शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

समांतर जलवाहिनीचा सुधारित प्रस्ताव महिनाभरात शासनाकडे दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:42 IST

समांतर जलवाहिनीच्या कंपनीची यापूर्वीच मनपाने हकालपट्टी केली आहे.

ठळक मुद्देनव्या जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय सातारा-देवळाईचा समावेश नव्या योजनेत करणार

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीसाठी सुधारित प्रस्ताव येत्या महिनाभरात शासनाकडे पाठविण्यात येईल. या प्रस्तावात सातारा-देवळाईचा समावेश करण्यात येणार आहे. शहराच्या आसपास २०० पेक्षा अधिक वसाहती आहेत. जिथे महापालिकेने मागील पंधरा वर्षांमध्ये जलवाहिन्याच टाकलेल्या नाहीत. त्या नो नेटवर्क एरियामध्येही जलवाहिन्या टाकण्यात याव्यात, असे प्रस्तावात नमूद केले जाणार असल्याचे आज आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले.

समांतर जलवाहिनीच्या कंपनीची यापूर्वीच मनपाने हकालपट्टी केली आहे. कंपनीने प्रकरण न्यायालयात नेऊन महापालिकेची कोंडी केली आहे. न्यायालयाबाहेर समेट घडवून आणण्यासाठी मनपाने अनेकदा प्रयत्न केले. कंपनीच्या जाचक अटींमुळे बोलणी फिसकटली. मनपा प्रशासनाने मार्चच्या पहिल्या आठवड्यातच नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. योजनेसाठी पालिकेने १०२३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. सोबतच सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी ४०० कोटी रुपयांचा प्रस्तावही पाठवला होता. मात्र, हे दोन्ही प्रस्ताव परत पाठवीत शासनाने दोन वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजनांना निधी मंजूर करता येणार नाही, असे कळविले आहे. 

समांतरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतच सातारा-देवळाईचा समावेश करून सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे पालिकेला सूचित केले आहे. बुधवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार सातारा-देवळाईचा डीपीआर केलेल्या पीएमसीकडूनच आता सुधारित डीपीआर तयार करून घेतला जात आहे. आगामी २० दिवसांत हा डीपीआर पीएमसी तयार करणार आहे. त्यानंतर तो प्रस्ताव मनपाच्या सभेसमोर ठेवून शासनाकडे पाठविला जाईल. विशेष म्हणजे या सुधारित प्रस्तावात शहराच्या ज्या भागात आजपर्यंत जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत, अशा नो नेटवर्क एरियाचाही समावेश केला जाणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. 

काही कामे स्मार्ट सिटीतूनहनुमान टेकडी, ज्युबिली पार्क, शहागंज, एन-५ या जलकुंभांवर योग्य दाबाने पाणी येत नसल्याने ते भरत नाहीत. त्यामुळे शहराला सद्य:स्थितीत पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या दोन्हीही जुन्या योजनांत सुधारणा करण्यासाठी काही आवश्यक कामे करण्यासाठी डॉ. राजेंद्र होलाणी यांनी प्रस्ताव दिला आहे. १० कोटींचा याकामी खर्च आहे. तेवढा निधी सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे हे काम आता स्मार्ट सिटीतील स्मार्ट वॉटरसाठी आरक्षित निधीतून करणार असल्याचे आयुक्त डॉ. निपुण यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादState Governmentराज्य सरकार