शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

मराठ्यांना दिलेले आरक्षण फसवे;कोर्टात टिकण्याबाबत साशंकता : संभाजी ब्रिगेड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:47 IST

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी केली. 

ठळक मुद्देसमाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावालोकसभेच्या ३० आणि विधानसभेच्या १०० जागा लढविणार आहे.

औरंगाबाद : मराठा समाजाला सरकारने दिलेले आरक्षण फसवे आहे. यापूर्वीच्या सरकारनेही दिलेले आरक्षण टिकले नाही आणि हे आरक्षणदेखील कोर्टात टिकण्याबाबत साशंकता आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी केली. 

गजानन महाराज मंदिर येथील कडा आॅफिसच्या मैदानावर ब्रिगेडतर्फे  आयोजित स्वराज्य संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. ‘शहीद काकासाहेब शिंदे’ विचारमंचावर प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखारे, उपाध्यक्ष इम्तियाज पीरजादे, टिपू सुलतान यांचे वंशज मन्सूर अली शहा टिपू, प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रा. डॉ. शिवानंद भानुसे, डॉ. रामभाऊ मुरकुटे, जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, महानगर अध्यक्ष बाबासाहेब दाभाडे, जिजाऊ ब्रिगेडच्या रेखा चव्हाण आदींची उपस्थिती होती. 

खेडेकर म्हणाले, संभाजी ब्रिगेड या पक्षाच्या एकजुटीमुळे काही बांडगुळांना धडकी भरली आहे. पक्षबळावर येणाऱ्या लोकसभेच्या ३० आणि विधानसभेच्या १०० जागा लढविणार आहे. आरक्षण, शेतीमालाला भाव, विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन पक्ष वाटचाल करीत आहे. समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी विरोध करणारे ओबीसींचे नेते हे सरकारी पॅकेज घेऊन विरोध करीत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा विरोध नाही. दोन-चार जणांच्या विरोधामुळे हा सगळा प्रकार सुरू आहे. मेळाव्याचे प्रास्ताविक डॉ.भानुसे, गायकवाड यांनी केले. 

करून टाका औरंगाबादचे संभाजीनगरऔरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करून टाका ना, विरोध कुणाचा आहे ते आम्हाला सांगा. केंद्रात, राज्यात, मनपात तुमचीच सत्ता आहे. जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम असा संघर्ष निवडणुकीपुरता उभा करायचा, हा प्रकार आता तरी बंद करा. रामराज्य आणण्यासाठी अयोध्येत जाऊन काही होणार नाही. बहुजनांना सोबत घेऊन रामराज्य संभाजी ब्रिगेडच आणील. जे अयोध्येत गेले, त्यांनी आधी त्यांच्या वडिलांचे स्मारक बांधावे, असा टोलाही खेडेकर यांनी लगावला. 

७० वर्षांत संविधान शिल्लक ठेवले का? मेळाव्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँगे्रस, मनसे या पक्ष नेत्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका करण्यात आली. ७० वर्षे देशावर ज्यांनी सत्ता गाजविली, त्यांनी संविधान शिल्लक ठेवले काय, असा सवाल प्रवक्ते बनबरे यांनी उपस्थित केला. ओबीसी व मराठा असा संघर्ष निर्माण करणारे आरक्षण आम्हाला मान्य नाही. आरक्षण अहवाल विधानसभेत चर्चेसाठी खुला न करणे हे संशयास्पद असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली.

टिपू सुलतान हे छत्रपतींचे फॉलोवरटिपू सुलतान हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे फॉलोवर असल्याचे दाखले त्यांचे वंशज मन्सूर अली शहा टिपू यांनी मेळाव्यात दिले. ते म्हणाले, ७० वर्षांतील सत्ताधाऱ्यांनी आम्हाला गुलाम केले आहे. मुस्लिम समाजासाठी तीन वेगवेगळे आयोग स्थापन करण्यात आले. एकाही आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या नाहीत. एमआयएमचे नाव न घेता ते म्हणाले, त्यांनी आधी त्यांचे घर सांभाळावे, त्यानंतर मुस्लिम समाजाचे ठेकेदार व्हावे. पेशवे, ब्रिटिश आणि निजामांनी मिळून देशाचे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडElectionनिवडणूकMaratha Reservationमराठा आरक्षण