शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

एमआयएम नगरसेवकांचा अपात्रतेचा ठराव एकट्या महापौरांचा नाही तर बहुमताचा - नंदकुमार घोडेले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:20 IST

अतिक्रमण हटाव मोहिमेत एमआयएम पक्षाच्या पाच नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून मागील सर्वसाधारण सभेत पाच जणांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव एकट्या महापौरांनी मंजूर केलेला नाही. सभागृहाने हा निर्णय घेतला. एकट्या महापौरांनी हा निर्णय घेतला असता, तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी, असा टोला नंदकुमार घोडेले यांनी एमआयएमच्या विविध आरोपांवरून दिला.

औरंगाबाद : अतिक्रमण हटाव मोहिमेत एमआयएम पक्षाच्या पाच नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून मागील सर्वसाधारण सभेत पाच जणांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव एकट्या महापौरांनी मंजूर केलेला नाही. सभागृहाने हा निर्णय घेतला. एकट्या महापौरांनी हा निर्णय घेतला असता, तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी, असा टोला नंदकुमार घोडेले यांनी एमआयएमच्या विविध आरोपांवरून दिला.

आ. इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत शिवसेना-भाजप युतीवर विविध आरोप केले होते. त्यानंतर मंगळवारी जलील यांनी विभागीय आयुक्तांकडे महापौरांनी नियमबाह्य ठराव मंजूर केले असून, त्यांच्यावरच कारवाई करावी, अशी मागणी केली. यासंदर्भात आपली प्रतिक्रिया देताना घोडेले यांनी नमूद केले की, शनिवार ६ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत घेतलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत राहूनच घेतला. सभागृहातील बहुमताने हा निर्णय घेतला आहे. विधि सल्लागाराचा निर्णय घेऊनच पाच नगरसेवक अपात्र करण्याचा ठराव मंजूर केला. सभागृहात काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यांना या निर्णयाच्या विरोधात कुठेही दाद मागण्याचा अधिकार आहे.

बुधवारी इतिवृत्ताला मंजुरी६ जानेवारी रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेत एमआयएमचे विरोधीपक्षनेता फेरोज खान, गटनेता नासेर सिद्दीकी, नगरसेवक जमीर कादरी, नगरसेविका सरवत बेगम, साजेदा बेगम यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला. या विशेष सभेचे इतिवृत्त बुधवारी महापौरांनी मंजूर करून आयुक्तांकडे पाठवून दिले. आता आयुक्त उद्या किंवा परवा शासनाकडे पाच नगरसेवकांना अपात्र करण्याचा ठराव पाठवून देणार आहेत.

अतिक्रमण सिद्ध करून दाखवावेमहापौर नंदकुमार घोडेले यांनी स्वत: शहरात काही भागात अतिक्रमण केल्याचा आरोप आ. इम्तियाज जलील यांनी केला होता. या आरोपाचे पलटवार करताना घोडेले यांनी नमूद केले की, आमदारांनी हा आरोप फक्त सिद्ध करून दाखवावा. बीड बायपास रोडवर उच्चभ्रू वसाहतींना पाणी दिल्याच्या आरोपातही तथ्य नाही. मागेल त्याला पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. एखाद्या वसाहतीला पाणी देणे म्हणजे गुन्हा नाही. मी माझ्या घरी पाईपलाईन करून पाणी तर नेले नाही, ना...असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :municipal schoolमहापालिका शाळाAurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलील