शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीच्या लालसेने रक्ताचे नातेही संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:50 IST

आॅन द स्पॉट.... खुनाच्या घटनेनंतर वरुड सुन्न : दारुड्या घरगड्याने केली अख्ख्या कुटुंबाची वाताहत; मुलाच्या अंत्यसंस्कारालाही आला नाही निर्दयी बाप

श्यामकुमार पुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : संपत्तीची लालसा, त्यात दारुच्या व्यसनाने निर्दयी पित्याला रक्ताच्या नात्याचेही भान राहिले नाही. जमीन नावावर करुन देण्याची मागणी करणाऱ्या पोटच्या मुलाचा खून झाल्याच्या घटनेने वरुड गाव हादरले आहे. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाºया व मन हेलावून टाकणाºया या घटनेनंतर आमच्या प्रतिनिधीने सदर गावाला भेट दिली असता गावकरी याच विषयावर दबक्या आवाजात चर्चा करुन हळहळ व्यक्त करताना दिसले. मृताचे कुटुंब पार हादरुन गेले असून घरगड्यानेच घर दु:खात ढकलल्याची करुण कहाणी ऐकून काळजाचे पाणी होत आहे.बुधवारी कौतिक मिरगे याने मुलगा विजयचा डोक्यात टिकास मारुन खून केल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी आरोपी कौतिकला अटक केली. वास्तविक आई-वडील मुलांसाठीच संपत्ती कमवत असतात, पण ही घटना याला अपवाद ठरली आहे. मृत विजयची आई अनिताबाई म्हणाली, मुलाच्या अंत्यसंस्कारालाही निर्दयी बाप आला नाही. तर विजयची पत्नी स्वाती धाय मोकळून रडत होती. मला विधवा व माझ्या मुलांना अनाथ करणाºया सासºयाला कठोर शिक्षा द्या, अशी विनवणीही ती करत होती.शुक्रवारी राख सावडण्याचा कार्यक्रम असल्याने नातेवाईक गावात आले होते. त्यांच्यासमोर हे कुटुंब आक्रोश करुन घटनाक्रम सांगत होते. वडीलांच्या रोजच्या किरकिरीला घरातील सर्व जण व शेजारीही वैतागले होते. दारू पिऊन येऊन मारहाण करणे, धिंगाणा घालणे हे दररोजचे ठरलेले होते. या त्रासाला कंटाळून मी पुण्यात नोकरीला गेलो होतो, असे विजयचा लहान भाऊ विनोद याने सांगितले.एकीकडे मुलगा गेल्याचे दु:ख तर दुसरीकडे पतीला परमेश्वर समजणाºया अनिताबाईला पतीविरुद्ध तक्रार द्यावी लागली. अशा दुहेरी संकटात मयत विजयची आई सापडली आहे. राख सावडण्यासाठी आलेल्या नातेवाईकांसमोर तिने टाहो फोडला. तिला काय बोलावे, कसा धीर द्यावा, हे आलेल्या लोकांनाही कळत नव्हते.माझ्या पप्पाला आजोबाने मारलेज्या वेळी कौतिकने विजयवर टिकासने हल्ला केला, त्यावेळी विजयचा ७ वर्षांचा मुलगा आदर्श घटनास्थळी हजर होता. माझ्या पप्पाला मारू नका, असे तो व आजी अनिता सांगत होती. पण आजोबाने ऐकले नाही.अशा दाजीची काय पाठराखण करावी?माझ्या बहिणीला व तिच्या कुटुंबाला कौतिक मिरगे (दाजीचा)चा खूप त्रास होता. दारू पिऊन आल्यावर ते कुणाला दोन घास खाऊ देत नव्हते. खून केल्याचा त्यांना थोडाही पश्चात्ताप नाही. अशा दाजीची काय पाठराखण करावी. ते तुरुंगात गेले तर किमान त्यांचे कुटुंब दु:खाने कमवून सुखाने खातील. काही आम्ही मदत करू, असे मयताचा मामा अंकुश सुरासे साश्रूनयनांनी सांगत होता.आता त्या जमिनीचे काय करु?जिवंतपणी माझ्या सासºयाने आम्हाला जमीन दिली नाही, मात्र त्याचे शव चितेवर जाण्यापूर्वी मृत विजयच्या दोन्ही मुलांच्या नावावर ४ एकर जमीन रजिस्ट्री करुन दिली. आधी दिली असती तर माझे पती वाचले असते. मी विधवा व मुले अनाथ झाली नसती. आता त्या जमिनीचे मी काय करु, असे स्वाती म्हणाली.पश्चात्ताप नसणाºया वडिलांना शिक्षा द्यामयत विजयचा पिता कौतिक सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला या घटनेचा जराही पश्चाताप नाही. उलट तो आम्हाला अजूनही पाहून घेईन, अशी धमकी देत आहे. यामुळे त्याच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका आहे, त्याला कठोर शिक्षा द्या, असे विनोद सांगत होता.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी