शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

नापासांना दिलेल्या पदव्या घेतल्या परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 05:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बॅचलर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (बीसीए) अभ्यासक्रमाला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या पदव्या अखेर परत घेतल्या आहेत, तशी माहिती स्वत: कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बॅचलर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (बीसीए) अभ्यासक्रमाला नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या पदव्या अखेर परत घेतल्या आहेत, तशी माहिती स्वत: कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिली.‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या नापास विद्यार्थ्यांच्या पदव्या वाटप प्रकरणावर कुलगुरू चोपडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘लोकमत’कडून माहिती कळल्यानंतर पाच मिनिटांमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. फक्त बीसीएच्या पदव्यांमध्येच ही गडबड झाल्याचे समोर आले. महाविद्यालयात पाठविलेल्या सदोष पदव्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एका दिवसात जमा केल्या. आता कुणाकडेच सदोष पदवी प्रमाणपत्र नाही, तसेच विद्यापीठ अध्यादेश १०१ नुसार कोणतेही सदोष प्रमाणपत्र दुरुस्त करण्याचा, त्यात बदल करण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे. चुकून एखाद्या विद्यार्थ्याला सदोष पदवी प्रमाणपत्र दिल्याचे यापुढेही लक्षात आलेच, तर ते रद्द करण्यात येईल, असेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीत व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे आणि अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी यांचा समावेश आहे. ही समिती दोन दिवसांत अहवाल सादर करील.>सहा जणांना कारणे दाखवाडॉ. दिगंबर नेटके, उपकुलसचिव हेमलता ठाकरे, कक्ष अधिकारी पोपट निकम, भगवान फड, वरिष्ठ सहायक राजू गायकवाड आणि विनोद जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी सांगितले.>नैतिक जबाबदारी स्वीकारून माफी मागतोविद्यापीठाने पहिल्यांदाच पदवी प्रमाणपत्राच्या छपाईचे आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला. हा आदेश परीक्षा विभागाला ६ मे रोजी मिळाला. दीक्षान्त सोहळा १५ मे रोजी होता. संबंधित कंपनीला पदव्या छापण्याची दिलेली वर्कआॅर्डर आणि दीक्षान्त सोहळ्यात अवघा सात दिवसांचा कालावधी होता. यामुळे कंपनीकडे पाठविलेल्या २६४ अभ्यासक्रमांपैकी एका बीसीएच्या डेटात तांत्रिक चूक झाली. यामुळे विद्यापीठाची जी बदनामी झाली, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मराठवाड्यातील जनतेची माफी मागतो.- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा संचालक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद