शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

रस्ता एक, बाता अनेक; राज्य सरकार बदल्याने रस्त्याचे काम थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 19:09 IST

वर्कआॅर्डर दिलेली असताना काम का बंद पडले, यावरून लोकप्रतिनिधींनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देजयभवानीनगर, शिवाजी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे हालमनपाने निविदेसह वर्कआॅर्डर मंजूर केली; परंतु नंतर ते काम बंद पडले

औरंगाबाद : राज्यात सरकार बदलले आणि जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम थांबले. गेल्या सरकारने विशेष निधीतून ५ कोटी मंजूर केले. मनपाने निविदेसह वर्कआॅर्डर मंजूर केली; परंतु नंतर ते काम बंद पडले. आता मनपाने लोकप्रतिनिधीतून ते काम होईल, असे जाहीर करून टाकले आहे, तर वर्कआॅर्डर दिलेली असताना काम का बंद पडले, यावरून लोकप्रतिनिधींनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. रस्ता एक आणि टोलवा-टोलवीच्या बाता अनेक, असा प्रकार सध्या सुरू असल्याचे दिसते आहे. 

जयभवानीनगर, शिवाजी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या वाहनचालकांसह पायी चालणाऱ्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. तो रस्ता पूर्णत: खड्ड्यात गेला असून, पाच वर्षांपासून त्या रस्त्याच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरणाकडे कुणीही ढुंकून पाहिलेले नाही. रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या अनुषंगाने मालमत्ता पाडण्यात आल्या. मात्र, रुंदीकरण रखडले. शिवाय मनपाने आहे त्या रस्त्यावरील खड्डेदेखील बुजविलेले नाहीत. पावसाळ्यात त्या रस्त्यावरून जयभवानीनगर, विश्रांतीनगर, राजनगर, मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात जाणे नागरिकांना यातना देणारे ठरत आहे.

रस्त्यावर एक फुटाहून अधिक खोल खड्डे पडले आहेत, तसेच गुरुसहानीनगर ते एन-३ मार्गे कामगार चौक व हायकोर्टाकडे जाणारा रस्ता उखडला आहे. सुमारे ३०० मीटर लांबी असलेल्या या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, प्रत्येक वाहन चालकाला खड्डे वाचवून जावे लागते आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने काहीही प्रयत्न केलेले नाहीत. मागील पाच वर्षांत एन-४, एन-३, विश्रांतीनगर आणि जयभवानीनगर या तिन्ही वॉर्डांचे नगरसेवक भाजपचे होते. विश्रांतीनगरचे माजी नगरसेवक प्रमोद राठोड म्हणाले की, त्या रस्त्यासाठी अडीच कोटींची निविदा झाली आहे. काँक्रिटीकरणातून रस्ता करण्यात येईल, असा दावा त्यांनी केला.

शहर अभियंत्यांचे मत असे...शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी सांगितले, दीपाली हॉटेल ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचे काम पालिका करणार आहे. त्यापुढे होणारे काम लोकप्रतिनिधी अनुदानातून होणार आहे. आजवरच्या माहितीनुसार जयभवानीनगर ते रेल्वेस्टेशनपर्यंतच्या रस्त्यासाठी अद्याप काहीही तरतूद झालेली नाही. 

काम का थांबविले हे सांगावे पूर्व मतदारसंघाचे आ. अतुल सावे यांनी सांगितले, त्या रस्त्यासह इतर कामांसाठी मागील सरकारने पाच कोटी दिले होते. निवडणुकांमुळे निविदा आणि वर्कआॅर्डरला उशीर झाला. सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन कामही सुरू झाले; परंतु मनपाने ते काम पुढे नेलेच नाही. शासनाने अनुदान दिले आहे, याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर नगरविकास सचिवांशी बोलून चर्चा करू; अन्यथा कोर्टात दाद मागू. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी