शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

विवादामुळे अडगळीत पडलेल्या गांधी भवनाचे ३५ लाख रुपये खर्च करून झाले नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:28 IST

औरंगाबाद शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेले गांधी भवन मागील काही वर्षांपासून विवादामुळे अडगळीत पडले होते.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी गांधीवादी नागरिकांनी एकत्र येऊन केंद्र आणि राज्य पातळीवर गांधी स्मारक निधी उभारण्यात आला. यातून राज्यात विविध ठिकाणी गांधी भवनांची उभारणी झाली. औरंगाबाद शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेले गांधी भवन मागील काही वर्षांपासून विवादामुळे अडगळीत पडले होते. मात्र वर्षभरापूर्वी वाद मिटला. आता संपूर्ण इमारतीचे ३५ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे.

महात्मा गांधी यांचे विचार प्रसारित करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी स्थापन करण्यात आला. याचे मुख्यालय पुणे शहरात आहे. या निधीच्या औरंगाबाद, बुलडाणा आणि नागपूर येथे शाखा आहेत. औरंगाबादेतील समर्थनगर येथील शाखेच्या इमारतीचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या हस्ते २ आॅक्टोबर १९६४ रोजी झाले होते. तेव्हापासून ही वास्तू गांधी विचारांची वाहक होती. गांधी विचारांचे ग्रंथ, विचारमंथन, वैचारिक चर्चा याठिकाणी होत असत. मात्र मागील काही वर्षांपासून या भवनालाही वादविवादाची किनार मिळाली. दिवंगत स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीनारायण जैस्वाल जोपर्यंत कामकाज पाहत होते, तोपर्यंत अनेक कार्यक्रम होत होते. मात्र वादामुळे त्यांनीही यातून लक्ष कमी केले. यातच गांधी भवनात ज्यांना भाड्याने जागा दिली होती त्यांनी कब्जा मिळविला होता. खोल्या पडू लागल्या होत्या. पावसाळ्यात इमारत गळत होती. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली होती. यातच चालू वर्षाच्या सुरुवातीला न्यायालयीन वाद मिटला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या बाजूने निकाल लागला.  यानंतर स्थानिक शाखेचे सदस्य डॉ. मच्छिंद्रनाथ गोर्डे यांच्याकडे गांधी भवनाचा कारभार देण्यात आला.

डॉ. गोर्डे यांनी पहिल्यांदा भाडेकरूंकडून इमारतीचा ताबा घेतला. तसेच मुख्य कार्यालयाला नूतनीकरणाचे अंदाजपत्रक तयार करून देऊन निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. यानुसार निधी उभा करण्याच्या बोलीवर डॉ. सप्तर्षी यांनी मुख्य कार्यालयाच्या निधीतील ३५ लाख रुपये दिले. यातून दोन सभागृह, कार्यालय आणि १७ खोल्यांचे दरवाजे, खिडक्या, फरशी बदलण्यात आली. वाळूने प्लास्टर करून रंग देण्यात आला. नव्याने स्वच्छतागृहे उभारली आहेत. पूर्ण भवनाला स्वतंत्र दरवाजा, कंपाऊंड तयार केले आहे. यामुळे १७ खोल्यांमध्ये ६० विद्यार्थी राहण्यास आले आहेत. आता भवनाला गतवैभव देऊन सतत सामाजिक प्रबोधन, गांधी विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती स्थानिक व्यवस्थापक डॉ. गोर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गांधी विचारांचे ग्रंथ उपलब्धगांधी भवनामध्ये महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या ग्रंथांसहित गांधी विचारांचे ग्रंथ वाचण्यास, खरेदी करण्यास ग्रंथालयात उपलब्ध होते. मागील अनेक वर्षांपासून हे ग्रंथालय बंद होते. आता ते सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात ग्रंथ उपलब्ध नाहीत. मात्र काही दिवसांत मुख्य कार्यालयाकडून ग्रंथ पाठविण्यात येणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा गांधी भवन वैचारिक वादविवाद, विचार, प्रसार, सामाजिक प्रबोधनांच्या कार्यक्रमांनी गजबजणार असल्याचे डॉ. गोर्डे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMahatma Gandhiमहात्मा गांधीfundsनिधी