शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

समांतर जलवाहिनीचा सुधारित प्रस्ताव महिनाभरात शासनाकडे दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:42 IST

समांतर जलवाहिनीच्या कंपनीची यापूर्वीच मनपाने हकालपट्टी केली आहे.

ठळक मुद्देनव्या जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय सातारा-देवळाईचा समावेश नव्या योजनेत करणार

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीसाठी सुधारित प्रस्ताव येत्या महिनाभरात शासनाकडे पाठविण्यात येईल. या प्रस्तावात सातारा-देवळाईचा समावेश करण्यात येणार आहे. शहराच्या आसपास २०० पेक्षा अधिक वसाहती आहेत. जिथे महापालिकेने मागील पंधरा वर्षांमध्ये जलवाहिन्याच टाकलेल्या नाहीत. त्या नो नेटवर्क एरियामध्येही जलवाहिन्या टाकण्यात याव्यात, असे प्रस्तावात नमूद केले जाणार असल्याचे आज आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले.

समांतर जलवाहिनीच्या कंपनीची यापूर्वीच मनपाने हकालपट्टी केली आहे. कंपनीने प्रकरण न्यायालयात नेऊन महापालिकेची कोंडी केली आहे. न्यायालयाबाहेर समेट घडवून आणण्यासाठी मनपाने अनेकदा प्रयत्न केले. कंपनीच्या जाचक अटींमुळे बोलणी फिसकटली. मनपा प्रशासनाने मार्चच्या पहिल्या आठवड्यातच नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. योजनेसाठी पालिकेने १०२३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. सोबतच सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी ४०० कोटी रुपयांचा प्रस्तावही पाठवला होता. मात्र, हे दोन्ही प्रस्ताव परत पाठवीत शासनाने दोन वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजनांना निधी मंजूर करता येणार नाही, असे कळविले आहे. 

समांतरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतच सातारा-देवळाईचा समावेश करून सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे पालिकेला सूचित केले आहे. बुधवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार सातारा-देवळाईचा डीपीआर केलेल्या पीएमसीकडूनच आता सुधारित डीपीआर तयार करून घेतला जात आहे. आगामी २० दिवसांत हा डीपीआर पीएमसी तयार करणार आहे. त्यानंतर तो प्रस्ताव मनपाच्या सभेसमोर ठेवून शासनाकडे पाठविला जाईल. विशेष म्हणजे या सुधारित प्रस्तावात शहराच्या ज्या भागात आजपर्यंत जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत, अशा नो नेटवर्क एरियाचाही समावेश केला जाणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. 

काही कामे स्मार्ट सिटीतूनहनुमान टेकडी, ज्युबिली पार्क, शहागंज, एन-५ या जलकुंभांवर योग्य दाबाने पाणी येत नसल्याने ते भरत नाहीत. त्यामुळे शहराला सद्य:स्थितीत पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या दोन्हीही जुन्या योजनांत सुधारणा करण्यासाठी काही आवश्यक कामे करण्यासाठी डॉ. राजेंद्र होलाणी यांनी प्रस्ताव दिला आहे. १० कोटींचा याकामी खर्च आहे. तेवढा निधी सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे हे काम आता स्मार्ट सिटीतील स्मार्ट वॉटरसाठी आरक्षित निधीतून करणार असल्याचे आयुक्त डॉ. निपुण यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकार