शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

रस्ते दुरुस्ती गुलदस्त्यात

By admin | Updated: January 12, 2016 00:06 IST

विजय सरवदे ,औरंगाबाद राज्य सरकारने नव्याने अमलात आणलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांचा कायापालट होईल, अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात

विजय सरवदे ,औरंगाबाद राज्य सरकारने नव्याने अमलात आणलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांचा कायापालट होईल, अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात योजनेतून जिल्ह्यातील ७० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत; परंतु या योजनेत कोणत्या रस्त्यांना प्राधान्य द्यायचे, हे ठरविण्याचा अधिकार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीला आहे. मात्र, दोन आमदार सदस्य असलेली समिती स्थापन करण्यासाठी पालकमंत्र्यांना मुहूर्तच सापडत नाही. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत रस्त्यांचे नियोजन किंवा नियोजित रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यात ‘झेडपी’च्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. असे असले तरी आजपर्यंत जिल्हा रस्त्यांना न जोडलेल्या वाड्या, वस्त्यांना दळणवळणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा हेतू आहे. या योजनेचा पहिला टप्पा मार्चअखेरपर्यंत राबविला जाणार असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील किमान ५० कोटी रुपयांची कामे अपेक्षित आहेत. यामध्ये जवळपास ७० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे केली जाणार असून, मार्चअखेरपर्यंत या रस्त्यांची निविदा प्रक्रिया तरी पूर्ण झाली पाहिजे, असे अपेक्षित आहे. असे असले तरी मुळातच औरंगाबाद जिल्हा परिषद ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या ताब्यात आहे. त्यामुळे राज्य सरकारने या जिल्हा परिषदेबाबत सुरुवातीपासूनच सावत्रपणाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या योजनेचा किती लाभ जिल्हा परिषदेला मिळेल, याबद्दल सदस्यांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, १६ आणि १७ सप्टेंबर २०१५ रोजी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास २०० ते २५० रस्ते व पूल वाहून गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. हे रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी जि. प. बांधकाम विभागाने २८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे. दोन महिन्यांचा कालावधी उलटला; पण अद्यापही त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे या रस्त्यांची कामे कधी होतील, याबद्दलही सदस्य साशंक आहेत.