शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:41 IST

फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलै-आॅगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.२४) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत औरंगाबाद विभागाचा निकाल २८.५० टक्के एवढा लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलै-आॅगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.२४) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत औरंगाबाद विभागाचा निकाल २८.५० टक्के एवढा लागला आहे.पुरवणी परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ८ हजार ४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ८ हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी केवळ २ हजार २८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी २८.५० टक्के एवढी आहे. राज्यातील सर्व विभागात १ लाख २ हजार १६० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात २३ हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याची टक्केवारी २२.६५ एवढी आहे. राज्यात लातूर विभागात सर्वांधिक ३१.४७ टक्के विद्यार्थी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यानंतर औरंगाबाद विभागातील उत्तीर्णतेची टक्केवारी दुसऱ्या स्थानी आहे. पुरवणी परीक्षेत सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागात १९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.२१ केंद्रांवर झाली परीक्षाबारावी पुरवणी परीक्षा औरंगाबाद विभागात २१ केंद्रांवर घेण्यात आली. यासाठी १८ परीक्षक, २१ केंद्र संचालक, ३३० पर्यवेक्षक, १ मुख्य नियामक, ९२ नियामक आणि १७९ परीक्षक कार्यरत होते. परीक्षा केंद्रांवर ५ आणि परीक्षोत्तर २, असे एकूण ७ गैरप्रकार उघडकीस आले. यासंबंधी चौकशी सुुरू आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHSC Result 2018बारावी निकाल २०१८