शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

विभागीय पथकाचा मोसंबी बागा पाहणी दौरा

By admin | Updated: September 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद : मोसंबीची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी खात्याच्या विभागीय पथकाने आज तालुक्यातील विविध गावांच्या परिसरात जाऊन फळबागांची पाहणी केली.

औरंगाबाद : मोसंबीची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी खात्याच्या विभागीय पथकाने आज तालुक्यातील विविध गावांच्या परिसरात जाऊन फळबागांची पाहणी केली. जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमणावर मोसंबीची फळगळ होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्या पार्श्वभूमीवर याची पाहणी करण्यासाठी कृषी सहसंचालक कार्यालयाने विभागीय पथकाची स्थापना केली होती. या पथकाने आज औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, इब्राहीमपूर, पिंप्री राजा, पाचोड, आपतगाव, भालगाव आदी गावांना जाऊन तेथील मोसंबीच्या बागांची पाहणी केली.पथकात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, विभागीय कृषी सहसंचालक जनार्दन जाधव, विभागीय कृषी अधीक्षक रमेश गोसावी, जिल्हा कृषी अधिकारी पंडित लोणारे, उप विभागीय कृषी अधिकारी धर्मेंद्र कुलथे यांचा समावेश होता. पावसाच्या पाण्याचा निचरा करून बागांची स्वच्छता ठेवल्यास मोसंबी फळांची गळ थांबविण्यास मदत होऊ शकते, असे डॉ. संजय पाटील यांनी यावेळी सांगितले. एका बहराची फळे झाडावर असताना दुसऱ्या बहरासाठी बाग ताणावर सोडू नये, तसेच झाडाची क्षमता पाहून फळे धरावीत व जास्तीच्या फळासाठी अन्न मूलद्रव्याचे व्यवस्थापन विद्यापीठाच्या शिफारसीनुसार करून ताबडतोब रिडोमिल या बुरशी नाशकाची फवारणी करावी, फळगळीची वा कुठल्याही प्रकारची समस्या शेतकऱ्यांना आल्यास कृषी विभाग व कृषी विद्यापीठाशी संपर्क केल्यास निश्चितच मदत मिळेल, असे जनार्दन जाधव यांनी सांगितले. पाहणी दौऱ्याच्या पथकाच्या निष्कर्षानुसार ही फळगळ बुरशीजन्य रोगापासून झालेली असून गळीचे प्रमाण अल्प स्वरूपात आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता विद्यापीठाने सुचविलेल्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन रमेश गोसावी व पंडित लोणारे यांनी केले.या पाहणी दौऱ्याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी राठोड, सुभाष पठाडे, उत्तम गोरडे, रामेश्वर घोडके, रामेश्वर पवार, भगवान गावंडे, भारत पवार आदी मोसंबी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.