शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

दौलताबाद किल्ल्यालगतची अतिक्रमणे हटवा, अन्यथा १०० मीटरचा नियम लागू करू....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 19:40 IST

Encroachment near Doulatabad Fort : किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणे काढून तेथे पर्यटकांसाठी सोयीसुविधा उभारण्याच्या कामास स्थानिकांनी विरोध करून काम बंद पाडल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. चावळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची भूमिका विषद केली.

ठळक मुद्देकेंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मिलनकुमार यांचा इशारा

औरंगाबाद : जगप्रसिद्ध दौलताबाद किल्ला ( Doulatabad Fort ) पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या कामात दौलताबाद ग्रामपंचायत आणि स्थानिक नेत्यांनी खोडा घातला आहे. किल्ल्यालगतची अतिक्रमणे काढण्यास स्थानिकांनी पुढाकार घेऊन प्रशासनास मदत करावी. अन्यथा जागतिक वारसा स्थळाच्या १०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नसते. आम्हांलाही नियमानुसार कारवाई करावी लागेल, असा इशारा पुरातत्त्व ( Archaeological Survey of India ) अधीक्षक डॉ. मिलन कुमार चावळे यांनी दिला.

किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणे काढून तेथे पर्यटकांसाठी सोयीसुविधा उभारण्याच्या कामास स्थानिकांनी विरोध करून काम बंद पाडल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. चावळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची भूमिका विषद केली. ते म्हणाले, देश-विदेशातील पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करता याव्यात, याकरीता २००१ साली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी किल्ल्याजवळील ३ एकर ८ आर जमीन केंद्रीय पुरातत्त्व विभागाला प्रदान केली. तेव्हापासून ही जमीन केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. मुख्यमंत्री निधीतून या जमिनीला संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी ६ लाख २५ हजार रुपये निधी मिळाला होता. या निधीतून संरक्षक भिंत बांधण्यात आली. मात्र, किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरील वाहनतळावर काही लोकांनी अतिक्रमण केले. त्यांनी तेथून उठावे, याकरीता त्यांना विनंती करण्यात आली असता त्यांनी नकार दिला. एवढेच नव्हे तर ही जागा ग्रामपंचायतीची आहे, गावकऱ्यांना विश्वासात न घेता केंद्रीय पुरातत्त्व विभागाला जमीन परस्पर देण्यात आली होती, हे आम्हांला मान्य नसल्याचे सरपंच आणि अन्य स्थानिक नेते सांगत आहेत. सोयी सुविधा उपलब्ध केल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल, याचा लाभ सर्वांना होईल. याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर अतिक्रमणधारकांनी अचानक ठिय्या आंदोलन केले. मोठा जमाव जमल्याने अतिक्रमण काढण्याचे काम तूर्त स्थगित केले. यानंतर सुमारे २५ जणांनी या जमिनीबद्दल न्यायालयात दावा दाखल केला. या खटल्यावर २३ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाला मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Doulatabad Fortदौलताबाद किल्लाArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणEnchroachmentअतिक्रमणAurangabadऔरंगाबाद