शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्यास टाळाटाळ

By बापू सोळुंके | Updated: October 27, 2023 16:32 IST

विमा कंपनीचे अपील राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी फेटाळले

छत्रपती संभाजीनगर : पावसाचा २० दिवसांपेक्षा अधिक काळ खंड असलेल्या जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील १९७ गावांतील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या २५ टक्के रक्कम अग्रीम नुकसानभरपाई देण्याची अधिसूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, या आदेशाला न जुमानता विमा कंपनीकडून नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ सुरू असल्याचे दिसून येते.

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात विमा कंपनीने केलेले अपील राज्याच्या कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सोमवारी फेटाळल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्हे वगळता उर्वरित मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पीक उत्पादकतेवर परिणाम झाल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. विभागीय कृषी सहसंचालकांच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगरमधील २० कृषी मंडळे, जालना जिल्ह्यातील ८ आणि बीड जिल्ह्यातील १९ कृषी मंडळांत एकूण २० दिवसांहून अधिक काळ पावसाने खंड दिल्याने ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद, मूग ही पिके वाळून गेली होती. कापूस पिकाची वाढ खुंटल्याने उत्पादकता ५० टक्क्यांच्या खाली आल्याचा अहवाल कृषी विभागाने नोंदविला.

यानंतर तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र अधिसूचना जारी करून पावसाचा खंड असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार विमा कंपनीने तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत करणे अपेक्षित होते. सलग दुसऱ्या वर्षी पीक नुकसानीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी विमा कंपनी शेतकऱ्यांना भरपाई देणे कसे टाळता येतील, यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विमा कंपनीने ‘आम्ही कपाशीचा विमा देणार नाही’, अशी भूमिका घेतली होती. कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना खडे बोल सुनावल्यानंतर ते शांत झाले.

बीड जिल्ह्यातील विमा कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेविरोधात राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे अपील केले. गेडाम यांनी सोमवारी सुनावणी घेतली. या सुनावणीच्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट असल्याचे नमूद करीत विमा कंपनीचे अपील फेटाळून लावले. एवढेच नव्हे तर आपल्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारकडे अपील न करता थेट शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्राने दिली.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAurangabadऔरंगाबाद