शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

रस्ते दुरुस्ती गुलदस्त्यात

By admin | Updated: January 12, 2016 00:06 IST

विजय सरवदे ,औरंगाबाद राज्य सरकारने नव्याने अमलात आणलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांचा कायापालट होईल, अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात

विजय सरवदे ,औरंगाबाद राज्य सरकारने नव्याने अमलात आणलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांचा कायापालट होईल, अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात योजनेतून जिल्ह्यातील ७० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत; परंतु या योजनेत कोणत्या रस्त्यांना प्राधान्य द्यायचे, हे ठरविण्याचा अधिकार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीला आहे. मात्र, दोन आमदार सदस्य असलेली समिती स्थापन करण्यासाठी पालकमंत्र्यांना मुहूर्तच सापडत नाही. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत रस्त्यांचे नियोजन किंवा नियोजित रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यात ‘झेडपी’च्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. असे असले तरी आजपर्यंत जिल्हा रस्त्यांना न जोडलेल्या वाड्या, वस्त्यांना दळणवळणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा हेतू आहे. या योजनेचा पहिला टप्पा मार्चअखेरपर्यंत राबविला जाणार असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील किमान ५० कोटी रुपयांची कामे अपेक्षित आहेत. यामध्ये जवळपास ७० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे केली जाणार असून, मार्चअखेरपर्यंत या रस्त्यांची निविदा प्रक्रिया तरी पूर्ण झाली पाहिजे, असे अपेक्षित आहे. असे असले तरी मुळातच औरंगाबाद जिल्हा परिषद ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या ताब्यात आहे. त्यामुळे राज्य सरकारने या जिल्हा परिषदेबाबत सुरुवातीपासूनच सावत्रपणाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या योजनेचा किती लाभ जिल्हा परिषदेला मिळेल, याबद्दल सदस्यांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, १६ आणि १७ सप्टेंबर २०१५ रोजी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास २०० ते २५० रस्ते व पूल वाहून गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. हे रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी जि. प. बांधकाम विभागाने २८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे. दोन महिन्यांचा कालावधी उलटला; पण अद्यापही त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे या रस्त्यांची कामे कधी होतील, याबद्दलही सदस्य साशंक आहेत.