शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अग्निवीरच्या २५ हजार पदांची भरती; आठवी-दहावी पास, आयटीआय, डी.फार्मसी वाल्यांनाही संधी

By राम शिनगारे | Updated: March 6, 2024 19:01 IST

२२ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज; २२ एप्रिल रोजी ऑनलाइन परीक्षा

छत्रपती संभाजीनगर : भारतीय लष्करामध्ये अग्निवीर योजनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल २५ हजार जागांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी १३ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. २२ मार्चपर्यंत प्रत्येक पात्रताधारकांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर कॉमन एन्ट्रन्स एक्झाम अर्थात सीईई २२ एप्रिल राेजी घेतली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रियेतूनही उमेदवारांना जावे लागते. त्यानंतर अंतिम निवड केली जाणार आहे. २५ हजार पदांमध्ये भारतीय लष्करातील विविध विभागातील रिक्त पदांचा समावेश आहे.

संपूर्ण माहिती या वेबसाइटवरभारतीय लष्करात प्रवेश करण्यासाठी अग्निवीर योजना लागू केलेली आहे. कोणत्या विभागात किती जागा उपलब्ध आहेत त्याविषयीची संपूर्ण माहिती https://www.joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी लॉगीन करावे लागेल. त्यानंतरच अर्ज पूर्ण भरता येईल.

निवडीचे दोन टप्पेऑनलाइन लेखी परीक्षा : भारतीय लष्कराने युवकांची निवड करण्यासाठी २२ एप्रिल रोजी ऑनलाइन परीक्षा ठेवली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनाच पुढील भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.प्रत्यक्ष भरती : ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष मैदानावरील भरती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यात उंची, वजन इ.ची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल. तसेच विविध कसरतींच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. प्रत्येक टप्प्यावर गुण दिले जातात. त्या सर्वांचे गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

अर्ज कसा कराल?भारतीय लष्करातील अग्निवीर योजनेच्या माध्यमातून प्रवेश करण्यासाठी https://www.joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरताना लागणाऱ्या बाबींची माहितीही संकेतस्थळावरच देण्यात आलेली आहे.

कोणकोणती पदे?भारतीय लष्करात आवश्यक असणारी अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल, लिपिक, स्टोअर किपर, ट्रेड्समन, नर्सिंग, फार्मा इ. विभागांतील पदांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.

आठवी, दहावी पास आणि आयटीआय झालेल्यांनाही संधीभारतीय लष्करात जाण्यासाठी आठवी, दहावी पास उत्तीर्ण असलेल्यांसह आयटीआय, डी.फार्मसीला प्रवेश घेतलेल्या उमेदवारांनाही संधी उपलब्ध करून दिली आहे. दहावीला कमीत कमी ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. त्याशिवाय काही पदांसाठी विज्ञानचे विषय असणेही अनिवार्य आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानAurangabadऔरंगाबाद