शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

दौलताबाद किल्ल्यालगतची अतिक्रमणे हटवा, अन्यथा १०० मीटरचा नियम लागू करू....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 19:40 IST

Encroachment near Doulatabad Fort : किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणे काढून तेथे पर्यटकांसाठी सोयीसुविधा उभारण्याच्या कामास स्थानिकांनी विरोध करून काम बंद पाडल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. चावळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची भूमिका विषद केली.

ठळक मुद्देकेंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मिलनकुमार यांचा इशारा

औरंगाबाद : जगप्रसिद्ध दौलताबाद किल्ला ( Doulatabad Fort ) पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या कामात दौलताबाद ग्रामपंचायत आणि स्थानिक नेत्यांनी खोडा घातला आहे. किल्ल्यालगतची अतिक्रमणे काढण्यास स्थानिकांनी पुढाकार घेऊन प्रशासनास मदत करावी. अन्यथा जागतिक वारसा स्थळाच्या १०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नसते. आम्हांलाही नियमानुसार कारवाई करावी लागेल, असा इशारा पुरातत्त्व ( Archaeological Survey of India ) अधीक्षक डॉ. मिलन कुमार चावळे यांनी दिला.

किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणे काढून तेथे पर्यटकांसाठी सोयीसुविधा उभारण्याच्या कामास स्थानिकांनी विरोध करून काम बंद पाडल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. चावळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची भूमिका विषद केली. ते म्हणाले, देश-विदेशातील पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करता याव्यात, याकरीता २००१ साली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी किल्ल्याजवळील ३ एकर ८ आर जमीन केंद्रीय पुरातत्त्व विभागाला प्रदान केली. तेव्हापासून ही जमीन केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. मुख्यमंत्री निधीतून या जमिनीला संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी ६ लाख २५ हजार रुपये निधी मिळाला होता. या निधीतून संरक्षक भिंत बांधण्यात आली. मात्र, किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरील वाहनतळावर काही लोकांनी अतिक्रमण केले. त्यांनी तेथून उठावे, याकरीता त्यांना विनंती करण्यात आली असता त्यांनी नकार दिला. एवढेच नव्हे तर ही जागा ग्रामपंचायतीची आहे, गावकऱ्यांना विश्वासात न घेता केंद्रीय पुरातत्त्व विभागाला जमीन परस्पर देण्यात आली होती, हे आम्हांला मान्य नसल्याचे सरपंच आणि अन्य स्थानिक नेते सांगत आहेत. सोयी सुविधा उपलब्ध केल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल, याचा लाभ सर्वांना होईल. याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर अतिक्रमणधारकांनी अचानक ठिय्या आंदोलन केले. मोठा जमाव जमल्याने अतिक्रमण काढण्याचे काम तूर्त स्थगित केले. यानंतर सुमारे २५ जणांनी या जमिनीबद्दल न्यायालयात दावा दाखल केला. या खटल्यावर २३ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाला मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Doulatabad Fortदौलताबाद किल्लाArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणEnchroachmentअतिक्रमणAurangabadऔरंगाबाद