शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कुलगुरूंचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच विद्यापीठात राजीनामा सत्र, अधिकाऱ्यांसह संचालकांचा समावेश

By राम शिनगारे | Updated: December 29, 2023 13:49 IST

कुलसचिव, परीक्षा संचालक, विद्यार्थी कल्याण विकास मंडळ संचालकांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच विद्यमान प्रभारी कुलसचिव, परीक्षा संचालक, विद्यार्थी कल्याण विकास मंडळाच्या संचालकांसह इतरांनी राजीनामा दिला आहे. त्याशिवाय कुलगुरूंसाेबतच प्रकुलगुरू आणि चार अधिष्ठातांचाही कार्यकाळ पूर्ण होणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रशासनातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहत विनाकारण त्रास देणाऱ्या विविध संघटनांसह पदाधिकाऱ्यांपासून संरक्षण देण्याचे काम केले. अधिकाऱ्याने चुकीचे काम केले असेल तर संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, काहींचे हित न जपल्यामुळे टार्गेट केल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी कुलगुरू ठामपणे उभे राहिले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांसह संचालकांना उत्तमपणे काम करता आले.

मात्र, ३१ डिसेंबर रोजी कुलगुरूंचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच कुलसचिव डॉ. भगवान साखळे, परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी, ताराबाई शिंदे अध्यासन केंद्राच्या संचालक डॉ. वीणा हुंबे, अकॅडमिक स्टाफ कॉलेजच्या संचालिका डॉ. धनश्री महाजन यांनी राजीनामे दिले आहेत. विद्यार्थी विकास कल्याण मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांचा २९ डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होत असल्यामुळे त्यांनी मुदतवाढीस नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कुलगुरू डॉ. येवले यापैकी कोणाचा राजीनामा स्वीकारतात आणि कोणाला नियुक्ती देतात, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याविषयी कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'नो कॉमेंट्स' असे उत्तर दिले.

विभागप्रमुखांना नको कार्यभारदरम्यान, विद्यापीठातील दोन विभागांच्या प्रमुखांनी कुलगुरूंकडे राजीनामा सुपूर्द केला होता. कुलगुरूंनी एकाचा राजीनामा फेटाळला आहे तसेच दुसऱ्या विभागप्रमुखाची समजूत काढली. या दोन्ही विभागप्रमुखांना सहकाऱ्याचा त्रास आहे. ३१ डिसेंबरनंतर कुलगुरू डॉ. येवले पदमुक्त झाल्यानंतर आपली बाजू कोण ऐकून घेईल, या भावनेतून संबंधितांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

काय आहेत कारणे?राजीनामा देण्यामागे कुलगुरूंचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याचे प्रमुख कारण आहे. काम करताना काही चुका झाल्याच तर सांभाळून घेणारे कुलगुरू असतील का? तसे कुलगुरू नसतील, विद्यापीठाचे पदाधिकारी, विविध संघटनांच्या रोषापेक्षा पदावरून दूर जाणे अनेकांनी पसंत केले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण