शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडीच्या पैशासाठी मुकादमाने डांबून ठेवलेल्या मजुरांच्या सहा मुलांची सुटका

By शिरीष शिंदे | Updated: June 14, 2023 19:27 IST

जिल्हा बाल कल्याण समितीने केले आई-वडिलांकडे सुपुर्द

बीड : ऊसतोडीच्या उचलीचे पैसे शिल्लक राहिल्याचा दावा करत एका मुकादमाने बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या सहा मुलांना कुंभेज (जि. सोलापूर) येथे डांबून ठेवले होते. करमाळा पोलिसांच्या मदतीने त्या सहा मुलांची सुटका करण्यात आली. बीडमध्ये आणल्यानंतर त्या सहा मुलांना जिल्हा बाल समिती सदस्यांनी कुटुंबीयांकडे बुधवारी सुपुर्द केले.

केज तालुक्यातील शिंदी येथील एक कुटुंब व गेवराई तालुक्यातील दोन कुटुंबे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. ऊसतोडणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर करमाळा येथील एका ऊसतोड मुकादमाने मजुरांकडे पैसे शिल्लक असल्याचे म्हणत आणखी तीन महिने काम करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांनी तीन महिने काम केले; परंतु अद्यापही पैसे शिल्लक असल्याचा दावा मुकादमाने केला. पैसे द्या; अन्यथा तुमची मुले आमच्याकडे ठेवा, असे सांगत त्या ऊसतोड मुकादमाने तीन मुले व तीन मुली करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे डांबून ठेवल्या.

दरम्यान, शांताबाई वसंत माळी यांनी सोलापूर येथील चाइल्ड लाइनला मुले डांबून ठेवल्याची माहिती दिली. त्यावरून चाइल्ड लाइनने ही माहिती सोलापूरच्या बाल कल्याण समितीला कळवली. समितीने करमाळा पोलिसांना याची माहिती देत त्या बालकांची सुटका करण्याचे आदेशित केले. महिला पोलिस हवालदार पांढरे यांनी बालकांची सुटका करून सोलापूर बाल कल्याण समितीपुढे सादर केले. तेथून केज येथील अमर पाटील यांनी त्या मुलांना बीडमध्ये आणले. त्यानंतर बालकांना आई-वडिलांकडे सुपुर्द केले. यावेळी बीड जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सदस्य सुरेश राजहंस, प्रा. छाया गडगे, ॲड. संतोष वारे उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड