शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत देण्यास टाळाटाळ, वारसांना करावी लागते प्रतीक्षा

By बापू सोळुंके | Updated: May 2, 2024 19:35 IST

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत निधीसाठी करावी लागते प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : अपघातात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी शासनाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत दोन लाख रुपये तर अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यास १ लाख रुपयांची मदत देण्यात येते. या योजनेंतर्गत तातडीने अनुदान देण्यास शासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येते. १५७ शेतकऱ्यांच्या वारसांना ३ कोटी ९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यापैकी २ कोटी १२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या वारसांना अदा करण्यात आले आहे.

घात, अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर त्या कुटुंबाला संकटातून सावरण्यासाठी ‘ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ’ खासगी विमा कंपनीमार्फत राबविली जात होती. विमा कंपनीची शेतकऱ्यांना मदत नाकारतात ही बाब लक्षात आल्यानंतर १९ एप्रिल २०२३ पासून ही योजना स्वत:च राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. तेव्हापासून ३१ मार्च २०२४ पर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २३५ मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले होते. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीला मृत शेतकऱ्याच्या वारसांचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार आहे. यानुसार जिल्ह्यातील १५२ मृत शेतकऱ्यांचे आणि ५ अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यासाठी शासनाकडे ३ कोटी ९ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. ३१ मार्चपर्यंत शासनाने २ कोटी १२ लाख रुपयांचा निधी दिला. रक्कम शेतकऱ्यांच्या वारसांना अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झाली. उर्वरित अर्जदारांना मदत करण्यासाठी निधीची प्रतीक्षा कृषी विभाग करीत आहेत.

या अटींची पूर्तता आवश्यकघटना घडल्यानंतर ३० दिवसांच्या आत या योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक असते. शिवाय वाहन चालविताना शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला, त्यावेळी त्याच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असावे, मृताकडे अथवा कुटुंबातील सदस्याच्या नावे शेतीचा सातबारा असावा या प्रमुख अटी आहेत.

आचारसंहितेत अडकले ६२ प्रस्तावसध्या या योजनेत ६२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे प्रलंबित आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे समितीची बैठक घेण्यात आली नाही. आचारसंहिता समाप्त झाल्यानंतरच बैठक होईल,असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र