शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सरकारला शेतकऱ्यांच्या सर्व्हेचा अहवाल देणार; स्वेच्छानिवृत्तीनंतर केंद्रकर पायी गेले निवासस्थानाकडे

By विकास राऊत | Updated: July 4, 2023 12:21 IST

आयुक्तालय ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे गुलशन महल या शासकीय निवासस्थानापर्यंत नागरिकांनी हे दृश्य मोबाइलमध्ये कैद केले.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या असून त्यावर उपाययोजनांसाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न वाया गेल्यानंतर माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील २१ लाख शेतकरी कुटुंबांचा सर्व्हे केला आहे. बळीराजा सर्व्हेअंतर्गत तो सर्व्हे असून, हा प्रश्न पूर्णपणे धसास लावणारच, असे मत केंद्रेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.

त्या सर्व्हेचे विश्लेषण पूर्ण होण्यापूर्वीच दोन्ही हंगामांत एकरी २० हजार रुपये रोख शेतकऱ्यांना देण्याची सूचना सरकारला करण्याचे वक्तव्य केंद्रेकर यांनी १६ मे रोजी केले होते. त्यानंतर, त्यांनी २४ मे रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. तो शासनाने मंजूर केल्यानंतर, ३ जुलै रोजी केंद्रेकर यांनी पदभार सोडला. आयुक्तालयातून केंद्रेकर सपत्नीक विनावाहन पायी गुलशन महलपर्यंत गेले. सोबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, महसूल उपायुक्त पराग सोमण आदी अधिकाऱ्यांचा लवाजमाही पायीच निघाला. आयुक्तालय ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे गुलशन महल या शासकीय निवासस्थानापर्यंत नागरिकांनी हे दृश्य मोबाइलमध्ये कैद केले. दिवसभरात अनेक सनदी अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.

पुढच्या आठवड्यात अहवाल शासनाकडे...कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेअभावी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. सर्व्हे पूर्ण झाला असून, अंतिम निष्कर्षासह शेतकऱ्यांना दोन्ही हंगामांत एकरी दहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याची शिफारस करण्याचा अहवाल पुढच्या आठवड्यात शासनाकडे देण्यात येणार आहे.

सर्व्हेमधून काय दिसले?शेतकऱ्यांची मानसिकता कशी आहे, यावरून शेतकरी आत्महत्या करू शकतो का, याचा अंदाज आला आहे. मुली लग्नाला आल्या आहेत, आर्थिक परिस्थिती वाईट आहे, कर्ज आहे. याचे विश्लेषण करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आहे, त्यांना बोलावून समुपदेशन करण्यात येईल.

असा केला सर्व्हे.....बारा विभागातील १०४ प्रश्नांची माहिती भरून घेतली आहे. आत्महत्येचा विचार येणाऱ्या शेतकऱ्यांची वेगळी यादी आहे. शेतकऱ्यांची कौटुंबिक माहिती, आर्थिक अडचण, कर्ज, कलह, व्यसन, बेरोजगारांची संख्या इ. प्रश्नांची माहिती संकलित करण्यात आली.

शेती, पर्यावरणात रमणार- केंद्रेकरशेती, शेतकरी पर्यावरणात रमणार असल्याचे केंद्रेकर म्हणाले. नोकरीमुळे जगायचे राहून गेले आहे. एकच मुलगा असून, तो मोठा होऊन परदेशात कधी गेला, हे समजलेही नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी काम करायचे आहे. वाचन, चित्रकला, भटकंती, निसर्गाच्या सान्निध्यात पुढील काळ घालविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी