शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींवरच जबाबदारी

By admin | Updated: April 17, 2016 01:33 IST

औरंगाबाद : गावच्या सर्वांगीण विकासासाठी आता ग्रामपंचायतींनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीबरोबरच ग्रामपंचायतींना

औरंगाबाद : गावच्या सर्वांगीण विकासासाठी आता ग्रामपंचायतींनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीबरोबरच ग्रामपंचायतींना अन्य स्रोतांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दीडपट निधीची विकासकामे वार्षिक विकास आराखड्यात समाविष्ट करून त्यास ग्रामसभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. यंदा विकास आराखड्याशिवाय ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्यात आला असला तरी यापुढे मात्र, वार्षिक विकास आराखड्यानुसारच निधीचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना आता कात टाकावीच लागेल. यासंदर्भात जि. प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, पंचायतराज संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेमध्ये आता जिल्हा परिषद स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतले जातील. तालुकास्तरावर (पंचायत समिती) पर्यवेक्षकीय भूमिका पार पाडावी लागेल, तर ग्रामस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार यापुढे गटविकास अधिकाऱ्यांनाच ग्रामपंचायतींच्या कारभारावर लक्ष ठेवावे लागणार आहे. यासंबंधी जिल्ह्यातील सर्व नऊ गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन १४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींना वार्षिक विकास आराखडा तयार करावा लागणार असून, तो करताना स्थानिक शेतकरी, महिला, युवक, अनुसूूचित जाती, जमाती, महिला बचत गट, गावातील अशासकीय स्वयंसेवी संस्था, संघटना, अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सूचनांचा विचार करावा लागणार आहे. त्यानंतर ग्रामसभेसमोर विकास आराखड्याचे सादरीकरण करून त्यास मान्यता घ्यावी लागेल. त्यानंतर तो पंचायत समितीतील (गट स्तर) तांत्रिक समिती छाननी करेल. ही गट स्तरीय छाननी समिती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे आराखडे तांत्रिक छाननी करून सर्व आराखडे एकत्रितरीत्या पुढे जि. प. तील जिल्हा समितीकडे सादर करील. यासाठी ग्रामपंचायतस्तरावर एक ग्राम संसाधन गट स्थापन करावा लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येच्या तिप्पट सदस्यांची निवड या गटात करणे बंधनकारक आहे. यामध्ये गावातील जाणकार नागरिक, शेतकरी, अनुसूचित जाती, जमाती, महिला, युवक, अपंग, पोलीस पाटील आदींचा समावेश करण्याचे शासनाचे आदेश आहेत. या ग्राम संसाधन गटातील सदस्यांना प्रशिक्षण करण्याची तरतूदही या उपक्रमामध्ये आहे. प्रवीण प्रशिक्षक व प्रभारी अधिकारी हे या सदस्यांना प्रशिक्षण देतील. प्रवीण प्रशिक्षक व प्रभारी अधिकाऱ्यांना यशदामार्फत प्रशिक्षित केले जाणार आहे.