शहरं
Join us  
Trending Stories
1
६७ बिनविरोध नगरसेवक निवडणूक आयोगाच्या रडारवर; दबाव टाकला की आमिष दाखवलं? होणार चौकशी
2
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
3
तारिक रहमान होणार 'किंग', पण प्रचाराचं काय? बांगलादेशात निवडणूक आयोगाच्या 'या' एका नियमाने वाढवलं टेन्शन!
4
इराणमध्ये खामेनींविरोधात निदर्शने तीव्र, ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे 'Gen-Z' चा उत्साह वाढला
5
एकच प्रीमिअम, पती-पत्नीला मिळणार विमा सुरक्षा प्लॅन; जाणून घ्या कसं?
6
महाराष्ट्राचा शाहरुख खान! पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेश कामतचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, दाखवले सिक्स पॅक ॲब्स
7
कंडोमच्या किमती वाढल्याने लोकसंख्या वाढेल? सलग तिसऱ्या वर्षी चीनला भीती, भारतासाठी ही एक संधी
8
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामाचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
9
‘नवसाचं पोर गेलं, भरपाई दिल्याने परत येणार का?’ दूषित पाण्यामुळे मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना हटवले
10
इराण पेटला...! सर्वोच्च नेते खामेनेईंविरुद्ध तरुणाईचे रस्त्यावर उतरून आंदोलन; देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर, निदर्शनात सात जणांचा मृत्यू
11
कॅनडा सोडायची वेळ आली? १० लाख भारतीयांचे 'लीगल स्टेटस' धोक्यात; जंगलात टेंट लावून राहण्याची आली वेळ!
12
कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत
13
शेणाने रंगवल्या आहेत नितीन गडकरींच्या घराच्या भिंती, फराह खानने दाखवली झलक, पाहा व्हिडीओ
14
शाहरुख खान अन् भन्साळीही वापरणार 'धुरंधर' फॉर्म्युला? 'किंग' अन् 'लव्ह अँड वॉर' दोन भागांमध्ये येणार
15
Shakambhari Purnima 2026: शाकंभरी पौर्णिमेचा 'महायोग'! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचा पूर
16
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
17
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
18
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
19
पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
20
संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

विवादामुळे अडगळीत पडलेल्या गांधी भवनाचे ३५ लाख रुपये खर्च करून झाले नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:28 IST

औरंगाबाद शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेले गांधी भवन मागील काही वर्षांपासून विवादामुळे अडगळीत पडले होते.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी गांधीवादी नागरिकांनी एकत्र येऊन केंद्र आणि राज्य पातळीवर गांधी स्मारक निधी उभारण्यात आला. यातून राज्यात विविध ठिकाणी गांधी भवनांची उभारणी झाली. औरंगाबाद शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेले गांधी भवन मागील काही वर्षांपासून विवादामुळे अडगळीत पडले होते. मात्र वर्षभरापूर्वी वाद मिटला. आता संपूर्ण इमारतीचे ३५ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे.

महात्मा गांधी यांचे विचार प्रसारित करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी स्थापन करण्यात आला. याचे मुख्यालय पुणे शहरात आहे. या निधीच्या औरंगाबाद, बुलडाणा आणि नागपूर येथे शाखा आहेत. औरंगाबादेतील समर्थनगर येथील शाखेच्या इमारतीचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या हस्ते २ आॅक्टोबर १९६४ रोजी झाले होते. तेव्हापासून ही वास्तू गांधी विचारांची वाहक होती. गांधी विचारांचे ग्रंथ, विचारमंथन, वैचारिक चर्चा याठिकाणी होत असत. मात्र मागील काही वर्षांपासून या भवनालाही वादविवादाची किनार मिळाली. दिवंगत स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीनारायण जैस्वाल जोपर्यंत कामकाज पाहत होते, तोपर्यंत अनेक कार्यक्रम होत होते. मात्र वादामुळे त्यांनीही यातून लक्ष कमी केले. यातच गांधी भवनात ज्यांना भाड्याने जागा दिली होती त्यांनी कब्जा मिळविला होता. खोल्या पडू लागल्या होत्या. पावसाळ्यात इमारत गळत होती. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली होती. यातच चालू वर्षाच्या सुरुवातीला न्यायालयीन वाद मिटला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या बाजूने निकाल लागला.  यानंतर स्थानिक शाखेचे सदस्य डॉ. मच्छिंद्रनाथ गोर्डे यांच्याकडे गांधी भवनाचा कारभार देण्यात आला.

डॉ. गोर्डे यांनी पहिल्यांदा भाडेकरूंकडून इमारतीचा ताबा घेतला. तसेच मुख्य कार्यालयाला नूतनीकरणाचे अंदाजपत्रक तयार करून देऊन निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. यानुसार निधी उभा करण्याच्या बोलीवर डॉ. सप्तर्षी यांनी मुख्य कार्यालयाच्या निधीतील ३५ लाख रुपये दिले. यातून दोन सभागृह, कार्यालय आणि १७ खोल्यांचे दरवाजे, खिडक्या, फरशी बदलण्यात आली. वाळूने प्लास्टर करून रंग देण्यात आला. नव्याने स्वच्छतागृहे उभारली आहेत. पूर्ण भवनाला स्वतंत्र दरवाजा, कंपाऊंड तयार केले आहे. यामुळे १७ खोल्यांमध्ये ६० विद्यार्थी राहण्यास आले आहेत. आता भवनाला गतवैभव देऊन सतत सामाजिक प्रबोधन, गांधी विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती स्थानिक व्यवस्थापक डॉ. गोर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गांधी विचारांचे ग्रंथ उपलब्धगांधी भवनामध्ये महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या ग्रंथांसहित गांधी विचारांचे ग्रंथ वाचण्यास, खरेदी करण्यास ग्रंथालयात उपलब्ध होते. मागील अनेक वर्षांपासून हे ग्रंथालय बंद होते. आता ते सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात ग्रंथ उपलब्ध नाहीत. मात्र काही दिवसांत मुख्य कार्यालयाकडून ग्रंथ पाठविण्यात येणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा गांधी भवन वैचारिक वादविवाद, विचार, प्रसार, सामाजिक प्रबोधनांच्या कार्यक्रमांनी गजबजणार असल्याचे डॉ. गोर्डे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMahatma Gandhiमहात्मा गांधीfundsनिधी