिणामी, रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. तथापि, बांधकाम विभागाने दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी ११४ कोटी रुपयांचा, तर तात्काळ दुरुस्तीसाठी २३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. मात्र, यापैकी आजपर्यंत एक छदामही प्राप्त झालेला नाही. असे असताना आता परतीच्या पावसाने खराब झालेले रस्ते व पुलांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी दीड कोटी, तर कायमस्वरूपी रस्ते दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.

दीड-दोन महिन्यांपूर्वी बांधकाम विभागाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्यासाठी ११४ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. दरम्यान, पावसामुळे नादुरुस्त झालेले रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी २३ कोटींचा दुसरा प्रस्तावही सादर केलेला आहे. zशासनाकडे ‘कोविड’च्या उपाययोजनांमुळे निधीची कमरता असेल व त्यामुळे ११४ कोटींच्या निधीसाठी विलंब होणार असेल, तर रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी २३ कोटींचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी बांधकाम विभागाने शासनाला विनंती केली होती. मात्र, अजूनही मागणी केलेल्या या प्रस्तावातील एक छदामही प्राप्त झालेला नाही. असे असताना सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील रस्ते व पुलांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. अशा रस्त्यांचे सर्वेक्षण करून दुरुस्तीकरिता किती निधी अपेक्षित आहे, याची विचारणा शासनाने केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाच्या परिमंडळ कार्यालयाने या दोन जिल्ह्यांतील रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी १ कोटी ६४ लाख रुपये, तर कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी २५ कोटी ५० लाख रुपयांची शासनाकडे मागणी केली आहे. 

अधिकाऱ्यांनी टेकले हातऔरंगाबादसह जवळपास सर्वच जिल्ह्यांना निधी देण्यासाठी मागील काही वर्षांपासून शासनाने आखडता हात घेतला आहे. तथापि, आज नाही तर उद्या, अशी अपेक्षा ठेवत अनेक कंत्राटदारांनी बांधकाम विभागाची कामे केली आहेत. वर्षानुवर्षे बिलेच मिळत नसल्यामुळे अनेक कंत्राटदार कंगाल झाले आहेत. पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना विनंती केली. अगोदरचाच निधी मिळाला नाही, तर पदरमोड करून शासनाची कामे कशाला करायची, असा पवित्रा कंत्राटदारांनी घेतला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादfundsनिधी