शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

Aurangabad Violence : भाडेकरूंची दुकाने जाळली की जळाली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 10:38 IST

दंगलखोरांनी जाळलेल्या दुकानातील बहुतांश दुकाने ही पोटभाडेकरूंची असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. मालक आणि पोटभाडेकरूंच्या वादामुळे दंगलीत पोटभाडेकरूंचीच दुकाने जाळण्यात आली की जाळली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दंगलखोरांनी जाळलेल्या दुकानातील बहुतांश दुकाने ही पोटभाडेकरूंची असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. मालक आणि पोटभाडेकरूंच्या वादामुळे दंगलीत पोटभाडेकरूंचीच दुकाने जाळण्यात आली की जाळली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नवाबपुरा, राजाबाजार, शहागंज, चमन चौक आणि गुलमंडीवर शेकडो दुकाने जाळण्यात आली आहे. यातील बहुतांश दुकाने अनेक वर्षांपासून पोटभाडेकरूंची आहेत. दंगलग्रस्त भागात कोणत्याही ठिकाणी सलगपणे जाळपोळ करण्यात आलेली नाही. टिपून टिपून दुकाने जाळण्यात आलेली असल्याचे एकूण सर्व जाळपोळीतून दिसून येत आहे. दंगलग्रस्त भागातील बहुतांश दुकाने ही एका गटातील मालकीची होती, तर पोटभाडेकरू दुसऱ्या गटातील आहेत. दुकाने खाली करणे, भाडे वाढविणे यातून मालक आणि पोटभाडेकरू यांच्यात सतत वाद होत होते. मात्र, पोटभाडेकरू काहीही झाले तरी दुकान खाली करत नव्हते. यातून दंगलीमध्ये पोटभाडेकरूंचीच दुकाने जाळण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.दुकाने खाली करण्यासाठी सुपारीया भागातील मालकांनी पोटभाडेकरूंनी दुकाने खाली करण्यासाठी सुपारी दिली असल्याचेही बोलले जात आहे. दुकाने खाली करण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून काहीजण प्रयत्न करीत होते. मात्र, यात यश मिळाले नव्हते. गांधीनगरात झालेल्या वादाचा फायदा घेत या भागात दंगल भडकवली. या दंगलीचा फायदा घेत अडचण वाटणा-या पोटभाडेकरूंची दुकाने जाळण्यात आली. याविषयी सर्व माहिती पोलीस तपासात पुढे येईल, असेही काही पोटभाडेकरूंनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :fireआगSocialसामाजिकAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार