शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:41 IST

फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलै-आॅगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.२४) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत औरंगाबाद विभागाचा निकाल २८.५० टक्के एवढा लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलै-आॅगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.२४) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत औरंगाबाद विभागाचा निकाल २८.५० टक्के एवढा लागला आहे.पुरवणी परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ८ हजार ४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ८ हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी केवळ २ हजार २८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी २८.५० टक्के एवढी आहे. राज्यातील सर्व विभागात १ लाख २ हजार १६० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात २३ हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याची टक्केवारी २२.६५ एवढी आहे. राज्यात लातूर विभागात सर्वांधिक ३१.४७ टक्के विद्यार्थी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यानंतर औरंगाबाद विभागातील उत्तीर्णतेची टक्केवारी दुसऱ्या स्थानी आहे. पुरवणी परीक्षेत सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागात १९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.२१ केंद्रांवर झाली परीक्षाबारावी पुरवणी परीक्षा औरंगाबाद विभागात २१ केंद्रांवर घेण्यात आली. यासाठी १८ परीक्षक, २१ केंद्र संचालक, ३३० पर्यवेक्षक, १ मुख्य नियामक, ९२ नियामक आणि १७९ परीक्षक कार्यरत होते. परीक्षा केंद्रांवर ५ आणि परीक्षोत्तर २, असे एकूण ७ गैरप्रकार उघडकीस आले. यासंबंधी चौकशी सुुरू आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHSC Result 2018बारावी निकाल २०१८