शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

रेल्वे प्रवाशांना दिलासा; ‘जनशताब्दी’ पुन्हा ‘सीएसटी’वरून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 15:17 IST

जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा सीएसटीपर्यंत नेल्यामुळे  औरंगाबाद आणि जालन्याच्या नागरिकांना फायदा होईल.

ठळक मुद्देजनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची रेल्वे आहे.तोट्यात चालत असल्याने नंदीग्राम एक्स्प्रेस नांदेडपर्यंतच चालविण्यासाठी हालचाली

औरंगाबाद : जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून (सीएसटी) धावण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. दुसरीकडे  नंदीग्राम एक्स्प्रेस केवळ नांदेडपर्यंतच चालविण्याच्या हालचाली सुरू आहेत, असे रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची रेल्वे आहे. एका दिवसात मुंबईला जाऊन आपले काम करून याच रेल्वेने परत येण्यासाठी ही रेल्वे उपयुक्त आहे. ही रेल्वे सुरुवातीला मुंबईपर्यंत (सीएसटी) धावत होती; परंतु पुढे जनशताब्दीची धाव ही दादरपर्यंत केली गेली. २०१५ मध्ये ही जनशताब्दी जालन्यापर्यंत वाढविण्यात आली. दादरवरून ये-जा करताना अनेक अडचणी येत असल्याने लोकांच्या सुविधेसाठी ही रेल्वे पुन्हा सीएसटीपर्यंत नेण्याची मागणी केली जात होती. अखेर त्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा सीएसटीपर्यंत नेल्यामुळे  औरंगाबाद आणि जालन्याच्या नागरिकांना फायदा होईल. नंदीग्राम एक्स्प्रेस नांदेड ते नागपूरदरम्यान तोट्यात चालत असल्याने प्रशासनाने ही रेल्वे नांदेडपर्यंतच चालविण्याचा निर्णय घेतला. याचाही मराठवाड्याला फायदा होईल. असे असले तरी भोकर, हिमायतनगर, किनवट, अदिलाबादच्या नागरिकांची गैरसोय होईल, असे स्वानंद सोळंके यांनी सांगितले.   जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून आणि नंदीग्राम एक्स्प्रेस केवळ नांदेडपर्यंतच चालविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतल्याचे पत्र प्राप्त झाल्याचे मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी सांगितले.

कार्यालयीन पत्र, अधिक माहिती नाहीया दोन्ही रेल्वेसंदर्भातील पत्र कार्यालयीन आहे. त्याविषयी अद्याप काही अधिक माहिती प्राप्त नाही, त्यामुळे काय निर्णय झाला, हे आता सांगता येणार नाही, असे ‘दमरे’च्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीAurangabadऔरंगाबादtourismपर्यटनMumbaiमुंबई