शहरं
Join us  
Trending Stories
1
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
2
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
3
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
4
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
5
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
6
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
7
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
8
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
9
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
10
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
11
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
12
Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
13
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
14
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
15
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
16
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
17
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
18
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
19
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
20
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते'; अशा ओळी लिहून लग्न सोहळ्याआधीच वधूपित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 10:25 IST

मुलीच्या लग्नसमारंभप्रसंगीच राहत्या घरी वधूपित्याची गळफास घेऊन आत्महत्या.

औरंगाबाद : ' इतकेच मला जातांना सरणावर कळले होते; मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' अशा ओळी लिहून ठेवून वधूपित्याने मुलीच्या लग्नसमारंभप्रसंगीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना धूत हॉस्पिटल समोरील म्हाडा कॉलनीत घडली. वधूपित्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

मनजीत रायभान कोळेकर (वय ५०,रा. म्हाडा कॉलनी) असे मृत वधूपित्याचे नाव आहे. याविषयी एमआयडीसी सिडको पोलसांनी सांगितले की, मनजीत यांच्या मुलीचा विवाह सोमवारी (दि.१७) दुपारी १२.०१ वाजता बीड बायपास वरील एका लॉन्सवर आयोजित करण्यात आला होता. या विवाहाची संपूर्ण तयारी कोळेकर कुटुंबांनी केली. वऱ्हाडी मंडळीही सकाळीच मंगलकार्यालयात दाखल झाले.

मनजीत यांनी वऱ्हाडींचे स्वागतही केले. मनजीत यांची पत्नी, मुलगा आणि वधूकन्येसह सर्व नातेवाईक विवाहस्थळ असलेल्या लॉन्सवर गेले होते. त्यामुळे कोळेकर यांच्या घराला कूलूप होती. लग्नसोहळ्याला अवघी काही मिनिटे उरली असताना साडेअकरा वाजेच्या सुमारास मी घरीजाऊन फेटा घेऊन येतो, असे नातेवाईकांना सांगून मनजीत हे मोटारसायकलने म्हाडा कॉलनीतील घरी आले. घरातील स्वयंपाकखोलीतील छताच्या हुकाला साडी बांधून त्यांनी आत्महत्या केली.

लग्नाचा मुहूर्त टळू द्यायचा नाही, हे त्यांनीच स्पष्टपणे बजावले होते. यामुळे ठरल्यावेळेनुसार वधु-वर लग्नासाठी समोरासमोर येऊन मंचावर विराजमान झाले. मात्र बराचवेळा झाला तरी मनजीत हे लग्नमंडपात परतले नाही. वधूपिता दिसत नसल्यामुळे त्यांचे नातेवाईक सारखा त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होते, मात्र ते फोन उचलत नव्हते. यामुळे काही वेळाने नातेवाईकांनी म्हाडा कॉलनतील त्यांच्या शेजाऱ्यांना फोन करून घरी जाऊन मनजीत यांना तातडीने विवाहस्थळी पाठव, असा निरोप दिला. त्यानंतर शेजारी राहणारा तरूण मनजीत यांच्या घरी गेला तेव्हा घराचे दार आतून बंद होते. यामुळे तरूणाने खिडकीतून डोकावून पाहिले असता, मनजीत यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती लगेच नातेवाईकांना आणि एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविण्यात आली. 

पत्नीची मागितली माफी पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. यात मनजित यांनी पत्नीची माफी मागून ' इतकेच मला जातांना सरणावर कळले होते; मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' या कवी सुरेश भट यांच्या सुप्रसिद्ध ओळी लिहून ठेवल्या आहेत. माझे देहदान करावे असेही त्यांनी नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.