शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
3
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
4
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
5
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
6
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
7
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
8
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
9
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
10
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
12
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
13
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
15
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
16
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
17
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
18
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
19
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
20
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
Daily Top 2Weekly Top 5

मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत देण्यास टाळाटाळ, वारसांना करावी लागते प्रतीक्षा

By बापू सोळुंके | Updated: May 2, 2024 19:35 IST

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत निधीसाठी करावी लागते प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : अपघातात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी शासनाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत दोन लाख रुपये तर अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यास १ लाख रुपयांची मदत देण्यात येते. या योजनेंतर्गत तातडीने अनुदान देण्यास शासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येते. १५७ शेतकऱ्यांच्या वारसांना ३ कोटी ९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यापैकी २ कोटी १२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या वारसांना अदा करण्यात आले आहे.

घात, अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर त्या कुटुंबाला संकटातून सावरण्यासाठी ‘ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ’ खासगी विमा कंपनीमार्फत राबविली जात होती. विमा कंपनीची शेतकऱ्यांना मदत नाकारतात ही बाब लक्षात आल्यानंतर १९ एप्रिल २०२३ पासून ही योजना स्वत:च राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. तेव्हापासून ३१ मार्च २०२४ पर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २३५ मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले होते. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीला मृत शेतकऱ्याच्या वारसांचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार आहे. यानुसार जिल्ह्यातील १५२ मृत शेतकऱ्यांचे आणि ५ अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यासाठी शासनाकडे ३ कोटी ९ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. ३१ मार्चपर्यंत शासनाने २ कोटी १२ लाख रुपयांचा निधी दिला. रक्कम शेतकऱ्यांच्या वारसांना अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झाली. उर्वरित अर्जदारांना मदत करण्यासाठी निधीची प्रतीक्षा कृषी विभाग करीत आहेत.

या अटींची पूर्तता आवश्यकघटना घडल्यानंतर ३० दिवसांच्या आत या योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक असते. शिवाय वाहन चालविताना शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला, त्यावेळी त्याच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असावे, मृताकडे अथवा कुटुंबातील सदस्याच्या नावे शेतीचा सातबारा असावा या प्रमुख अटी आहेत.

आचारसंहितेत अडकले ६२ प्रस्तावसध्या या योजनेत ६२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे प्रलंबित आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे समितीची बैठक घेण्यात आली नाही. आचारसंहिता समाप्त झाल्यानंतरच बैठक होईल,असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र