शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

जिल्हा परिषदच करणार रस्ते; जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:43 IST

आमदार- खासदारांनी शिफारस केलेल्या २५ कोटी रुपयांची इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरणाची कामे जिल्हा परिषदेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यासाठी सर्वसाधारण सभेने ‘ना हरकत’ द्यावी, या आशयाचा ठराव आज सोमवारी सर्वसाधारण सभेने बहुमताने फेटाळून लावला. ५०:५४ लेखाशीर्ष अंतर्गत इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी नियोजन करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेचा असून, ही कामे जिल्हा परिषदेमार्फतच केली जातील, यावर आजच्या या सभेत शिक्कामोर्तब झाले.

ठळक मुद्देजि. प. सर्वसाधारण सभा : रस्त्यांच्या कामांसाठी मागितली होती ना हरकत

औरंगाबाद : आमदार- खासदारांनी शिफारस केलेल्या २५ कोटी रुपयांची इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरणाची कामे जिल्हा परिषदेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यासाठी सर्वसाधारण सभेने ‘ना हरकत’ द्यावी, या आशयाचा ठराव आज सोमवारी सर्वसाधारण सभेने बहुमताने फेटाळून लावला. ५०:५४ लेखाशीर्ष अंतर्गत इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी नियोजन करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेचा असून, ही कामे जिल्हा परिषदेमार्फतच केली जातील, यावर आजच्या या सभेत शिक्कामोर्तब झाले.‘लोकमत’ने सोमवारी २८ जानेवारीच्या अंकात ‘२५ कोटींच्या रस्त्यांचा कळीचा मुद्दा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानुसार प्रशासनाच्या ‘ना हरकत’ प्रस्तावाविरुद्ध सर्वपक्षीय सदस्य एकवटले व त्यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर चर्चेस येताच सर्वप्रथम जि.प.मधील शिवसेनेचे गटनेते अविनाश गलांडे यांनी जिल्हाधिकाºयांनी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन जिल्हा परिषदेकडे ‘ना हरकत’ संबंधी चुकीचा प्रस्ताव पाठविल्याचा आरोप केला. जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध सचिव आहेत. त्यांनी फक्त सचिवांचीच भूमिका पार पाडावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. जिल्हाधिकाºयांनी पालकमंत्र्यांच्या सूचनांचा गैरअर्थ काढत लोकप्रतिनिधींना खुश करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. त्यांनी प्रस्तावासोबत लोकप्रतिनिधींनी केलेल्या १२२ कामांच्या शिफारशींची यादी पाठविली असून, त्यावर कुठेही जिल्हाधिकाºयांची स्वाक्षरी नाही. या यादीतून कोणत्या आमदार- खासदारांनी कोणत्या कामांच्या शिफारशी केल्या आहेत, त्याचाही उल्लेख नाही.दरम्यान, सदस्य रमेश गायकवाड यांनी सभागृहासमोर मुद्दा मांडला की, एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी किमान २५ लाख रुपये खर्च येतो. ३०:५४ लेखाशीर्ष अंतर्गत जिल्हा परिषदेला तुटपुंजा निधी मिळतो. त्यामुळे रस्त्यांचे पुढील २० वर्षांपर्यंत डांबरीकरण होणे शक्य नाही. जिल्ह्यात ६ हजार ६९१ किलोमीटर लांबीचे रस्ते असून, यामध्ये ४ हजार ५०० किलोमीटर लांबीचे ग्रामीण मार्ग, तर १ हजार ७०३ किलोमीटर लांबीचे इतर जिल्हा मार्ग आहेत. त्यामुळे ३०:५४ व ५०:५४ लेखाशीर्ष अंतर्गत निधीतून रस्त्यांच्या कामांचे नियोजन हे जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशीनुसारच करण्यात यावे, या आशयाचा गायकवाड यांनी मांडलेला ठराव पारित करण्यात आला. जिल्हाधिकाºयांच्या ‘ना हरकत’ प्रस्तावाला एल. जी. गायकवाड, रमेश पवार, मधुकर वालतुरे, किशोर पवार या सदस्यांनीही कडाडून विरोध केला.चौकट ....यापुढे प्रस्तावासोबत ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ हवेशाळांच्या धोकादायक खोल्या, शाळा इमारत, मोडकळीस आलेल्या अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती अथवा कोणतेही जुने बांधकाम पाडण्याच्या प्रस्तावासोबत ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ तसेच ती इमारत केव्हा बांधण्यात आली होती, यासंबंधीची सविस्तर माहिती सादर करावी. अन्यथा अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही किंवा त्यास मान्यताही दिली जाणार नाही, अशा सूचना जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सर्वसाधारण सभेत सदस्य- अधिकाºयांना दिल्या.-------

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद