शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

अग्निवीरच्या २५ हजार पदांची भरती; आठवी-दहावी पास, आयटीआय, डी.फार्मसी वाल्यांनाही संधी

By राम शिनगारे | Updated: March 6, 2024 19:01 IST

२२ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज; २२ एप्रिल रोजी ऑनलाइन परीक्षा

छत्रपती संभाजीनगर : भारतीय लष्करामध्ये अग्निवीर योजनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल २५ हजार जागांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी १३ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. २२ मार्चपर्यंत प्रत्येक पात्रताधारकांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर कॉमन एन्ट्रन्स एक्झाम अर्थात सीईई २२ एप्रिल राेजी घेतली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रियेतूनही उमेदवारांना जावे लागते. त्यानंतर अंतिम निवड केली जाणार आहे. २५ हजार पदांमध्ये भारतीय लष्करातील विविध विभागातील रिक्त पदांचा समावेश आहे.

संपूर्ण माहिती या वेबसाइटवरभारतीय लष्करात प्रवेश करण्यासाठी अग्निवीर योजना लागू केलेली आहे. कोणत्या विभागात किती जागा उपलब्ध आहेत त्याविषयीची संपूर्ण माहिती https://www.joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी लॉगीन करावे लागेल. त्यानंतरच अर्ज पूर्ण भरता येईल.

निवडीचे दोन टप्पेऑनलाइन लेखी परीक्षा : भारतीय लष्कराने युवकांची निवड करण्यासाठी २२ एप्रिल रोजी ऑनलाइन परीक्षा ठेवली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनाच पुढील भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.प्रत्यक्ष भरती : ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष मैदानावरील भरती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यात उंची, वजन इ.ची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल. तसेच विविध कसरतींच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. प्रत्येक टप्प्यावर गुण दिले जातात. त्या सर्वांचे गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

अर्ज कसा कराल?भारतीय लष्करातील अग्निवीर योजनेच्या माध्यमातून प्रवेश करण्यासाठी https://www.joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरताना लागणाऱ्या बाबींची माहितीही संकेतस्थळावरच देण्यात आलेली आहे.

कोणकोणती पदे?भारतीय लष्करात आवश्यक असणारी अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल, लिपिक, स्टोअर किपर, ट्रेड्समन, नर्सिंग, फार्मा इ. विभागांतील पदांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.

आठवी, दहावी पास आणि आयटीआय झालेल्यांनाही संधीभारतीय लष्करात जाण्यासाठी आठवी, दहावी पास उत्तीर्ण असलेल्यांसह आयटीआय, डी.फार्मसीला प्रवेश घेतलेल्या उमेदवारांनाही संधी उपलब्ध करून दिली आहे. दहावीला कमीत कमी ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. त्याशिवाय काही पदांसाठी विज्ञानचे विषय असणेही अनिवार्य आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानAurangabadऔरंगाबाद