औरंगाबाद : शहराच्या विकासाचा कणा म्हणजे महापालिकेचा अर्थसंकल्प होय. २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेला अर्थसंकल्प वर्ष संपत आल्यावर अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे देण्यात आला. ९५२ कोटी ९१ लाख रुपयांपर्यंत या अर्थसंकल्पाला पोहोचवण्यात आले आहे. शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांची कामे यामध्ये सूचित करण्यात आली आहेत. विशेष बाब म्हणजे प्रशासन या अर्थसंकल्पातील एकाही कामाची अंमलबजावणी करणार नाही, हे विशेष.स्थायी समितीने चार महिन्यांपूर्वी अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेकडे सुपूर्द केला. ८८३ कोटी ८६ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पात सर्वसाधारण सभेने ६९ कोटींची वाढ सुचविली आहे. ९५२ कोटींचा अर्थसंकल्प आता प्रशासनाकडे देण्यात आला. यामध्ये अनेक विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे. मिटमिटा येथे सफाई पार्क उभारण्यासाठी जागा मिळविणे, शहरातील रस्त्यांसाठी शासनाकडे १०० कोटींची मागणी करण्यात आली आहे. गुंठेवारी भागाचा विकास करण्यासाठी १०० कोटींची मागणी, शहरातील रस्त्यांसाठी स्वतंत्र १५० कोटी रुपये शासनाकडे मागण्यात आले आहेत.विकासकामांचा तपशीलस्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १ कोटींची तरतूद, शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयासाठी ५० लाख, झांशीची राणी उद्यानाच्या नूतनीकरणासाठी २५ लाख, शहरातील जुन्या विहिरी, नहरींच्या साफसफाईसाठी १ कोटी, ट्री गार्डसाठी १ कोटी १५ लाख, मनपा शाळांची दुरुस्ती, स्वच्छतागृह बांधण्यासाठी १ कोटी, मनपाच्या खुल्या जागांवर तारेचे कुंपण, भिंती बांधण्यासाठी १ कोटी, ओपन जीम उभारण्यासाठी ५० लाख, सातारा- देवळाईसाठी ५ कोटी, या भागातील इमारतींसाठी ५० लाख, महिलांसाठी शौचालये उभारण्यासाठी ५० लाख आदी विकासकामांचा समावेश आहे.
मनपाचा ‘आधार’ हीन अर्थसंकल्प सादर
By admin | Updated: February 18, 2016 00:07 IST