शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

कुलगुरूंचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच विद्यापीठात राजीनामा सत्र, अधिकाऱ्यांसह संचालकांचा समावेश

By राम शिनगारे | Updated: December 29, 2023 13:49 IST

कुलसचिव, परीक्षा संचालक, विद्यार्थी कल्याण विकास मंडळ संचालकांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच विद्यमान प्रभारी कुलसचिव, परीक्षा संचालक, विद्यार्थी कल्याण विकास मंडळाच्या संचालकांसह इतरांनी राजीनामा दिला आहे. त्याशिवाय कुलगुरूंसाेबतच प्रकुलगुरू आणि चार अधिष्ठातांचाही कार्यकाळ पूर्ण होणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रशासनातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहत विनाकारण त्रास देणाऱ्या विविध संघटनांसह पदाधिकाऱ्यांपासून संरक्षण देण्याचे काम केले. अधिकाऱ्याने चुकीचे काम केले असेल तर संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, काहींचे हित न जपल्यामुळे टार्गेट केल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी कुलगुरू ठामपणे उभे राहिले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांसह संचालकांना उत्तमपणे काम करता आले.

मात्र, ३१ डिसेंबर रोजी कुलगुरूंचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच कुलसचिव डॉ. भगवान साखळे, परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी, ताराबाई शिंदे अध्यासन केंद्राच्या संचालक डॉ. वीणा हुंबे, अकॅडमिक स्टाफ कॉलेजच्या संचालिका डॉ. धनश्री महाजन यांनी राजीनामे दिले आहेत. विद्यार्थी विकास कल्याण मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांचा २९ डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होत असल्यामुळे त्यांनी मुदतवाढीस नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कुलगुरू डॉ. येवले यापैकी कोणाचा राजीनामा स्वीकारतात आणि कोणाला नियुक्ती देतात, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याविषयी कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'नो कॉमेंट्स' असे उत्तर दिले.

विभागप्रमुखांना नको कार्यभारदरम्यान, विद्यापीठातील दोन विभागांच्या प्रमुखांनी कुलगुरूंकडे राजीनामा सुपूर्द केला होता. कुलगुरूंनी एकाचा राजीनामा फेटाळला आहे तसेच दुसऱ्या विभागप्रमुखाची समजूत काढली. या दोन्ही विभागप्रमुखांना सहकाऱ्याचा त्रास आहे. ३१ डिसेंबरनंतर कुलगुरू डॉ. येवले पदमुक्त झाल्यानंतर आपली बाजू कोण ऐकून घेईल, या भावनेतून संबंधितांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

काय आहेत कारणे?राजीनामा देण्यामागे कुलगुरूंचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याचे प्रमुख कारण आहे. काम करताना काही चुका झाल्याच तर सांभाळून घेणारे कुलगुरू असतील का? तसे कुलगुरू नसतील, विद्यापीठाचे पदाधिकारी, विविध संघटनांच्या रोषापेक्षा पदावरून दूर जाणे अनेकांनी पसंत केले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण