शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच विद्यापीठात राजीनामा सत्र, अधिकाऱ्यांसह संचालकांचा समावेश

By राम शिनगारे | Updated: December 29, 2023 13:49 IST

कुलसचिव, परीक्षा संचालक, विद्यार्थी कल्याण विकास मंडळ संचालकांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच विद्यमान प्रभारी कुलसचिव, परीक्षा संचालक, विद्यार्थी कल्याण विकास मंडळाच्या संचालकांसह इतरांनी राजीनामा दिला आहे. त्याशिवाय कुलगुरूंसाेबतच प्रकुलगुरू आणि चार अधिष्ठातांचाही कार्यकाळ पूर्ण होणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रशासनातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहत विनाकारण त्रास देणाऱ्या विविध संघटनांसह पदाधिकाऱ्यांपासून संरक्षण देण्याचे काम केले. अधिकाऱ्याने चुकीचे काम केले असेल तर संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, काहींचे हित न जपल्यामुळे टार्गेट केल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी कुलगुरू ठामपणे उभे राहिले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांसह संचालकांना उत्तमपणे काम करता आले.

मात्र, ३१ डिसेंबर रोजी कुलगुरूंचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच कुलसचिव डॉ. भगवान साखळे, परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी, ताराबाई शिंदे अध्यासन केंद्राच्या संचालक डॉ. वीणा हुंबे, अकॅडमिक स्टाफ कॉलेजच्या संचालिका डॉ. धनश्री महाजन यांनी राजीनामे दिले आहेत. विद्यार्थी विकास कल्याण मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांचा २९ डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होत असल्यामुळे त्यांनी मुदतवाढीस नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कुलगुरू डॉ. येवले यापैकी कोणाचा राजीनामा स्वीकारतात आणि कोणाला नियुक्ती देतात, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याविषयी कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'नो कॉमेंट्स' असे उत्तर दिले.

विभागप्रमुखांना नको कार्यभारदरम्यान, विद्यापीठातील दोन विभागांच्या प्रमुखांनी कुलगुरूंकडे राजीनामा सुपूर्द केला होता. कुलगुरूंनी एकाचा राजीनामा फेटाळला आहे तसेच दुसऱ्या विभागप्रमुखाची समजूत काढली. या दोन्ही विभागप्रमुखांना सहकाऱ्याचा त्रास आहे. ३१ डिसेंबरनंतर कुलगुरू डॉ. येवले पदमुक्त झाल्यानंतर आपली बाजू कोण ऐकून घेईल, या भावनेतून संबंधितांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

काय आहेत कारणे?राजीनामा देण्यामागे कुलगुरूंचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याचे प्रमुख कारण आहे. काम करताना काही चुका झाल्याच तर सांभाळून घेणारे कुलगुरू असतील का? तसे कुलगुरू नसतील, विद्यापीठाचे पदाधिकारी, विविध संघटनांच्या रोषापेक्षा पदावरून दूर जाणे अनेकांनी पसंत केले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण