शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

निकाल लागले आता ‘पंचाईत’ सरपंचपदासाठी; सदस्यांना मर्जीत ठेवण्याची कसरत सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 19:09 IST

अनेकांचे पॅनल पडले पण राखीव प्रवर्गाचे उमेदवार निवडून आले

ठळक मुद्देसरपंच सोडतीकडे लागले लक्ष तांत्रिक अडचणी काही ठिकाणी होतील

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल सोमवारी जाहीर झाले असले तरी सरपंचपदासाठी मोठी ‘पंचाईत’ निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाने सरपंचपदासाठी सोडत होत नाही, तोपर्यंत विजयी उमेदवारांना भाव येणार नाही. असे असले तरी चक्रानुक्रमानुसार ग्रामपंचायतीचे सरपंचपद ज्या प्रवर्गासाठी सुटणार आहे, त्यांनी मात्र अंदाज बांधून सदस्यांची पळवापळवी करीत सहलींच्या नियोजनाची सुरुवात केली आहे.

काही ग्रामपंचायतींमध्ये पूर्ण पॅनल पडले, पण राखीव प्रवर्गातील उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्या सदस्यांना मोठा भाव आलेला आहे. राखीव प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित झाले तर सदरील सदस्याला आतापासूनच मर्जीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील ६१७पैकी ३०८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होणे शक्य आहे. उर्वरित ३०९ ग्रामपंचायतीतील सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल. १५४ ओबीसी प्रगर्वासाठी त्यातील ७७ महिलांसाठी, तर अनुसूचित जाती, जमातीसाठी असलेल्या १५४ पदांमधून ७७ पदे महिलांसाठी आरक्षित होणे शक्य आहे. तसेच खुल्या प्रवर्गातील ३०९ पदांमधून ५० टक्के पदे महिलांसाठी आरक्षित होणे शक्य आहे. हे सगळे आरक्षण पाहता बहुतांश पॅनलकडे उमेदवार नाहीत. त्यामुळे सरपंचपद आरक्षित प्रवर्गाकडे गेल्यास आतापासूनच सर्वांनी तयारी सुरू केली आहे.

तांत्रिक अडचणी काही ठिकाणी होतीलकाँग्रेसचे जिल्हाप्रमुख माजी आमदार कल्याण काळे म्हणाले, पहिल्यांदा तर जिल्ह्यातील सर्व सोडती निघाल्या आहेत. त्यामुळे सरपंचपद समोर ठेवूनच लोकांनी निवडणूक लढविली. मात्र, सरकारने सार्वत्रिक निवडणुकांनंतर सरपंचपदासाठी आरक्षण घेण्याचे ठरविले. पण, निवडणुकापूर्वीचे आरक्षण बेकायदेशीर होते, असे म्हणता येणार नाही. ज्या ठिकाणी ११ सदस्य पॅनलचे निवडून आले असतील तर तेथे जुनी काय नवी सोडत असू द्या, काही अडचण येणार नाही. ज्या ग्रामपंचायती बहुमतात तेथे अडचण नाही. तांत्रिक अडचण तेथेच होईल, जेथे आरक्षण वेगळे असेल आणि उमेदवार उपलब्ध नसेल. त्यामुळे सध्या कुणीही कोणतेही मनोरे रचत नसल्याचे चित्र आहे.

जोपर्यंत सोडत नाही तोवर काहीच नाहीशिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले की, जोपर्यंत सरपंचपदासाठी सोडत जाहीर होत नाही तोपर्यंत काहीच करता येणार नाही. काही पॅनलकडे अनुसूचित जमाती, जाती, ओबीसीचे उमेदवार आहेत. बहुमत असूनही राखीव प्रवर्गाचे उमेदवार निवडून आलेले नाहीत. त्यामुळे सोडतीनंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी तालुकापातळीवर गोळाबेरीज सुरू आहे. सोडतीनंतरच फोडाफोडी, पळवापळवीसाठी प्रयत्न सुरू होतील, असा माझा अंदाज आहे. सध्या कोणतेही चित्र स्पष्ट नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे, ते गेले असतील बाहेर, परंतु आरक्षण सोडतीची वाट पाहणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींतील उमेदवार आहेत. कुणीही सध्या पुढे येण्यास तयार नाही.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतAurangabadऔरंगाबाद