शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

सरकारला शेतकऱ्यांच्या सर्व्हेचा अहवाल देणार; स्वेच्छानिवृत्तीनंतर केंद्रकर पायी गेले निवासस्थानाकडे

By विकास राऊत | Updated: July 4, 2023 12:21 IST

आयुक्तालय ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे गुलशन महल या शासकीय निवासस्थानापर्यंत नागरिकांनी हे दृश्य मोबाइलमध्ये कैद केले.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या असून त्यावर उपाययोजनांसाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न वाया गेल्यानंतर माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील २१ लाख शेतकरी कुटुंबांचा सर्व्हे केला आहे. बळीराजा सर्व्हेअंतर्गत तो सर्व्हे असून, हा प्रश्न पूर्णपणे धसास लावणारच, असे मत केंद्रेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.

त्या सर्व्हेचे विश्लेषण पूर्ण होण्यापूर्वीच दोन्ही हंगामांत एकरी २० हजार रुपये रोख शेतकऱ्यांना देण्याची सूचना सरकारला करण्याचे वक्तव्य केंद्रेकर यांनी १६ मे रोजी केले होते. त्यानंतर, त्यांनी २४ मे रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. तो शासनाने मंजूर केल्यानंतर, ३ जुलै रोजी केंद्रेकर यांनी पदभार सोडला. आयुक्तालयातून केंद्रेकर सपत्नीक विनावाहन पायी गुलशन महलपर्यंत गेले. सोबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, महसूल उपायुक्त पराग सोमण आदी अधिकाऱ्यांचा लवाजमाही पायीच निघाला. आयुक्तालय ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे गुलशन महल या शासकीय निवासस्थानापर्यंत नागरिकांनी हे दृश्य मोबाइलमध्ये कैद केले. दिवसभरात अनेक सनदी अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.

पुढच्या आठवड्यात अहवाल शासनाकडे...कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेअभावी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. सर्व्हे पूर्ण झाला असून, अंतिम निष्कर्षासह शेतकऱ्यांना दोन्ही हंगामांत एकरी दहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याची शिफारस करण्याचा अहवाल पुढच्या आठवड्यात शासनाकडे देण्यात येणार आहे.

सर्व्हेमधून काय दिसले?शेतकऱ्यांची मानसिकता कशी आहे, यावरून शेतकरी आत्महत्या करू शकतो का, याचा अंदाज आला आहे. मुली लग्नाला आल्या आहेत, आर्थिक परिस्थिती वाईट आहे, कर्ज आहे. याचे विश्लेषण करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आहे, त्यांना बोलावून समुपदेशन करण्यात येईल.

असा केला सर्व्हे.....बारा विभागातील १०४ प्रश्नांची माहिती भरून घेतली आहे. आत्महत्येचा विचार येणाऱ्या शेतकऱ्यांची वेगळी यादी आहे. शेतकऱ्यांची कौटुंबिक माहिती, आर्थिक अडचण, कर्ज, कलह, व्यसन, बेरोजगारांची संख्या इ. प्रश्नांची माहिती संकलित करण्यात आली.

शेती, पर्यावरणात रमणार- केंद्रेकरशेती, शेतकरी पर्यावरणात रमणार असल्याचे केंद्रेकर म्हणाले. नोकरीमुळे जगायचे राहून गेले आहे. एकच मुलगा असून, तो मोठा होऊन परदेशात कधी गेला, हे समजलेही नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी काम करायचे आहे. वाचन, चित्रकला, भटकंती, निसर्गाच्या सान्निध्यात पुढील काळ घालविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी