शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

कारखान्याचा ताबा घेण्यासाठी आलेले बँक अधिकारी माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:57 IST

गंगापूर साखर कारखाना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या बँक अधिकाºयांना कारखाना सभासद व उस उत्पादक शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या अधिका-यांना या ठिकाणी तीव्र विरोध झाल्यामुळे पोलिसांच्या संरक्षणात आल्यापावली परतावे लागल्याने गंगापूर सहकारी साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया तूर्तास लांबली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगापूर : गंगापूर साखर कारखाना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या बँक अधिकाºयांना कारखाना सभासद व उस उत्पादक शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या अधिका-यांना या ठिकाणी तीव्र विरोध झाल्यामुळे पोलिसांच्या संरक्षणात आल्यापावली परतावे लागल्याने गंगापूर सहकारी साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेण्याची प्रक्रिया तूर्तास लांबली आहे.९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान गंगापूर कारखाना स्थळावर सदर आंदोलन झाले. यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे शेतकºयांच्या ताब्यात दिलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी बँकेचे प्राधिकृत अधिकारी बी. एम. राठोड, त्यांचे सहकारी एम. आर. कदम, एल. एस. यादव, बी.बी. उगले, बी.सी.जेवे, एस.एस.स्वामी, बी.एल.कदम, एस.आर.पांचाळ आदींचा ताफा या ठिकाणी आला होता.मात्र या ठिकाणी कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांत बंब, व्हा. चेअरमन लक्ष्मण भुसारे, संचालक मंडळ, संतोष जाधव, प्रदीप पाटील, प्रताप साळुंके, मधुकर वालतुरे, रामेश्वर मुंदडा, महेमूद पटेल, हरिभाऊ डव्हाण, मारुती खैरे, कल्याण गायकवाड, हाजी नासीरोद्दीन, अप्पासाहेब पाचपुते, भारत तुपलोंढे, बशीर पटेल आदींसह शेकडो ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कर्मचारी अगोदरच कारखाना प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून बसले होते.यावेळी आ. बंब म्हणाले की, न्यायालयात बरेच खटले प्रलंबित असल्याने त्यांना वेळ लागतो. नेमकी हीच संधी साधून वेळखाऊपणा करायचा आणि कधीतरी कारखाना आपल्याला भेटेल, या अपेक्षेने राजाराम फूड्सने चाल केली होती. मात्र शेतकºयांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. शेतकºयांना वेठीस धरणाºया बँकेलाही एका प्रकारे चपराक बसली आहे. २००८ मध्ये बँकेने चालू सुस्थितीत असलेला कारखाना गैरपद्धतीने ताब्यात घेतला होता. तो कारखाना किमान त्यांनी चालवायला पाहिजे होता. जेणेकरून वर्षाला १० ते १५ कोटींचा फायदा होऊन कारखाना कर्जमुक्त झाला असता. आजमितीला हा कारखाना शेतकºयांचा ताब्यात असला तरीदेखील वेळ हातून गेलेली नाही. साखर कारखाना हा शेतकºयांच्या मालकीचा आहे, यापुढेही राहणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, मात्र शेतकºयांचा रोष पाहता हा प्रकार थांबला पाहिजे व कारखाना शेतकºयांच्या ताब्यात दिला पाहिजे.वेळप्रसंगी रक्त सांडू...गंगापूर कारखाना शेतकºयांच्या मालकीचा राहण्यासाठी वेळप्रसंगी रक्त सांडू व शेतकºयांच्या कारखान्यावर कुणी राजकारण करत असेल तर त्यांनाही त्यांची जागा दाखवू, असे म्हटले. यासाठी लवकरच शेतकºयांना न्याय देण्यासाठी आंदोलन उभारणार असल्याचे संतोष जाधव म्हणाले.पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलाअधिकारी या ठिकाणी येताच जमावामधील सदाशीव शिरसाठ-सिरजगाव, अक्षय नरोडे -शिल्लेगाव यांनी सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी उपस्थित पोलिसांनी तात्काळ या लोकांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, पोलिसांनी परिसर पिंजून काढत आंदोलनस्थळावर अगोदरच लपवून ठेवलेले रॉकेलचे भरलेले डबे ताब्यात घेऊन जप्त केल्याने आंदोलकांना हालचाल करता आली नाही. मात्र यावेळी एकच गोंधळ उडाला. रेटारेटी व घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. याठिकाणी गोंधळ होणार हे लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक एस.एस. बिर्ला यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला होता . गोंधळ वाढत असल्याचे पाहून कारखान्याचे चेअरमन आ. बंब यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले.बँक अधिकारी म्हणतात... न्यायालयाच्या आदेशाने कार्यवाहीबँकेचे प्राधिकृत अधिकारी बी. एम. राठोड यांना कारखाना ताब्यात घेण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या ७९ /अ अन्वये शासनाला अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून जनहित व न्यायालयाच्या आधीन राहून सदर कारखाना व्यवस्थापनाच्या ताब्यात देण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या २२/१२/२०१७ मधील आदेशानुसार याचिका क्रमांक १०९०८ /२०१२ प्रमाणे कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.