शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

औरंगाबाद जिल्ह्यातील मतदार पळवापळवीचा घोळ ३१ आॅक्टोबरपूर्वी कळवा : जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:33 IST

निवडणुकीदरम्यान मतदारांच्या पळवापळवीबाबत अनेक तक्रारी येतात. त्याबाबत ३१ आॅक्टोबरपूर्वी तक्रार करावी

औरंगाबाद : लोकसभा निवडणुका सात महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने सर्वतोपरी तयारी सुरू केली असून, प्रारूप मतदार याद्यांच्या कामाला गती आली आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांच्या पळवापळवीबाबत अनेक तक्रारी येतात. त्याबाबत ३१ आॅक्टोबरपूर्वी तक्रार करावी, त्यानंतर कुणाचे काहीही ऐकून घेतले जाणार नाही, असे  जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांची उपस्थिती होती.  

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, मतदारांना स्थलांतरित होण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मतदार स्थलांतरित झाले तर ते बेकायदेशीर नाही; परंतु मोठ्या संख्येने जर तो आकडा असेल, तर त्याबाबत ३१ आॅक्टोबरपूर्वी आक्षेप घेतला, तर प्रशासन कारवाई करील. मतदार याद्या अंतिम करण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. याद्यांमध्ये तेथेच घोळ होतो, असे पत्रकारांनी विचारले असता, जिल्हाधिकारी म्हणाले, त्यासाठीच ३१ आॅक्टोबरची मुदत आक्षेपासाठी आहे. १ सप्टेंबर २०१८ ते ४ जानेवारी २०१९ पर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  ४ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 

एप्रिलमध्ये निवडणूक पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. विधानसभा निवडणुकांची तारीख निश्चित नाही. ईव्हीएमद्वारे निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रशिक्षण पार पडले. २ हजार ९५७ मतदान केंद्रांसाठी ५७४३ मतदान युनिट आणि ३ हजार ७३९ नियंत्रण युनिट जिल्ह्यात असतील. बेल या कंपनीचे अभियंते ते यंत्र तपासून सील करतील. ही प्रक्रिया सामान्य नागरिक ते लोकप्रतिनिधींसाठी पाहता येईल. २५ दिवस हा कार्यक्रम इन कॅमेरा असेल. यानंतर यंत्र सील केल्यावर, मतदारसंघात गेल्यावर ईआरओ तपासतील. त्यामुळे यंत्रांणा छेडछाड होणार नाही. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAurangabadऔरंगाबाद