शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नापासांना दिलेल्या पदव्या घेतल्या परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 05:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बॅचलर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (बीसीए) अभ्यासक्रमाला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या पदव्या अखेर परत घेतल्या आहेत, तशी माहिती स्वत: कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बॅचलर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (बीसीए) अभ्यासक्रमाला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या पदव्या अखेर परत घेतल्या आहेत, तशी माहिती स्वत: कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिली.‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या नापास विद्यार्थ्यांच्या पदव्या वाटप प्रकरणावर कुलगुरू चोपडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘लोकमत’कडून माहिती कळल्यानंतर पाच मिनिटांमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. फक्त बीसीएच्या पदव्यांमध्येच ही गडबड झाल्याचे समोर आले. महाविद्यालयात पाठविलेल्या सदोष पदव्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एका दिवसात जमा केल्या. आता कुणाकडेच सदोष पदवी प्रमाणपत्र नाही, तसेच विद्यापीठ अध्यादेश १०१ नुसार कोणतेही सदोष प्रमाणपत्र दुरुस्त करण्याचा, त्यात बदल करण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे. चुकून एखाद्या विद्यार्थ्याला सदोष पदवी प्रमाणपत्र दिल्याचे यापुढेही लक्षात आलेच, तर ते रद्द करण्यात येईल, असेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीत व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे आणि अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी यांचा समावेश आहे. ही समिती दोन दिवसांत अहवाल सादर करील.>सहा जणांना कारणे दाखवाडॉ. दिगंबर नेटके, उपकुलसचिव हेमलता ठाकरे, कक्ष अधिकारी पोपट निकम, भगवान फड, वरिष्ठ सहायक राजू गायकवाड आणि विनोद जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी सांगितले.>नैतिक जबाबदारी स्वीकारून माफी मागतोविद्यापीठाने पहिल्यांदाच पदवी प्रमाणपत्राच्या छपाईचे आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला. हा आदेश परीक्षा विभागाला ६ मे रोजी मिळाला. दीक्षान्त सोहळा १५ मे रोजी होता. संबंधित कंपनीला पदव्या छापण्याची दिलेली वर्कआॅर्डर आणि दीक्षान्त सोहळ्यात अवघा सात दिवसांचा कालावधी होता. यामुळे कंपनीकडे पाठविलेल्या २६४ अभ्यासक्रमांपैकी एका बीसीएच्या डेटात तांत्रिक चूक झाली. यामुळे विद्यापीठाची जी बदनामी झाली, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मराठवाड्यातील जनतेची माफी मागतो.- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा संचालक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद