शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

ग्रामपंचायतींवरच जबाबदारी

By admin | Updated: April 17, 2016 01:33 IST

औरंगाबाद : गावच्या सर्वांगीण विकासासाठी आता ग्रामपंचायतींनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीबरोबरच ग्रामपंचायतींना

औरंगाबाद : गावच्या सर्वांगीण विकासासाठी आता ग्रामपंचायतींनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीबरोबरच ग्रामपंचायतींना अन्य स्रोतांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दीडपट निधीची विकासकामे वार्षिक विकास आराखड्यात समाविष्ट करून त्यास ग्रामसभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. यंदा विकास आराखड्याशिवाय ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्यात आला असला तरी यापुढे मात्र, वार्षिक विकास आराखड्यानुसारच निधीचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना आता कात टाकावीच लागेल. यासंदर्भात जि. प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, पंचायतराज संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेमध्ये आता जिल्हा परिषद स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतले जातील. तालुकास्तरावर (पंचायत समिती) पर्यवेक्षकीय भूमिका पार पाडावी लागेल, तर ग्रामस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार यापुढे गटविकास अधिकाऱ्यांनाच ग्रामपंचायतींच्या कारभारावर लक्ष ठेवावे लागणार आहे. यासंबंधी जिल्ह्यातील सर्व नऊ गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन १४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींना वार्षिक विकास आराखडा तयार करावा लागणार असून, तो करताना स्थानिक शेतकरी, महिला, युवक, अनुसूूचित जाती, जमाती, महिला बचत गट, गावातील अशासकीय स्वयंसेवी संस्था, संघटना, अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सूचनांचा विचार करावा लागणार आहे. त्यानंतर ग्रामसभेसमोर विकास आराखड्याचे सादरीकरण करून त्यास मान्यता घ्यावी लागेल. त्यानंतर तो पंचायत समितीतील (गट स्तर) तांत्रिक समिती छाननी करेल. ही गट स्तरीय छाननी समिती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे आराखडे तांत्रिक छाननी करून सर्व आराखडे एकत्रितरीत्या पुढे जि. प. तील जिल्हा समितीकडे सादर करील. यासाठी ग्रामपंचायतस्तरावर एक ग्राम संसाधन गट स्थापन करावा लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येच्या तिप्पट सदस्यांची निवड या गटात करणे बंधनकारक आहे. यामध्ये गावातील जाणकार नागरिक, शेतकरी, अनुसूचित जाती, जमाती, महिला, युवक, अपंग, पोलीस पाटील आदींचा समावेश करण्याचे शासनाचे आदेश आहेत. या ग्राम संसाधन गटातील सदस्यांना प्रशिक्षण करण्याची तरतूदही या उपक्रमामध्ये आहे. प्रवीण प्रशिक्षक व प्रभारी अधिकारी हे या सदस्यांना प्रशिक्षण देतील. प्रवीण प्रशिक्षक व प्रभारी अधिकाऱ्यांना यशदामार्फत प्रशिक्षित केले जाणार आहे.