शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

वारसा जपण्याची जबाबदारी सर्वांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:52 IST

शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके आपली भूषणे आहेत. ही भूषणे जपण्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन फातेमा झकेरिया यांनी शनिवारी बीबीका मकबरा येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके आपली भूषणे आहेत. ही भूषणे जपण्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन फातेमा झकेरिया यांनी शनिवारी बीबीका मकबरा येथे केले.भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडळातर्फे १६ ते ३० सप्टेंबरदरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी बीबीका मकबरा परिसरातील आइने महालातझाले.या कार्यक्रमाला मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा फातेमा झकेरिया, माजी संचालक डॉ. ए. जी. खान, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एन. एस. वाठोरे, पुरातत्व अधीक्षक डॉ. दिलीप कुमार खमारी, उपअधीक्षक डॉ. शिवाकांत वाजपेयी, मुख्य अभियंता आनंद तीर्थ, एन. सी. एच. पेडिंटलू, डॉ. टी. आर. पाटील, अण्णासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. खमारी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.आई आपल्या मुलांची काळजी घेते, त्याप्रमाणे आपण स्मारकांची जपणूक केली पाहिजे, या हेतूनेच या पंधरवड्याला ‘वात्सल्य-विरासत’ नाव देण्यात आल्याचे ते म्हणाले. विभागामार्फ त राबविल्या जाणाºया विविध कार्यक्रमांची माहिती डॉ. वाजपेयी यांनी दिली.स्वच्छता पंधरवड्याबाबत त्यांनी माहिती दिली. ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवायोजना समन्वयक डॉ. टी. आर. पाटील यांचीही भाषणे झाली. प्राचार्य वाठोरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती आवश्यक असल्याचे म्हटले. विद्यापीठाच्या रासेयोतील विद्यार्थ्यांच्या गटाने मकबरा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. कालिका महिला बचत गटाच्या सदस्यांची यावेळी उपस्थिती होती. त्यांचा झकेरिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी एम. आर. शेख, विजय सातभाई, विलीश रामटेके, नीलेश सोनवणे, ए. के. तुरे, नितू बित्रे यांच्यासह कर्मचाºयांची उपस्थिती होती. सहायक पुरातत्वज्ञ डॉ. किशोर चलवादी, रत्नेश कुमार यांनी सूत्रसंचालन केले.