शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

'मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते'; अशा ओळी लिहून लग्न सोहळ्याआधीच वधूपित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 10:25 IST

मुलीच्या लग्नसमारंभप्रसंगीच राहत्या घरी वधूपित्याची गळफास घेऊन आत्महत्या.

औरंगाबाद : ' इतकेच मला जातांना सरणावर कळले होते; मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' अशा ओळी लिहून ठेवून वधूपित्याने मुलीच्या लग्नसमारंभप्रसंगीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना धूत हॉस्पिटल समोरील म्हाडा कॉलनीत घडली. वधूपित्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

मनजीत रायभान कोळेकर (वय ५०,रा. म्हाडा कॉलनी) असे मृत वधूपित्याचे नाव आहे. याविषयी एमआयडीसी सिडको पोलसांनी सांगितले की, मनजीत यांच्या मुलीचा विवाह सोमवारी (दि.१७) दुपारी १२.०१ वाजता बीड बायपास वरील एका लॉन्सवर आयोजित करण्यात आला होता. या विवाहाची संपूर्ण तयारी कोळेकर कुटुंबांनी केली. वऱ्हाडी मंडळीही सकाळीच मंगलकार्यालयात दाखल झाले.

मनजीत यांनी वऱ्हाडींचे स्वागतही केले. मनजीत यांची पत्नी, मुलगा आणि वधूकन्येसह सर्व नातेवाईक विवाहस्थळ असलेल्या लॉन्सवर गेले होते. त्यामुळे कोळेकर यांच्या घराला कूलूप होती. लग्नसोहळ्याला अवघी काही मिनिटे उरली असताना साडेअकरा वाजेच्या सुमारास मी घरीजाऊन फेटा घेऊन येतो, असे नातेवाईकांना सांगून मनजीत हे मोटारसायकलने म्हाडा कॉलनीतील घरी आले. घरातील स्वयंपाकखोलीतील छताच्या हुकाला साडी बांधून त्यांनी आत्महत्या केली.

लग्नाचा मुहूर्त टळू द्यायचा नाही, हे त्यांनीच स्पष्टपणे बजावले होते. यामुळे ठरल्यावेळेनुसार वधु-वर लग्नासाठी समोरासमोर येऊन मंचावर विराजमान झाले. मात्र बराचवेळा झाला तरी मनजीत हे लग्नमंडपात परतले नाही. वधूपिता दिसत नसल्यामुळे त्यांचे नातेवाईक सारखा त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होते, मात्र ते फोन उचलत नव्हते. यामुळे काही वेळाने नातेवाईकांनी म्हाडा कॉलनतील त्यांच्या शेजाऱ्यांना फोन करून घरी जाऊन मनजीत यांना तातडीने विवाहस्थळी पाठव, असा निरोप दिला. त्यानंतर शेजारी राहणारा तरूण मनजीत यांच्या घरी गेला तेव्हा घराचे दार आतून बंद होते. यामुळे तरूणाने खिडकीतून डोकावून पाहिले असता, मनजीत यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती लगेच नातेवाईकांना आणि एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविण्यात आली. 

पत्नीची मागितली माफी पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. यात मनजित यांनी पत्नीची माफी मागून ' इतकेच मला जातांना सरणावर कळले होते; मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' या कवी सुरेश भट यांच्या सुप्रसिद्ध ओळी लिहून ठेवल्या आहेत. माझे देहदान करावे असेही त्यांनी नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.